Ration Card e-KYC : उरले काही दिवस! रेशनकार्ड धारकांनो लगेचच करा ई-केवायसी; अन्यथा...

  95

मुंबई : केंद्र सरकारकडून (Central Government) देशातील नागरिकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. यामधेच रेशनकार्ड (Ration Card) योजनेचा समावेश असून या योजनेतून गरीब आणि गरजू नागरिकांना अन्नधान्य पुरवण्यात येते. मात्र दैनंदिन जीवनातील आवश्यक वस्तू गरजूंनाच मिळाव्या. त्याचा गैरवापर होऊ नये म्हणून सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने याच रेशनकार्ड धारकांसाठी ई-केवायसी अनिवार्य केली आहे. या इ-केवायसी प्रक्रियेला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून शिधाधारकांनी लवकरात लवकर इ-केवायसी करा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



शिधापत्रिकेवरील नाव योग्य असल्याची खात्री करण्यासाठी ही प्रक्रिया असून ई-केवायसीसाठी (Ration Card e-KYC) सरकारने ३१ मार्च २०२५ पर्यंतची मुदत दिली आहे. आता अंतिम मुदतीसाठी काहीच दिवस बाकी आहेत. त्यामुळे शिधापत्रिकेचा लाभ घेणाऱ्यांनी त्वरीत ई-केवायसी करून घ्यावी. अन्यथा लाभ बंद होण्यासोबतच शिधापत्रिकेतून नाव देखील कमी केले जाऊ शकते, असे सांगण्यात आले आहे.



रायगडमधील ३० टक्के लाभार्थ्यांची ई-केवायसी अपूर्ण 


राज्यातील रेशन कार्ड धारकांना (Ration Card) घरबसल्या ई-केवायसी करण्यासाठी अ‍ॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे. परंतु अद्यापही रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये ३०.९२ टक्के लाभार्थ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही. अनेक कार्डधारकांना अंगठ्याचे स्कॅनिंग ई-पॉस मशीनवर होत नसल्यामुळे त्रास होत होता. आता त्यावर तोडगा म्हणून ई-पॉस मशीनवर डोळे स्कॅन करून ई-केवायसी पूर्ण करण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी त्यांच्या जवळच्या रेशन दुकानात जाऊन लवकरात लवकर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे यांनी केले आहे.


दरम्यान, सुरुवातीला केंद्र सरकारकडून ई-केवायसी प्रक्रियेसाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, नागरिकांच्या सोयीसाठी ती वाढवून ३१ मार्चपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा त्यांना रेशनचे धान्य मिळण्यमध्ये अडचण येऊ शकते. (Ration Card e-KYC)

Comments
Add Comment

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती

Eknath Shinde : लाडक्या बहिणीला 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन'चा आधार! उपचारासाठी किडनीग्रस्त महिलेला एकनाथ शिंदेंनी केली मदत

जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित

प्रसाद ओक यांना निळू फुले कृतज्ञता सन्मान जाहीर

पुणे : निळू फुले यांचे कुटुंबीय व बेलवलकर सांस्कृतिक मंच यांच्या वतीने दरवर्षी प्रदान करण्यात येणारा निळू फुले