मुंबईत सोमवारी हलक्या सरींची शक्यता!

मुंबई : उन्हाच्या झळांमधून काही प्रमाणात दिलासा मिळत, भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department - IMD) पुढील आठवड्यात मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये हलक्या सरींसह मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली आहे.


सध्या मुंबईसाठी कोणताही अधिकृत इशारा नसला तरी, थंडरशॉवरच्या शक्यतेमुळे ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी ३१ मार्च (सोमवार) ते १ एप्रिल (मंगळवार) दरम्यान येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.


शुक्रवारी IMDच्या नोंदींनुसार, सांताक्रूझ वेधशाळेत कमाल तापमान ३३.६ अंश सेल्सियस तर कुलाबा किनारपट्टी वेधशाळेत ३१ अंश सेल्सियस नोंदवले गेले. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत तापमान वाढून ३६ अंश सेल्सियसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.



मात्र, या तापमान वाढीनंतर सोमवारी हलक्या सरींसह मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. हवामान तज्ञांच्या मते, शनिवार आणि रविवार कोरडे राहतील, परंतु सोमवारी आकाश ढगाळ होऊन हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. मंगळवारी सायंकाळनंतर विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर वाढेल.


दरम्यान, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात सोमवारी आणि मंगळवारी वीजांसह मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्यामुळे IMDने येलो अलर्ट दिला आहे. महाराष्ट्रातील काही इतर जिल्ह्यांसाठीही अलर्ट जारी करण्यात आले आहेत.


या पावसाच्या सरींनंतर २ एप्रिलनंतर मुंबईचे कमाल तापमान ३३ अंश सेल्सियसपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.


उन्हाळ्यात होणाऱ्या प्री-मान्सून सरी मुंबईसाठी अनोख्या नाहीत. IMDच्या नोंदींनुसार, मार्च २०२३ मध्ये मुंबईत १७ मिमी पाऊस झाला होता, जो आतापर्यंतचा सर्वाधिक मार्च महिन्यातील पाऊस होता. त्याआधी २०१६ मध्ये १० मिमी तर २०१५ मध्ये १३ मिमी पावसाची नोंद झाली होती.

Comments
Add Comment

Kokan Railway: कोकणकरांसाठी आनंदाची बातमी! शिमग्यासाठी धावणार खास विनाआरक्षित 'ही' ट्रेन

मुंबई : कोकणकरांसाठी महत्वाचा सण म्हणजे शिमगा, राज्याच्या कानाकोपऱ्यातून चाकरमानी आपल्या गावी शिमग्यासाठी

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे,

घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' पूल

- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई :

अंगणवाडी बांधकामासाठी १५ लाखांचा निधी प्रस्तावित; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

मुंबई : राज्यातील अंगणवाड्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या 'स्मार्ट किट' खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्तेचा