डॉ. इंदुराणी जाखड पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी

  132

पालघर : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांची पालघर येथे बदली करण्यात आली असून, त्या आता पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी असणार आहेत.

पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्याकडे जिल्हाधिकारी पदाचा प्रभार देण्यात आला होता. मंगळवारी सायंकाळी सामान्य प्रशासन विभागाच्या अपर सचिव व्हि.राधा यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांची पालघर जिल्हाधिकारी पदावर बदली केल्याबाबतचा आदेश काढला.



नव्या जिल्हाधिकारी डॉ. जाखड यांनी बुधवारी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेऊन जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांची माहिती घेतली. शासनाच्या योजनांची माहिती घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर दुपारी त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला.

पालघर जिल्ह्यात आरोग्य आणि शिक्षण या दोन महत्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आदिवासी बांधवांच्या विविध समस्या सोडविण्यासोबतच त्यांच्यासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे किंवा नाही हे पाहणे महत्वाचे असून, त्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. जाखड यावेळी बोलताना स्पष्ट केले.
Comments
Add Comment

Ramdas Athawale : हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि तिला विरोध करणं योग्य नाही, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया...

मुंबई : राज्यात शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र राबण्याचा सरकारने घेतलेला निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याच

Madhuri Misal : नागरिकांना मिळणार दिलासा ! मिळकतकरासंदर्भातील प्रस्ताव महापालिकेने राज्यसरकारकडे पाठवावा...

पुणे :  मिळकत करावर दंड आणि व्याज लावला जात असल्याने राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी नागरिकांसाठी मोठा निर्णय

Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळावर प्रवाशांना भरवा लागणार युजर शुल्क

नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळ कधी सुरु होणार या प्रतिक्षेत गेल्या अनेक महिन्यांपासून नवी मुंबईकर आहेत. परंतू

Nitin Gadkari : दुचाकी चालकांकडून कोणत्याही टोल घेतला जाणार नाही, नितीन गडकरी यांची सोशल मीडियावरती पोस्ट...

मुंबई : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १५ जलै २०२५ पासून दुचाकी वाहन चालकांकडून टोल वसूल करण्यात येईल. अशा

Devendra Fadanvis 'आम्ही सर्व जनतेचे सेवक', लोणीकरांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका...

मुंबई : भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्यांच्या विधानावरुन अडचणीत वाढ

पंचवटीसह द्वारका परिसरात सलग पाचव्या दिवशी पाणीटंचाई

नागरिक त्रस्त : निलगिरी बाग केंद्रावर तांत्रिक बिघाड जैसे थे नाशिक : निलगिरी बाग जलशुद्धीकरण केंद्राला