राज्यातील जलवाहतुकीचा चेहरामोहरा बदलणार; मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत कँडेला कंपनीसोबत महत्त्वपूर्ण बैठक

मुंबई: राज्यातील जलवाहतूक क्षेत्र अधिक अत्याधुनिक आणि वेगवान करण्यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी पावले उचलली असून, स्वीडनमधील जागतिक दर्जाची तंत्रज्ञान कंपनी ‘कँडेला’ महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक करण्यास सज्ज झाली आहे. हायड्रोफॉईल तंत्रज्ञानावर आधारित अत्याधुनिक बोटींच्या निर्मिती आणि गुंतवणुकीसंदर्भात मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात आज एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.


या बैठकीत हायड्रोफॉईल तंत्रज्ञानावर आधारित पर्यावरणापूरक आणि वेगवान जलवाहतूक बोटींच्या कराराबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्राच्या विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्याचा विचार करता, प्रवाशांना कमी वेळात आणि सुरक्षित प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी अशा प्रकारच्या अत्याधुनिक बोटींची मोठी मदत होणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यात मोठी परकीय गुंतवणूक येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.





अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा होणार अवलंब:


- बैठकीदरम्यान राज्यात जलवाहतूक क्षेत्रात नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करणे, स्थानिक रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि शाश्वत जलवाहतूक व्यवस्था उभारणे अशा विविध विषयांवर मंत्री नितेश राणे यांनी कंपनीच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.


- या बैठकीला ‘कँडेला’ कंपनीचे संस्थापक आणि सीईओ मिस्टर गुस्ताव हॅसेल्स्कॉग, मुख्य व्यावसायिक अधिकारी नकुल विराट, इक्लाईन फायनान्सचे वित्त संचालक अंशुल दवानी, रुलर एनहान्सर्स ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक अंबर आयदे आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments
Add Comment

Maharashtra Rain Alert : पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता, २३ जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई : राज्यात मान्सून (Monsoon) पुन्हा सक्रिय झाला असून पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान विभागाने (India

Ketan Agrawal Murder Case : 'खून मी नाही, त्याने केला!'... केतन अग्रवाल हत्याकांडात नवा ट्विस्ट; पोलिसही चक्रावले

Ketan Agrawal Murder Case : आधी कॉफी, मग कट? केतन हत्येपूर्वी सिया-चेतनची तासभर चर्चा

कॅफेत बसून रचला गेला होता प्लॅन? पुणे :  पुण्यातील लोहगड (Lohgad) किल्ल्यावर व्यावसायिक केतन अग्रवाल याच्या मृत्यू (Death)

Nitesh Rane : मच्छिमारांच्या सुविधांसाठी दिघी जेट्टी प्रकल्प पावसाळा संपल्यानंतर तातडीने मार्गी लावा

मुंबई, : रायगड(raigad) जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील मौजे दिघी येथील मच्छिमार जेट्टी प्रकल्प तसेच परिसरातील गाळ

अवकाळी पावसाने बाधित शेतकऱ्यांना ३३४ कोटी ९८ लाख रुपयांच्या मदतीस मंजुरी

कोकणातील आंबा व काजू उत्पादकांना मोठा दिलासा मुंबई दि.  २५ : एप्रिल व मे २०२६ या कालावधीत राज्यातील विविध

Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यांवर कारवाईची मागणी

शिवसेना महिला सेनेकडून मुंबई पोलीस आयुक्तांना निवेदन, कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा मुंबई, दि. २५ जून