कशेडीच्या दोन्ही बोगद्यात ऐन उन्हाळ्यात गळती सुरू

खेड: मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्यायी असलेल्या दोन्ही बोगातून ऐन उन्हाळ्यात गळती सुरू झाली आहे. दीड वर्षांपूर्वी सुरू झालेल्या एका बोगद्यातील गळती थोपा थोपवण्याचा राष्ट्रीय महामार्गाचा प्रयत्न फोल ठरला असून नुकताच सुरू झालेल्या दुसऱ्या बोगद्यातून देखील पाण्याची गळती सुरूच आहे.


बोगद्यातील कामांवर कोट्यवधी रुपयांचा चुराडा करुनही गळती थांबता थांबेना झाल्या आहेत. गळती रोखण्यासाठी 'प्रकटींग'चा अवलंबही फोलच ठरल्याने वाहनचालकांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यामुळे बोगद्यातून प्रवास करणाऱ्या दुचाकी चालकांचा प्रवास हा रखडतच राहणार असून दोन्ही बोगधात ठिकठिकाणी लागलेल्या या गळतीने वाहनचालकांच्या गतिमान प्रवासात 'विघ्न' निर्माण झाले आहे.


बोगद्यातील गळती रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने ग्राऊंटींगचा अवलंब केला. यासाठी २० हजाराहून अधिक सिमेंट बंगांचा वापर केल्यानंतर गळती थोपवण्यात यश आल्याचा दावाही राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून केला जात होता. मात्र बोगद्यात गळतीचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे महामार्ग खात्याची डोकेदुखी वाढली आहे.

Comments
Add Comment

कोकणाच्या विकासासाठी भाजपचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; जयगड बंदर बनणार अर्थव्यवस्थेचं केंद्र

रत्नागिरी: मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते नितेश राणे

रत्नागिरी नाचणेत मुलाकडून आईचा खून, खून करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

गणेशोत्सवाच्या उत्साहात रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. शहरातील नाचणे येथे पोटच्या मुलाने आपल्या आईचा निर्घृण

खेडमधील खवटी गावाजवळ खासगी बस आणि कारचा भीषण अपघात, तिघेजण गंभीर जखमी

खेडमधील खवटी गावाजवळ मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास खासगी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात