Maharashtra News : भर उन्हाळ्यात पावसाच्या सरींनी दिला अमरावतीकरांना दिलासा

अमरावती : काही दिवसांपासून असह्य उकाडा अन् अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हाच्या झळांमुळे हैराण झालेल्या अमरावतीकरांना ढगाळ वातावरण व नंतर पडलेल्या पावसाच्या सरी मुळे चांगलाच दिलासा मिळाला. मंगळवारी सकाळपासून आकाशात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने सर्वत्र अवकाळी पाऊस पडेल की काय? असे वाटत होते.रात्री उशिरा जिल्ह्यातील हवेत गारवा निर्माण झाला असून रोज कडक उन्हाचा अनुभव घेणाऱ्या शहरवासीयांना यातून सुटका मिळाली.



मार्चच्या सुरवातीपासून शहरातील कमाल तापमान ३४ ते ३६ अंश सेल्सिअसदरम्यान होते. सकाळी ९ वाजल्यापासून वातावरणात उष्मा वाढत होता. सायंकाळी सहापर्यंत उन्हाची तीव्रता कायम राहत असल्याचे चित्र आहे. दुपारी उन्हाच्या झळा असह्य वाटत असल्याने नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. त्यामुळे रस्त्यावरील वर्दळ घटल्याचा प्रत्यय येत आहे. त्यामुळेच दुपारी शहरातील बहुतांश रस्ते निर्मनुष्य होत आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक टोपी, रुमाल, छत्री तसेच स्कार्फचा वापर करीत आहेत. घरातील पंखे, कुलर रात्रंदिवस सुरू ठेवावे लागत आहेत. तीव्र उन्हाच्या झळांनी अवघ्या शहराला घाम फुटलेला असताना मंगळवारी (१ एप्रिल) मात्र सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते व रात्रीच्या सुमारास हलक्या स्वरूपात पावसाने हजेरी लावली.

Comments
Add Comment

Special Trains :नांदेडसाठी विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा; दिल्ली, मुंबई आणि चंदीगडवरून धावणार विशेष गाड्या

‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २४ आणि २५

पुण्यात डिजिटल अरेस्टची धमकी देत, ज्येष्ठ नागरिकाची कोटींची फसवणूक

पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये सायबर गुन्हेगारांनी ‘डिजिटल अरेस्ट’चा धाक दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाला कोट्यवधींचा

नाशिक महापौरपदासाठी राजकीय हालचालींना वेग; भाजपमधील तीन प्रभावी चेहरे चर्चेत

नाशिक : महानगरपालिका निवडणुकीनंतर नाशिकच्या सत्तावर्तुळात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. स्पष्ट संख्याबळासह

Amrit Bharat Express Train Routes : मुंबईकरांची चांदी! 'अमृत भारत एक्सप्रेस'ने लांब पल्ल्याचा प्रवास होणार स्वस्त; जाणून घ्या कुठे-कुठे थांबणार गाडी?

मुंबई : भारतीय रेल्वेने सर्वसामान्यांच्या प्रवासासाठी सुरू केलेल्या 'अमृत भारत एक्सप्रेस' ताफ्यात आता आणखी ९

Ashish Jaiswal : आमदार आशिष जयस्वाल यांच्या पाठपुराव्याला यश; प्रकल्पबाधित तरुण दिनेश हावरे यांचा पोलीस सेवेतील मार्ग मोकळा!

सातारा : नियम आणि प्रशासकीय तांत्रिकतेच्या कचाट्यात अडकलेल्या एका होतकरू तरुणाच्या आयुष्यात अखेर आशेचा नवा

महापालिकेच्या अर्थसंकल्पाची औपचारिकता पूर्ण होणार

स्थायी समिती अध्यक्षांची निवड झाल्यानंतर आयुक्त मांडणार अर्थसंकल्प मुंबई : मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७चा