Maharashtra Weather : उन्हाळ्यात पावसाळा! ढगाळ वातावरणामुळे आश्चर्य करणारा हवामानाचा इशारा

पहा राज्यात कसं असेल तापमान?


मुंबई : चैत्र महिन्याला सुरुवात होताच राज्यातील अनेक भागांमध्ये उकाड्याची (Weather Update) वाढ झाली आहे. नागरिकांना वाढत्या उन्हाच्या झळांचा (Heat Wave) सामना करावा लागत आहे. मात्र राज्यातील काही भागांमध्ये ऐन उन्हाळ्यात पावसाच्या सरी कोसळणार (Rain Alert) असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर भारतात सातत्याने होणाऱ्या हवामान बदलासह मुंबई आणि राज्यातील वातावरणात आर्द्रता वाढण्यास सुरुवाच झाली आहे. य़ादरम्यान मराठवाड्यात चक्री वादळासारखी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे राज्याच्या बहुतांश भागांत अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळणार आहे.



शहरातील वाढत्या तापमानामुळे आज आणि उद्या मुंबईत हलका पाऊस किंवा गडगडाटी वादळे होण्याची दाट शक्यता आहे. तसेच “मराठवाडा आणि आसपासच्या भागात खालच्या ट्रॉपोस्फीअरमध्ये चक्राकार अभिसरण आहे.” त्यामुळे मुंबईत हलका पाऊस पडू शकतो, तर ठाणे सारख्या जवळच्या भागात अधिक तीव्र पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे, हवामान विभागाने सांगितले (Meteorological Department) आहे.



ठाणे आणि रायगडसाठी यलो अलर्ट 


आयएमडीने ठाणे आणि रायगडसाठी यलो अलर्ट जारी केला आहे, ज्यामध्ये ताशी ३०-४० किलोमीटर वेगाने हलक्या ते मध्यम पावसासह वारे वाहण्याची शक्यता आहे. (Mumbai Weather)



आज नाशकात ऑरेंज अलर्ट 


मंगळवारी नाशिकसह जळगावला ‘ऑरेंज’ आणि धुळ्यात पावसाचा ‘यलो ॲलर्ट’ देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना अवकाळी पावसाच्या संकटासह तापमानवाढीचासुद्धा सामना करावा लागणार आहे. पावसाची ही स्थिती पुढील चार ते पाच दिवस कायम राहणार असून यादरम्यान ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (Nashik Weather)



पुण्यातही पावसाची शक्यता (Pune Weather)


पुणे शहरात आज ढगाळ वातावरण असल्यामुळे दुपारनंतर काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुण्यातील किमान तापमान २२ अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील. पुण्यात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहतील.


दरम्यान, बदलत्या हवामानमुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना छत्री सोबत ठेवण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. तसेच वातावरणात वारंवार होत असलेल्या बदलांमुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत जास्त काळजी घेण्याची गरज आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

Comments
Add Comment

Jayant Patil : अजित दादांची 'ती' इच्छा अधुरीच...राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत जयंत पाटलांचा मोठा खुलासा!

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी पोकळी

Amravati News : आयआरबीची मलमपट्टी, प्रवाशांच्या जिवाशी खेळ! नांदगाव पेठमध्ये भरवस्तीत उड्डाण पुलाचे काँक्रिट कोसळले

अमरावती : राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव पेठ येथे आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या (IRB) निकृष्ट कामाचा नमुना

Sunetra Pawar : मी सुनेत्रा अजित पवार...उद्या राज्याला मिळणार पहिली महिला उपमुख्यमंत्री ?

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील आकस्मिक निधनामुळे राज्याच्या मंत्रिमंडळात मोठी

Sunil Tatkare : सुनेत्रा पवार आणि मुलांशी चर्चा करूनच उपमुख्यमंत्रिपदावर होणार शिक्कामोर्तब; सुनील तटकरेंनी दिले स्पष्ट संकेत

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्याच्या राजकारणात आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये

राज्यातील 'आयटीआय' होणार 'स्किल डेव्हलमपेंट हब'

मंत्री मंगल प्रभात लोढा; पहिल्या टप्प्यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे जिल्ह्याचा समावेश मुंबई : पंतप्रधान

Rohit Pawar : दादा… कुठं हरवलात तुम्ही? तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय… Love U दादा! 'त्या' एका मिठीसाठी व्याकुळ झाला पुतण्या

मुंबई : राज्याच्या राजकारणातील एक शिस्तप्रिय, धडाडीचे आणि अत्यंत कार्यक्षम नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे