महापालिकेची राज्य शासनाकडे १,८१,००० दशलक्ष लिटर पाणीसाठ्याची मागणी

  71

वाढत्या उन्हाच्या झळांमुळे पाणीसाठ्यात घट


मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत सध्या ५,४५,१८३ दशलक्ष लिटर (३७.६७टक्के) इतका पाणीसाठा शिल्लक आहे. मागील काही दिवसांपासून उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढ चालल्या आहेत. परिणामी, अधिकाधिक प्रमाणात बाष्पीभवन होत असल्याने पाणीसाठा आटत चालला आहे. दुसरीकडे, पाऊस जून महिन्यात वेळेत न पडल्यास अथवा लांबणीवर पडल्यास मुंबईला दररोजचा पाणीपुरवठा सुरळीतपणे कसा काय करणार? या समस्येमुळे मुंबई महापालिकेने राज्य शासनाकडे १,८१,००० दशलक्ष लिटर इतक्या राखीव पाणीसाठ्याची मागणी आयुक्तांच्या मान्यतेने करण्यात आली आहे.


यामध्ये, भातसा तलावातून १.१३ लाख दशलक्ष लिटर तर अप्पर वैतरणा तलावातन ६८ हजार दशलक्ष लिटर म्हणजे दोन तलावातून एकूण १.८१ लाख दशलक्ष लिटर एवढ्या राखीव पाणीसाठ्याची मागणी करण्यात आली आहे. गेल्यावर्षी पालिकेने पावसाळा सुरू होण्यापूर्वीच राज्य शासनाकडून २,२८,१३० दशलक्ष लिटर इतक्या राखीव पाणीसाठ्याची मागणी केली होती. मात्र गेल्या वर्षी जून महिन्यात कमी परंतु जुलै महिन्यात चांगला पाऊस पडल्याने आणि पावसाळा १५ ऑक्टोबरपर्यंत असल्याने मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावात चांगला पाऊस पडून पाणीसाठा मुबलक प्रमाणात जमा झाला होता.



पुढील चार महिने १० दिवस पुरेल इतके पाणी


पालिकेने गतवर्षी मुंबईत ३० मे पासून प्रारंभी ५ टक्के नंतर ५ जूनपासून १० टक्के लागू केलेली पाणी कपात नंतर मागे घेण्यात आली होती. मात्र पालिकेने गतवर्षीच्या तुलनेत यंदा राखीव पाणीसाठ्यातून ४७,१३० दशलक्ष लिटर कमी म्हणजे १.८१ लाख दशलक्ष लिटर इतक्या पाणीसाठ्याची मागणी केली आहे. पावसाळा वेळेत सुरू न झाल्यास पालिका प्रशासन उपलब्ध पाणीसाठ्याची माहिती घेत आवश्यक तेवढी पाणीकपात लागू करण्यात येईल अथवा राज्य सरकारकडे अधिकचा पाणीसाठा मागवून घेण्यात येईल, असे पालिका वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.



सद्यस्थितीमध्ये सात तलावात ५,४५, १८३ दशलक्ष पाणी शिल्लक


मुंबईला अप्पर वैतरणा, मध्या वैतरणा, भातसा, मोडक सागर, तानसा, विहार आणि तुळशी या सात धरणामधून दररोज ४००० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो, तर ठाण, मिवडी आणि निजामपूर पालिका हद्दीत पालिका १८० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करते, सध्या मार्च महिना सुरू असून जून महिन्याच्या मध्यापर्यंत पालिकेला मुंबईकराना सुरळीत पाणीपुरवठा करणे भाग आहे. सध्या सात तलावात ५.४५, १८३ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा शिल्लक असून हा पाणीसाठा मुंबईला पुढील चार महिने १० दिवस पुरेल इतका आहे. त्यामुळे जर पावसाळा लांबला म्हणजे पाऊस जून महिन्यात वेळेत सुरू न झाल्यास मुंबई महापालिका राज्य शासनाकडून मागणी केलेला १,८१,००० दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा मुंबईकरांना पुरविण्यासाठी खुला करेल, अर्थात त्या राखीव पाणीसाठ्यामधून मुंबईकरांना पाणीपुरवठा करण्यात येईल.

Comments
Add Comment

शाळांमध्ये १४ ऑगस्टपासून पसायदानाचे पठण

संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुंबई (प्रतिनिधी) :

ऑनलाईन लोनच्या नावाखाली तरुणीची फसवणूक, अश्लील फोटो केले व्हायरल

मुंबई : मुंबईच्या जोगेश्वरी भागात राहणाऱ्या तरुणीची ऑनलाइन फसवणूक करून तिचे अश्लील फोटो नातेवाईकांना

इंडिगोची ‘हॅपी इंडिगो डे सेल’ घोषणा, देशांतर्गत प्रवास १,२१९ पासून तर आंतरराष्ट्रीय ४,३१९ पासून

मुंबई: इंडिगोने आपल्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘हॅपी इंडिगो डे सेल’ची घोषणा केली आहे. प्रवाशांना केवळ ₹१,२१९

या योजनेतून दर महिन्याला मिळतील ७ हजार रूपये...पाहा काय आहे ही योजना

मुंबई: भारतीय आयुर्विमा महामंडळाने महिलांसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे, 'एलआयसी विमा सखी' (LIC Bima Sakhi). ही योजना

युगेंद्र पवारांचा साखरपुडा, मुंबईत पवार कुटुंब एकत्र

मुंबई : काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या पुण्यात साखरपुडा झाला. आता अजित पवार यांचे भाऊ

मुंबईत अपघात; कार उलटली, दुभाजक ओलांडून पलिकडच्या रस्त्यावर गेली आणि...

मुंबई : रविवार म्हणजे अनेकांसाठी सुटीचा, विश्रांतीचा दिवस. यामुळे मुंबईकर निवांत असतात. पण आजच्या रविवारची