Maharashtra Weather : उन्हाळ्यात पावसाळा! ढगाळ वातावरणामुळे आश्चर्य करणारा हवामानाचा इशारा

पहा राज्यात कसं असेल तापमान?


मुंबई : चैत्र महिन्याला सुरुवात होताच राज्यातील अनेक भागांमध्ये उकाड्याची (Weather Update) वाढ झाली आहे. नागरिकांना वाढत्या उन्हाच्या झळांचा (Heat Wave) सामना करावा लागत आहे. मात्र राज्यातील काही भागांमध्ये ऐन उन्हाळ्यात पावसाच्या सरी कोसळणार (Rain Alert) असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर भारतात सातत्याने होणाऱ्या हवामान बदलासह मुंबई आणि राज्यातील वातावरणात आर्द्रता वाढण्यास सुरुवाच झाली आहे. य़ादरम्यान मराठवाड्यात चक्री वादळासारखी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे राज्याच्या बहुतांश भागांत अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळणार आहे.



शहरातील वाढत्या तापमानामुळे आज आणि उद्या मुंबईत हलका पाऊस किंवा गडगडाटी वादळे होण्याची दाट शक्यता आहे. तसेच “मराठवाडा आणि आसपासच्या भागात खालच्या ट्रॉपोस्फीअरमध्ये चक्राकार अभिसरण आहे.” त्यामुळे मुंबईत हलका पाऊस पडू शकतो, तर ठाणे सारख्या जवळच्या भागात अधिक तीव्र पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे, हवामान विभागाने सांगितले (Meteorological Department) आहे.



ठाणे आणि रायगडसाठी यलो अलर्ट 


आयएमडीने ठाणे आणि रायगडसाठी यलो अलर्ट जारी केला आहे, ज्यामध्ये ताशी ३०-४० किलोमीटर वेगाने हलक्या ते मध्यम पावसासह वारे वाहण्याची शक्यता आहे. (Mumbai Weather)



आज नाशकात ऑरेंज अलर्ट 


मंगळवारी नाशिकसह जळगावला ‘ऑरेंज’ आणि धुळ्यात पावसाचा ‘यलो ॲलर्ट’ देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना अवकाळी पावसाच्या संकटासह तापमानवाढीचासुद्धा सामना करावा लागणार आहे. पावसाची ही स्थिती पुढील चार ते पाच दिवस कायम राहणार असून यादरम्यान ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (Nashik Weather)



पुण्यातही पावसाची शक्यता (Pune Weather)


पुणे शहरात आज ढगाळ वातावरण असल्यामुळे दुपारनंतर काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुण्यातील किमान तापमान २२ अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील. पुण्यात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहतील.


दरम्यान, बदलत्या हवामानमुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना छत्री सोबत ठेवण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. तसेच वातावरणात वारंवार होत असलेल्या बदलांमुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत जास्त काळजी घेण्याची गरज आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

Comments
Add Comment

शतप्रतिशत भाजपसाठी रणनीती; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची राज्यस्तरीय संचालन समिती जाहीर

महत्वाच्या पदांवर अनुभवी नेतृत्व; विविध समाजघटकांसाठी स्वतंत्र संपर्क प्रमुख केशव उपाध्ये, नवनाथ बन यांच्यावर

Jalna Crime : 'तेच घडलं ज्याची भीती होती!' सख्या दीर-भावजयच्या 'लफड्याची' गावभर चर्चा; अनैतिक संबंधात अडथळा ठरलेल्या पतीचा निर्घृण खून, बदनापूर परिसरात खळबळ

जालना : अनैतिक प्रेमसंबंधात (Illegal Relationship) अडथळा ठरणाऱ्या सख्ख्या भावाचा दुसऱ्या भावानेच काटा काढल्याची एक धक्कादायक

Chhatrapati Sambhaji Nagar : गाझा मदतीच्या नावाखाली देशाच्या सुरक्षेशी खेळ? QRने गोळा केलेले लाखो रुपये थेट परदेशात; एटीएसकडून एकाला अटक, काय घडतंय नेमकं?

छत्रपती संभाजी नगर : गाझा-पॅलेस्टाईन येथे सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांच्या मदतीच्या

स्थानिक निवडणुकांतून ‘पिपाणी’ वगळली

केंद्रीय निवडणूक आयोगाचा शरद पवारांना दिलासा मुंबई  : शरद पवारांना केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी मोठा

एक कोटी लाडक्या बहिणींकडून केवायसी पूर्ण

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी प्रक्रिया १८ नोव्हेंबरपर्यंत

मुलं आणि शिक्षकांच्या मनाचा ठाव घेईल हे बालदिनाचे प्रभावी भाषण

दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस भारतभर “बालदिन” म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा दिवस आपल्या देशाचे