Nikki Tamboli : निक्की तांबोळी झळकणार 'या' मराठी मालिकेत

मुंबई : स्टार प्रवाह दिवसेंदिवस प्रेक्षकांचं मनोरंजन वाढवण्यासाठी मालिकेच्या स्वरूपात वेगवेगळे प्रयोग करत आहे. अनेक जुन्या मालिकांना निरोप देऊन नवीन कंटेन्टसह प्रेक्षकांच मनोरंजन करत आहे. काही दिवसांपूर्वी या वाहिनीवर 'कोण होतीस तू काय झालीस तू' या मालिकेची घोषणा करण्यात आली होती. आता एका नव्याकोऱ्या रिॲलिटी शोचा धमाकेदार प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बिग बॉस ५ ची आणि सध्या मास्टर शेफ या रिऍलिटी शो मधून घराघरांत पोहचलेली अभिनेत्री निक्की तांबोळी झळकणार आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, 'कोण होतीस तू काय झालीस तू' या मालिकेचे दोन प्रोमो स्टार प्रवाह वाहिनीवर प्रदर्शित झाले असून ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेच्या दोन्ही प्रोमोमधून गिरीजा प्रभू, वैभव मांगले, अमीत खेडेकर, अमृता माळवदकर,साक्षी गांधी, साक्षी महाजन, भाग्यश्री पवार, नंदिनी वैद्य, मंदार जाधव मुख्य भूमिका तर खलनायिकेच्या भूमिकेत सुकन्या मोने दिसणार आहेत. याचबरोबर या मालिकेत बिग बॉस फेम निक्की तांबोळी देखील दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या घोषणेमुळे निक्कीच्या चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहचली आहे.

Comments
Add Comment

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण