मुलुंड डम्पिंग ग्राऊडवरील विल्हेवाटचे काम संथ गतीने सुरु

  59

जूनपर्यंत प्राप्त होणार २५ एकरच जागा मोकळी


मुंबई : मुलुंड डम्पिंग ग्राऊंड येथे जमीन पुनः प्राप्त करण्यासाठी मुलुंड क्षेपणभूमी येथे जून २०२५ पर्यंत ७० लाख मेट्रीक टन इतक्या जुन्या साठलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया व विल्हेवाट लावून क्षेपणभूमीची २४ हेक्टर जमीन पुनःप्राप्त करण्याकरिता महानगरपालिकेने प्रकल्प हाती घेतला आहे. परंतु जून २०२५ पर्यंत केवळ १० हेक्टरच अर्थात २५ एकर एवढीच जागा मोकळी करून दिली जाणार आहे.

मुंबईतील मुलुंड डम्पिग ग्राऊंडवरील कचऱ्याची विल्हेवाट लावून ते जमिनसपाटीला आणण्याच्या कामाला सन २०१८ मध्ये सुरुवात झाली. हे काम पुढील सहा वर्षांमध्ये पूर्ण होऊन डम्पिंग ग्राऊंडची जागा पूर्णपणे प्राप्त व्हायला हवी होती, परंतु यासाठी नेमलेल्या कंपनीकडून कचरा विल्हेवाटीचे काम अत्यंत संथ गतीने सुरु आहे. आतापर्यंत याठिकाणी असलेल्या ७० लाख मेट्रीक टनाची विल्हेवाट लावणे अपेक्षित होते, पण २८ मार्च २०२५ पर्यंत एकूण ५५ लाख मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात यश आले आहे.



मागील ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत सुमारे ४०.९३ लाख मेट्रीक टन जुन्या साठलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करुन त्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. जानेवारी २०२५ ते मार्च २०२५ दरम्यान सुमारे १८.३७ लाख मेट्रीक टन जुन्या साठलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया व विल्हेवाट लावण्याचे नियोजित होते. परंतु आतापर्यंत एकूण ५५ लाख मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे पुढील आर्थिक वर्षांत १०.७० मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया करणे अपेक्षित मानले जात असतानाच तब्बल १८ लाख मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया करणे बाकी असल्याचीही माहिती मिळत आहे.

मुंबई पालिकेच्यावतीने हाती घेतलेल्या या प्रकल्पाचे काम जून २०२५ रोजी पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु जून २०२५ पर्यंत २४ हेक्टर पैंकी केवळ १०.१२ हेक्टर जमिनच पुनर्प्राप्त होणार आहे. त्यामुळे एकूण ५० एकर पैंकी जून २०२५ पर्यंत केवळ २५ एकरच जागा प्राप्त होणार असल्याची महिती मिळत आहे.
Comments
Add Comment

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘अरण्य’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच मराठी चित्रपट ‘अरण्य’ च्या पोस्टरचे अनावरण करण्यात

मुंबईत अंधेरीमध्ये पाच मजली मासळी बाजार बांधणार ?

मुंबई : मुंबईत अंधेरीमध्ये जे. बी. नगर येथे पाच मजली मासळी बाजार बांधण्याचा १३८ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरी

आरक्षणाची लढाई लढावी, पण... नितेश राणेंचा जरांगेंना इशारा

मुंबई : जे रक्ताने मराठे असतात ते कधीही आईविषयी अपशब्द वापरणार नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण आदर्श

मुख्यमंत्र्यांच्या आईबाबत मनोज जरांगेंचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात

मुंबई : मराठा समाजाला सरसकट कुणबी दर्जा आणि आरक्षण द्या, अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी समाजबांधवांना

मरिनड्राईव्हच्या समुद्रात तरुणीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ

मुंबई: मुंबईच्या मरिनड्राईव्ह परिसरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नरिमन पॉईंट येथील समुद्रात एका तरुणीचा

मुंबईत यंदा २७५ कृत्रिम तलावांची निर्मिती

मुंबई (खास प्रतिनिधी) : श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये व्हावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून