‘सेल्फी’ काढून, फोटो घेऊन प्रश्न सुटत नाहीत

  45

सुप्रिया सुळेंचे नाव न घेता अजित पवारांनी फटकारले


पुणे : ‘सेल्फी’ घेऊन आणि फोटो काढून प्रश्न सुटत नसतात, त्यासाठी काम करावे लागते. कामातील ज्ञान असावे लागते, अधिकाऱ्यांवर दबदबा असावा लागतो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता त्यांना चांगलेच फटकारले.


माळेगाव साखर कारखान्यावर आयोजित शेतकरी मेळाव्यामध्ये बोलताना पवार यांनी कारखान्याची निवडणूक नजीकच्या काळात लागण्याची शक्यता असल्याचे सूतोवाच केले, या मेळाव्यामध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने पवारांनी विरोधकांवर केलेली फटकेबाजी पहावयास मिळाली. या वेळी पवार म्हणाले, अजित पवारांमुळे माळेगाव आणि सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना कमी पैसे दिले असे विरोधक म्हणतात, परंतु सोमेश्वरचा ऊसदर काढताना मी माझे मत मांडतो, माळेगावचा ऊसदर काय निघतो? किती निघतो? हे मी पाहत नाही. माळेगावसह सोमेश्वर या दोन्हींचे मी नेतृत्व करतो, त्यामुळे मी कधीही चुकीच्या पद्धतीने वागून संस्था अडचणीत आणणार नाही. ज्यावेळी मला वाटेल की आता मला संस्था चालवता येत नाही, त्यावेळी मी सभा घेऊन सांगेन की आता मला जमत नाही. बारामती तालुक्यासाठी केवळ मागील शंभर दिवसांत १००० कोटी रुपयांचा निधी आणला आहे, यामध्ये जानाई शिरसाई जलसिंचन योजना, शिक्षण क्षेत्रातील मोठे काम तर मूलभूत सुविधा आदींचा समावेश आहे. माझ्यासारखा आमदार तुम्हाला इथून पुढे मिळणार नाही. मी उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री आहे. तसेच सहकारमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे, त्यामुळे साखर कारखानदारीला मदत माझ्याकडूनच मिळणार आहे, असेही अजित पवारांनी ठणकावले.



ज्येष्ठ नेते शरद पवार यांचेही नाव न घेता अजित पवार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्याशी माझी जवळीक आहे. केंद्रात किंवा राज्यात काही काम असेल तर ते माझ्यामार्फतच होईल. सहकार खात्यातील कामांबाबत इतर नेत्यांकडे फारसा प्रभाव नसल्याची टीका करत कारखान्याचा हजारो कोटींचा आयकर केवळ अमित शहा यांच्यामुळे माफ झाला, हे पूर्वी का झाले नाही? असा थेट सवाल करत त्यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर टीका केली.

Comments
Add Comment

Monsoon Update : विदर्भात मान्सून निराशाजनक; नागपूरसह पाच जिल्हे रेड झोनमध्ये? शेतकरी चिंताग्रस्त!

नागपूर : विदर्भात यंदा मान्सूनचे अपेक्षेपेक्षा पंधरा दिवस लवकर आगमन झाल्यानंतर शेतकरी व सामान्य जनतेला

व्होट जिहादचे उत्तर हिंदूंनी एकत्रितपणे दिले : डॉ. विखे

अ.नगर : आ.संग्राम जगताप हे एक हिंदुत्वाचा विचार आहे.त्यांना समर्थन देण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित आलो आहे.माझ्या

नांदगाव राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार

माजी नगरसेवक वाल्मीक टिळेकर यांचा शेकडो सर्मथकांसह शिवसेनेत प्रवेश नांदगाव : नांदगाव नगरपालिकेचे राष्ट्रवादी

वारीतलं रिंगण : चैतन्य फुलवणारा सोहळा!

इंदापूर : आषाढी वारी म्हणजे केवळ एक धार्मिक यात्रा नाही, ती आहे विश्वासाची, भक्तीची आणि नित्य उत्साहाची

पुण्यात दिसले इराणचे झेंडे आणि खामेनेईंचे पोस्टर

पुणे : इस्रायल - इराण दरम्यान युद्धबंदी झाल्याचे ट्रम्प यांनी जाहीर केले असले तरी दोन्ही देशांमध्ये तणाव कायम

आमदाराची मुलगी शासकीय आश्रम शाळेत शिकणार !

गडचिरोली : आजच्या काळात सर्व पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण देण्याच्या तयारीत असतात ,