Firing on LOC : भारताने हाणून पाडला पाकिस्तानचा घुसखोरीचा प्रयत्न

पुँछ : पाकिस्तानने पुँछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी परिसरात नियंत्रण रेषा ओलांडून घुसखोरीचा प्रयत्न केला. पण भारतीय सैनिकांनी हा प्रयत्न हाणून पाडला.



पाकिस्तानमधून घुसखोरीचा प्रयत्न करत असलेल्यांपैकी एकाचा पाय पडल्यामुळे भूसुरुंगाचा स्फोट झाला. यानंतर भारताच्या सैनिकांनी घुसखोरांवर तसेच त्यांची मदत करत असलेल्या पाकिस्तानच्या सैनिकांवर तुफान गोळीबार केला. भारताकडून जोरदार प्रत्युत्तर मिळाले आणि पाकिस्तानने एकदम माघार घेतली.



सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नियंत्रण रेषेजवळ चार ते पाच घुसखोर आणि तेवढेच पाकिस्तानचे सैनिक ठार झाले. पाकिस्तानचे किमान दोन ते तीन सैनिक भारताच्या गोळीबारात जखमी झाले. भारतीय सैन्याची जीवितहानी झालेली नाही. पाकिस्तानने माघार घेतली तरी नियंत्रण रेषेवर अधूनमधून दोन्ही बाजूने गोळीबार सुरू होता. सध्या कृष्णा घाटी परिसरात भारतीय सैनिक हाय अलर्टवर आहेत.

कथुआ खोऱ्यात काही अतिरेक्यांनी स्थानिकांच्या मदतीने घुसखोरी केली आहे. या अतिरेक्यांच्या विरोधात घनदाट जंगलात भारतीय सैन्याची विशेष मोहीम सुरू आहे. अतिरेक्यांना मदत करणाऱ्यांना शोधून त्यांच्या विरोधातही कारवाई सुरू आहे. भारतीय सैन्याने घनदाट जंगलात लपलेल्या अतिरेक्यांना शोधण्यासाठी आधुनिक टेहळणी उपकरणांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
Comments
Add Comment

Hyderabad Vijayawada Highway Accident : साखरझोपेतच काळाचा घाला! हैदराबाद-विजयवाडा हायवेवर खाजगी बस ट्रकला धडकली; ६ प्रवाशांचा जागीच मृत्यू

हैदराबाद : हैदराबाद-विजयवाडा राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी पहाटे भीषण अपघात झाला. तेलंगणातील सूर्यापेट

Bank Holiday Today : आज देशातील 'या' राज्यांमध्ये बँका बंद; RBI Holiday List तपासा

नवी दिल्ली : बँकेच्या शाखेत जाऊन महत्त्वाचे काम करण्याचा विचार करत असाल, तर आधी आज बँका सुरू आहेत की बंद हे तपासून

Shopian Terror Case : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियानमध्ये तीन संशयितांना अटक, हँड ग्रेनेड आणि पोस्टर्स जप्त

श्रीनगर : काश्मिरी पंडितांना असलेला धोका आणि दक्षिण काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेच्या

Dattatray Bharne : पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

“पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”:

Artificial Intelligence : शिक्षणात AI चा वाढता प्रभाव, भारताची शैक्षणिक व्यवस्था आता बदलणार

मुंबई : AI आता फक्त तंत्रज्ञान क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते थेट वर्गखोल्यांपर्यंत पोहोचलं आहे. पण

Kashmiri Pandit Threat Letter : काश्मिरी पंडितांना १५ दिवसांत दुसऱ्यांदा धमकीचं पत्र; वैयक्तिक माहिती व्हायरल, सुरक्षा यंत्रणा सतर्क

काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काश्मिरी