Mamata Banerjee : ऑक्सफर्ड विद्यापीठात ममता बॅनर्जींच्या भाषणावेळी 'परत जा' अशी घोषणाबाजी

इंग्लंड : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी इंग्लंडमध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातील केलॉग महाविद्यालयात विशेष कार्यक्रमात भाषण करण्यासाठी उपस्थित होत्या. ममता बॅनर्जी यांचे भाषण सुरू होताच काही नागरिकांनी घोषणाबाजी सुरू केली आणि भाषणात वारंवार व्यत्यय आणला. ममता बॅनर्जी परत जा अशा स्वरुपाच्या घोषणा याप्रसंगी देण्यात आल्या. घोषणा देणाऱ्यांनी ते मूळचे पश्चिम बंगालचे रहिवासी असल्याचे सांगितले. पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर सुरू असलेला अन्याय आणि मुसलमानांचे वाढते लांगुलचालन याचा निषेध म्हणून ममता बॅनर्जींच्या भाषणावेळी परत जा अशा घोषणा दिल्याचे आंदोलकांनी सांगितले.



ममता बॅनर्जी विरोधक ते सत्ताधारी हा प्रवास कसा केला याविषयी सांगत होत्या. हे भाषण सुरू असतानाच पश्चिम बंगालमधील गुंतवणूक या संदर्भात काही प्रश्न उपस्थित करण्यात आले. या प्रश्नांना उत्तर देण्याआधीच पश्चिम बंगालमधील आर. जी. कार रुग्णालयातील बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणात आतापर्यंत काय झाले आहे आणि पीडितेला न्याय कधी मिळणार ? अशा स्वरुपाचे प्रश्न विचारण्यास सुरुवात झाली. लागोपाठ आलेल्या या प्रश्नांमुळे संतापलेल्या ममता बॅनर्जींनी प्रश्न विचारणाऱ्यांना कोणता राजकीय अजेंडा पुढे करण्यासाठी प्रश्न विचारत आहात, असा प्रतिप्रश्न केला. विरोधक होते त्यावेळी सत्ताधाऱ्यांनी माझ्यावर हल्ले केले. या हल्ल्यांतून तावून सुलाखून बाहेर पडले आणि सत्ता काबीज केली. प्रश्न विचारणाऱ्यांनी आणि ते ज्या पक्षाचे आहेत त्यांच्या लोकांनी आधी स्वतःची राजकीय स्थिती भक्कम करावी नंतर प्रश्न विचारावे असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. ममता बॅनर्जी यांचे हे वक्तव्य आले त्याच सुमारास परत जा अशी घोषणाबाजी सुरू झाली. ममता बॅनर्जी परत जा या घोषणा देत वारंवार भाषणात व्यत्यय आणण्यास सुरुवात झाली.



घोषणाबाजी सुरू होती त्यावेळी केलॉग महाविद्यालयातील कार्यक्रमात प्रेक्षकांमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली उपस्थित होता. पण गांगुलीने हस्तक्षेप करुन मुख्यमंत्री अथवा आंदोलक यापैकी कोणाच्याही बाजूने बोलणे टाळले. भाषणात व्यत्यय आणण्यास सुरुवात झाल्यावर आणखी संतापलेल्या ममता बॅनर्जी यांनी मी कोणत्याही एका जातीची अथवा धर्माची बाजू कधी घेतली नाही आणि घेणार नाही, असे सांगितले. सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी काम करत असल्याचे ममता बॅनर्जी म्हणाल्या.
Comments
Add Comment

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात

'Nanda Devi' Ship : तब्बल ४६,५०० मेट्रिक टनहुन अधिक एलपीजी घेऊन ‘नंदा देवी’ जहाज भारतात दाखल

‘शिवालिक’नंतर आणखी एक एलपीजी टँकर भारतात दाखल झाला आहे. ‘नंदा देवी’ हे जहाज आज म्हणजेच मंगळवार १७ मार्च रोजी

एनआयएची मोठी कारवाई, युक्रेनच्या सहा आणि अमेरिकेच्या एका नागरिकाला अटक

नवी दिल्ली : कोलकाता विमानतळ येथे अमेरिकन नागरिकाला तर लखनऊ विमानतळ आणि दिल्ली विमानतळ येथे प्रत्येकी तीन

West Bengal ED Raid : पश्चिम बंगालमध्ये ईडीअँक्शन मोडवर; एकूण १० ठिकाणी छापेमारी

- अवैध कॉल सेंटरद्वारे फसवणुकीचे प्रकरण पश्चिम बंगालमध्ये अंमलबजावणी संचनालयाने (ईडी) सोमवारी (१६ मार्च) मोठी

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक, भाजपची १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शुभेंदू अधिकारी

बिहारमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत एनडीएच्या पाच उमेदवारांचा दणदणीत विजय

पाटणा : बिहारमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत एनडीएच्या पाच उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आहे. विधानसभेनंतर