डॉ. इंदुराणी जाखड पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी

पालघर : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांची पालघर येथे बदली करण्यात आली असून, त्या आता पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी असणार आहेत.

पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्याकडे जिल्हाधिकारी पदाचा प्रभार देण्यात आला होता. मंगळवारी सायंकाळी सामान्य प्रशासन विभागाच्या अपर सचिव व्हि.राधा यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांची पालघर जिल्हाधिकारी पदावर बदली केल्याबाबतचा आदेश काढला.



नव्या जिल्हाधिकारी डॉ. जाखड यांनी बुधवारी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेऊन जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांची माहिती घेतली. शासनाच्या योजनांची माहिती घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर दुपारी त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला.

पालघर जिल्ह्यात आरोग्य आणि शिक्षण या दोन महत्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आदिवासी बांधवांच्या विविध समस्या सोडविण्यासोबतच त्यांच्यासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे किंवा नाही हे पाहणे महत्वाचे असून, त्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. जाखड यावेळी बोलताना स्पष्ट केले.
Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद