‘सेल्फी’ काढून, फोटो घेऊन प्रश्न सुटत नाहीत

सुप्रिया सुळेंचे नाव न घेता अजित पवारांनी फटकारले


पुणे : ‘सेल्फी’ घेऊन आणि फोटो काढून प्रश्न सुटत नसतात, त्यासाठी काम करावे लागते. कामातील ज्ञान असावे लागते, अधिकाऱ्यांवर दबदबा असावा लागतो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता त्यांना चांगलेच फटकारले.


माळेगाव साखर कारखान्यावर आयोजित शेतकरी मेळाव्यामध्ये बोलताना पवार यांनी कारखान्याची निवडणूक नजीकच्या काळात लागण्याची शक्यता असल्याचे सूतोवाच केले, या मेळाव्यामध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने पवारांनी विरोधकांवर केलेली फटकेबाजी पहावयास मिळाली. या वेळी पवार म्हणाले, अजित पवारांमुळे माळेगाव आणि सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना कमी पैसे दिले असे विरोधक म्हणतात, परंतु सोमेश्वरचा ऊसदर काढताना मी माझे मत मांडतो, माळेगावचा ऊसदर काय निघतो? किती निघतो? हे मी पाहत नाही. माळेगावसह सोमेश्वर या दोन्हींचे मी नेतृत्व करतो, त्यामुळे मी कधीही चुकीच्या पद्धतीने वागून संस्था अडचणीत आणणार नाही. ज्यावेळी मला वाटेल की आता मला संस्था चालवता येत नाही, त्यावेळी मी सभा घेऊन सांगेन की आता मला जमत नाही. बारामती तालुक्यासाठी केवळ मागील शंभर दिवसांत १००० कोटी रुपयांचा निधी आणला आहे, यामध्ये जानाई शिरसाई जलसिंचन योजना, शिक्षण क्षेत्रातील मोठे काम तर मूलभूत सुविधा आदींचा समावेश आहे. माझ्यासारखा आमदार तुम्हाला इथून पुढे मिळणार नाही. मी उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री आहे. तसेच सहकारमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे, त्यामुळे साखर कारखानदारीला मदत माझ्याकडूनच मिळणार आहे, असेही अजित पवारांनी ठणकावले.



ज्येष्ठ नेते शरद पवार यांचेही नाव न घेता अजित पवार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्याशी माझी जवळीक आहे. केंद्रात किंवा राज्यात काही काम असेल तर ते माझ्यामार्फतच होईल. सहकार खात्यातील कामांबाबत इतर नेत्यांकडे फारसा प्रभाव नसल्याची टीका करत कारखान्याचा हजारो कोटींचा आयकर केवळ अमित शहा यांच्यामुळे माफ झाला, हे पूर्वी का झाले नाही? असा थेट सवाल करत त्यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर टीका केली.

Comments
Add Comment

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी डॉक्टर तरुणी आणि प्रशांत बनकरमध्ये काय घडलं ?

सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालय येथे कार्यरत डॉक्टर तरुणीने एका हॉटेलच्या रुममध्ये आत्महत्या केली. या प्रकरणात

Nanded Mumbai Flight : प्रतीक्षा संपली! नांदेड-मुंबई, गोवा विमानसेवेचा 'मुहूर्त' ठरला, मुंबई, गोव्याचा प्रवास तासाभरात; पहिलं उड्डाण कधी?

नांदेड : नांदेडमधील प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. बहुप्रतीक्षित नांदेड-मुंबई (Nanded-Mumbai) आणि नांदेड-गोवा

राज्यातील 'या' पाच समुद्रकिनाऱ्यांना मिळणार 'ब्लू फ्लॅग'? नामांकनासाठी किनाऱ्यांचे सुरक्षा ऑडीट होणार लवकरच पूर्ण

महाराष्ट्र: राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'ब्ल्यू फ्लॅग'साठी प्रायोगिक तत्त्वावर

कल्याण-डोंबिवलीला फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषणाचा विळखा

केडीएमसीतील नागरिक श्वसनाच्या आजाराने त्रस्त कल्याण (प्रतिनिधी) : नुकताच दिवाळी सण सर्वत्र मोठ्या उत्साहात

परतीच्या पावसाने भातपिके उद्ध्वस्त, बळीराजा आर्थिक अडचणीत

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले

मुदखेडमध्ये संतप्त शेतकऱ्याचा तहसीलदारांच्या गाडीवर हल्ला: पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका संतप्त शेतकऱ्याने तहसीलदारांच्या वाहनाची काच फोडल्याची घटना घडली,