‘सेल्फी’ काढून, फोटो घेऊन प्रश्न सुटत नाहीत

सुप्रिया सुळेंचे नाव न घेता अजित पवारांनी फटकारले


पुणे : ‘सेल्फी’ घेऊन आणि फोटो काढून प्रश्न सुटत नसतात, त्यासाठी काम करावे लागते. कामातील ज्ञान असावे लागते, अधिकाऱ्यांवर दबदबा असावा लागतो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता त्यांना चांगलेच फटकारले.


माळेगाव साखर कारखान्यावर आयोजित शेतकरी मेळाव्यामध्ये बोलताना पवार यांनी कारखान्याची निवडणूक नजीकच्या काळात लागण्याची शक्यता असल्याचे सूतोवाच केले, या मेळाव्यामध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने पवारांनी विरोधकांवर केलेली फटकेबाजी पहावयास मिळाली. या वेळी पवार म्हणाले, अजित पवारांमुळे माळेगाव आणि सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना कमी पैसे दिले असे विरोधक म्हणतात, परंतु सोमेश्वरचा ऊसदर काढताना मी माझे मत मांडतो, माळेगावचा ऊसदर काय निघतो? किती निघतो? हे मी पाहत नाही. माळेगावसह सोमेश्वर या दोन्हींचे मी नेतृत्व करतो, त्यामुळे मी कधीही चुकीच्या पद्धतीने वागून संस्था अडचणीत आणणार नाही. ज्यावेळी मला वाटेल की आता मला संस्था चालवता येत नाही, त्यावेळी मी सभा घेऊन सांगेन की आता मला जमत नाही. बारामती तालुक्यासाठी केवळ मागील शंभर दिवसांत १००० कोटी रुपयांचा निधी आणला आहे, यामध्ये जानाई शिरसाई जलसिंचन योजना, शिक्षण क्षेत्रातील मोठे काम तर मूलभूत सुविधा आदींचा समावेश आहे. माझ्यासारखा आमदार तुम्हाला इथून पुढे मिळणार नाही. मी उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री आहे. तसेच सहकारमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे, त्यामुळे साखर कारखानदारीला मदत माझ्याकडूनच मिळणार आहे, असेही अजित पवारांनी ठणकावले.



ज्येष्ठ नेते शरद पवार यांचेही नाव न घेता अजित पवार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्याशी माझी जवळीक आहे. केंद्रात किंवा राज्यात काही काम असेल तर ते माझ्यामार्फतच होईल. सहकार खात्यातील कामांबाबत इतर नेत्यांकडे फारसा प्रभाव नसल्याची टीका करत कारखान्याचा हजारो कोटींचा आयकर केवळ अमित शहा यांच्यामुळे माफ झाला, हे पूर्वी का झाले नाही? असा थेट सवाल करत त्यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर टीका केली.

Comments
Add Comment

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,

नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, नमो

‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानपरिषदेत मंजूर

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून चर्चेत असलेले आणि अत्यंत कडक तरतुदी असलेले ‘महाराष्ट्र

सिंधुदुर्गच्या विकासाला बुस्टर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० टक्के 'व्हिजीएफ'ला मंजुरी

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती देणारा निर्णय मंगळवारी राज्य

नंदूरबार,छत्रपती संभाजीनगरमधील गैरव्यवहारासाठी 'एसआयटी स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेत घोषणा

​मुंबई: नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील भूसंपादन गैरव्यवहार आणि छत्रपती संभाजीनगरमधील ब्रिजवाडी येथील ५४

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी