Chhatrapati Sambhajinagar News : दत्तक घेतलेल्या ४ वर्षीय चिमुरडीला आई वडिलांनी संपवलं!

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजी नगरच्या सिल्लोड येथे धक्कादायक घटना घडली आहे. ४ मुलानंतर मुलगी नाही म्हणून दत्तक घेतलेल्या ४ वर्षीय मुलीला सावत्र आई वडिलांनी मारहाण करुन तिचे हात-पाय मोडेपर्यंत तिला मारहाण करत तिची हत्या केली. या घटनेनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.




मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजी नगरच्या सिल्लोड येथे राहणाऱ्या फौजिया शेख फईम आणि शेख आयुब फईम या नराधम आई वडिलांनी ४ मुलांनंतरही मुलगी होत नसल्याने एका चार वर्षीय मुलीला जालना येथून ५ हजाराला दत्तक घेतले होते. पतीच्या या निर्णयाला पत्नीचा विरोध होता. त्यामुळे या दोघांमध्ये खटके उडायला लागले होते. दोघांमधील वादाचं कारण ठरत असलेल्या चिमुरडीला दोघांनाही मारहाण करण्यास सुरुवात केली. या दांपत्याने त्या चिमुरडीचा अमानुष छळ सुरू केला. नराधम आई वडील तिला उपाशी ठेवायचे. बुधवारी रात्रीही जळत्या लाकडाने तिच्या पूर्ण अंगावर दोघांनी चटके दिले. तिचे हात व तळ पाय सांध्यातून मोडेपर्यंत तिला मारहाण करण्यात आली. त्यानंतर तिच्या डोक्यात व पाठीत वजनदार वस्तूने जोरात वार करुन तिला गंभीर जखमी करण्यात आलं. विव्हळत असलेल्या चिमुकलीने अखेर बुधवारी (दि २६) मध्यरात्री तीन वाजता प्राण सोडले. या नराधम आई वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये