दिवा आगासन भागात २४ अनधिकृत नळ जोडण्या खंडित; अनधिकृत टँकर भरणा केंद्रही केले बंद

  33

ठाणे महापालिकेची कारवाई


ठाणे : ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने बुधवारी दिवा-आगासन भागात २४ अनधिकृत नळ जोडण्या खंडित केल्या. तसेच, याच भागात सुरू असलेले अनधिकृत टॅंकर भरणा केंद्रही तत्काळ बंद करण्यात आले. ही कारवाई आणि तपासणी मोहीम सुरूच राहणार आहे.



महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अनधिकृत नळ जोडण्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार,अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आणि नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी दिवा-आगासन भागातील अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्याची कारवाई करण्यात आली.याच भागात सुरू असलेल्या अनधिकृत टॅंकर भरणा केंद्राचा पंप,पाईपलाईन जप्त करण्यात आली. तसेच,अनधिकृत टॅंकर भरणा केंद्र बंद करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदवण्यात येत असल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली.


टाक्या, मोटर पंप जप्त करण्यात आले.ही कारवाई परिमंडळ उपायुक्त मनीष जोशी,उपायुक्त (अतिक्रमण) शंकर पाटोळे,उपनगर अभियंता विनोद पवार, कार्यकारी अभियंता शशिकांत साळुंके, प्रशांत फिरके यांच्या उपस्थितीत मुंब्रा-दिवा प्रभाग समितीचा अतिक्रमण विभाग आणि पाणी पुरवठा विभाग यांनी संयुक्तपणेही कारवाई केली.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.