कशेडीच्या दोन्ही बोगद्यात ऐन उन्हाळ्यात गळती सुरू

खेड: मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्यायी असलेल्या दोन्ही बोगातून ऐन उन्हाळ्यात गळती सुरू झाली आहे. दीड वर्षांपूर्वी सुरू झालेल्या एका बोगद्यातील गळती थोपा थोपवण्याचा राष्ट्रीय महामार्गाचा प्रयत्न फोल ठरला असून नुकताच सुरू झालेल्या दुसऱ्या बोगद्यातून देखील पाण्याची गळती सुरूच आहे.


बोगद्यातील कामांवर कोट्यवधी रुपयांचा चुराडा करुनही गळती थांबता थांबेना झाल्या आहेत. गळती रोखण्यासाठी 'प्रकटींग'चा अवलंबही फोलच ठरल्याने वाहनचालकांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यामुळे बोगद्यातून प्रवास करणाऱ्या दुचाकी चालकांचा प्रवास हा रखडतच राहणार असून दोन्ही बोगधात ठिकठिकाणी लागलेल्या या गळतीने वाहनचालकांच्या गतिमान प्रवासात 'विघ्न' निर्माण झाले आहे.


बोगद्यातील गळती रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने ग्राऊंटींगचा अवलंब केला. यासाठी २० हजाराहून अधिक सिमेंट बंगांचा वापर केल्यानंतर गळती थोपवण्यात यश आल्याचा दावाही राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून केला जात होता. मात्र बोगद्यात गळतीचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे महामार्ग खात्याची डोकेदुखी वाढली आहे.

Comments
Add Comment

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या

Narayan Rane : "आमच्यात कटुता असली तरी जिव्हाळा कायम!" भास्कर जाधवांनी व्यक्त केली राणे साहेबांबद्दलची कृतज्ञता;

'त्या' घटनेनंतर जुन्या आठवणींना उजाळा चिपळूण : राजकारणात एकमेकांवर तुटून पडणारे नेते, वैयक्तिक आयुष्यात

फोंडाघाटचा ‘किऱ्याचा आंबा’ होणार जमीनदोस्त

कणकवली : फोंडाघाट, हवेलीनगर येथील शेकडो वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक अधिष्ठान आणि मार्गदर्शक आख्यायिका, तसेच

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

उद्यापर्यंत ब्लॉक रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून पुढील

‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र मानांकनांसाठी गुजरात प्रयत्नशील

मुंबई : हापूस आंबा म्हटले की, कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्या

Anganewadi Jatra 2026 : भराडी देवीचा 'कौल' मिळाला! लाखो भाविकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण