मुलुंड डम्पिंग ग्राऊडवरील विल्हेवाटचे काम संथ गतीने सुरु

जूनपर्यंत प्राप्त होणार २५ एकरच जागा मोकळी


मुंबई : मुलुंड डम्पिंग ग्राऊंड येथे जमीन पुनः प्राप्त करण्यासाठी मुलुंड क्षेपणभूमी येथे जून २०२५ पर्यंत ७० लाख मेट्रीक टन इतक्या जुन्या साठलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया व विल्हेवाट लावून क्षेपणभूमीची २४ हेक्टर जमीन पुनःप्राप्त करण्याकरिता महानगरपालिकेने प्रकल्प हाती घेतला आहे. परंतु जून २०२५ पर्यंत केवळ १० हेक्टरच अर्थात २५ एकर एवढीच जागा मोकळी करून दिली जाणार आहे.

मुंबईतील मुलुंड डम्पिग ग्राऊंडवरील कचऱ्याची विल्हेवाट लावून ते जमिनसपाटीला आणण्याच्या कामाला सन २०१८ मध्ये सुरुवात झाली. हे काम पुढील सहा वर्षांमध्ये पूर्ण होऊन डम्पिंग ग्राऊंडची जागा पूर्णपणे प्राप्त व्हायला हवी होती, परंतु यासाठी नेमलेल्या कंपनीकडून कचरा विल्हेवाटीचे काम अत्यंत संथ गतीने सुरु आहे. आतापर्यंत याठिकाणी असलेल्या ७० लाख मेट्रीक टनाची विल्हेवाट लावणे अपेक्षित होते, पण २८ मार्च २०२५ पर्यंत एकूण ५५ लाख मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात यश आले आहे.



मागील ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत सुमारे ४०.९३ लाख मेट्रीक टन जुन्या साठलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करुन त्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. जानेवारी २०२५ ते मार्च २०२५ दरम्यान सुमारे १८.३७ लाख मेट्रीक टन जुन्या साठलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया व विल्हेवाट लावण्याचे नियोजित होते. परंतु आतापर्यंत एकूण ५५ लाख मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे पुढील आर्थिक वर्षांत १०.७० मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया करणे अपेक्षित मानले जात असतानाच तब्बल १८ लाख मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया करणे बाकी असल्याचीही माहिती मिळत आहे.

मुंबई पालिकेच्यावतीने हाती घेतलेल्या या प्रकल्पाचे काम जून २०२५ रोजी पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु जून २०२५ पर्यंत २४ हेक्टर पैंकी केवळ १०.१२ हेक्टर जमिनच पुनर्प्राप्त होणार आहे. त्यामुळे एकूण ५० एकर पैंकी जून २०२५ पर्यंत केवळ २५ एकरच जागा प्राप्त होणार असल्याची महिती मिळत आहे.
Comments
Add Comment

'राज ठाकरेंनी थेट मोहल्ल्यांमध्ये जाऊन मतदार याद्या तपासाव्यात'

'लोकसभेनंतर 'मत चोरीचे' आरोप का झाले नाहीत?' - मंत्री नितेश राणे यांचा राज ठाकरेंना बोचरा सवाल मुंबई: भाजपचे मंत्री

महापालिकेच्या मालमत्ता कराची ऑक्टोबर पहिल्या पंधरवड्यापर्यंत एवढी झाली वसूली, अधिकारी लागले कामाला...

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महानगरपालिकेच्या महसुलाचा महत्त्वाचा स्रोत असलेल्या मालमत्ता कराची वसूली १७ ऑक्टोबर

तलाव भरले, तरीही मुंबईत पाण्याची का समस्या, जाणून घ्या कारण!

मुंबई (सचिन धानजी): मुंबईला पाणी पुरवठा करणारे सर्व तलाव आणि धरणे काठोकाठ भरल्यानंतरही पुढील १५ दिवसांमध्येच

आता पावसाळ्यात मध्य रेल्वेच्या रुळावर पाणी साचणार नाही! भुयारी टाकी बसवण्याचा मुंबई पालिकेचा नवा प्रकल्प

मुंबई: पावसाळ्यात दरवर्षी मुंबईत अनेक सखल भागांमध्ये पाणी भरते. तसेच अती पाऊस पडल्यावर मुंबईतील रेल्वेच्या

वंदे भारत एक्स्प्रेसला ६ तास उशीर

मुंबई : वेगवान प्रवासासाठी ओळखली जाणारी वंदे भारत एक्स्प्रेस ६ तास विलंबाने धावली. वंदे भारतच्या वेळापत्रकात

भारताने प्राचीन धर्मग्रंथांची िशकवण जोपासावी: मोहन भागवत

सरसंघचालकांच्या हस्ते ‘आर्य युग विषय कोशा’चे लोकार्पण मुंबई : "भारताला प्राचीन विद्या आणि संस्कृतीची मोठी