डॉ. इंदुराणी जाखड पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी

पालघर : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांची पालघर येथे बदली करण्यात आली असून, त्या आता पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी असणार आहेत.

पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्याकडे जिल्हाधिकारी पदाचा प्रभार देण्यात आला होता. मंगळवारी सायंकाळी सामान्य प्रशासन विभागाच्या अपर सचिव व्हि.राधा यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांची पालघर जिल्हाधिकारी पदावर बदली केल्याबाबतचा आदेश काढला.



नव्या जिल्हाधिकारी डॉ. जाखड यांनी बुधवारी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेऊन जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांची माहिती घेतली. शासनाच्या योजनांची माहिती घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर दुपारी त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला.

पालघर जिल्ह्यात आरोग्य आणि शिक्षण या दोन महत्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आदिवासी बांधवांच्या विविध समस्या सोडविण्यासोबतच त्यांच्यासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे किंवा नाही हे पाहणे महत्वाचे असून, त्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. जाखड यावेळी बोलताना स्पष्ट केले.
Comments
Add Comment

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आणखी एक अपघात, वाहतुकीची कोंडीच कोंडी

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने प्रोपिलीन वायू

आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०

पुणे एक्सप्रेस वे अपघात प्रकरणी महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या १३९ फेऱ्या रद्द

मुंबई : पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या

एक्सप्रेवेवर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी अन् २५ किलोमीटर पर्यंत रांगा; नेमकं पुण्यात घडलं काय ?

लोणावळा : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी सायंकाळी घडलेल्या एका अपघातामुळे संपूर्ण मार्गावर

Congress: काँग्रेसमधला वाद चव्हाट्यावर, नगरसेवक थेट दिल्लीत पोहोचले, बैठकीत नेमकं घडलं काय?

दिल्ली: चंद्रपूर महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेसमध्ये गटातील राजकारणामुळे सत्ता गमावण्याची वेळ