Pune News: पुणे शहरात गुरुवारी पाणी पुरवठा बंद!

  63

पुणे : पुणेकरांनो पाणी जपून वापरा. महापालिकेकडून उन्हाळ्यापूर्वीच्या तातडीच्या देखभाल दुरूस्तीसाठी येत्या गुरूवारी ( दि. ३) रोजी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि.४) रोजी सकाळी उशीरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा सुरळीत केला जाणार आहे.



प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, नवीन पर्वती जलशुध्दीकरण केंद्र (५०० एम.एल.डी.), जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र व त्या अंतर्गत सर्व प्रमुख पाण्याच्या टाक्या, पर्वती टँकर पॉईंट, भामा आसखेड जलकेंद्र, लष्कर जलकेंद्र, होळकर जलकेंद्र, वडगाव जलकेंद्र परिसर, राजीव गांधी पंपिंग कात्रज चौक परिसर (केदारेश्वर टाकी, महादेवनगर टाकी, आगम मंदिर टाकी, श्रीहरी टाकी),


खडकवासला जॅकवेल वारजे फेज क्र. १ व २, वारजे जलकेंद्र व त्या अखत्यारीतील एस.एन.डी.टी., एच.एल.आर. व टाकी परिसर चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब जीएसआर टाकी परिसर, वारजे जलकेंद्र लगत जीएसआर टाकी परिसर, खडकवासला रॉ वॉटर, गणपती माथा व जुने वारजे जलकेंद्र, एस.एन.डी.टी. (एम.एल.आर.) परिसर व चतुश्रुगी टाकी परिसर तसेच कोंढवे- धावडे जलकेंद्र व रॉ वॉटर या सर्व ठिकाणी विद्युत व पंपिंग विषयक व स्थापत्य विषयक तातडीची कामे एकाच दिवशी केली जाणार आहेत.

Comments
Add Comment

अशोक नगरमधील पालिकेच्या मैदानाला तलावाचे स्वरूप

नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही पालिकेचे दुर्लक्ष कांदिवली : कांदिवली पूर्वेला अशोक नगरमधील एकमेव असलेल्या

पुण्यात भिडे पूल दीड महिना बंद

पुणे : सदाशिवपेठेतून डेक्कन मेट्रो स्थानकात जाण्यासाठी महामेट्रोकडून भिडे पुलावरून लोखंडी पादचारी पूल

महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची

आरबीएलतर्फे विद्यार्थिनींना सायकलसह शालेय साहित्याचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे

ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री ८ वाजता

पुणे : आषाढी वारीतील संत ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री आठ वाजता होणार आहे.

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली