Ration Card e-KYC : उरले काही दिवस! रेशनकार्ड धारकांनो लगेचच करा ई-केवायसी; अन्यथा...

  108

मुंबई : केंद्र सरकारकडून (Central Government) देशातील नागरिकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. यामधेच रेशनकार्ड (Ration Card) योजनेचा समावेश असून या योजनेतून गरीब आणि गरजू नागरिकांना अन्नधान्य पुरवण्यात येते. मात्र दैनंदिन जीवनातील आवश्यक वस्तू गरजूंनाच मिळाव्या. त्याचा गैरवापर होऊ नये म्हणून सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने याच रेशनकार्ड धारकांसाठी ई-केवायसी अनिवार्य केली आहे. या इ-केवायसी प्रक्रियेला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून शिधाधारकांनी लवकरात लवकर इ-केवायसी करा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



शिधापत्रिकेवरील नाव योग्य असल्याची खात्री करण्यासाठी ही प्रक्रिया असून ई-केवायसीसाठी (Ration Card e-KYC) सरकारने ३१ मार्च २०२५ पर्यंतची मुदत दिली आहे. आता अंतिम मुदतीसाठी काहीच दिवस बाकी आहेत. त्यामुळे शिधापत्रिकेचा लाभ घेणाऱ्यांनी त्वरीत ई-केवायसी करून घ्यावी. अन्यथा लाभ बंद होण्यासोबतच शिधापत्रिकेतून नाव देखील कमी केले जाऊ शकते, असे सांगण्यात आले आहे.



रायगडमधील ३० टक्के लाभार्थ्यांची ई-केवायसी अपूर्ण 


राज्यातील रेशन कार्ड धारकांना (Ration Card) घरबसल्या ई-केवायसी करण्यासाठी अ‍ॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे. परंतु अद्यापही रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये ३०.९२ टक्के लाभार्थ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही. अनेक कार्डधारकांना अंगठ्याचे स्कॅनिंग ई-पॉस मशीनवर होत नसल्यामुळे त्रास होत होता. आता त्यावर तोडगा म्हणून ई-पॉस मशीनवर डोळे स्कॅन करून ई-केवायसी पूर्ण करण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी त्यांच्या जवळच्या रेशन दुकानात जाऊन लवकरात लवकर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे यांनी केले आहे.


दरम्यान, सुरुवातीला केंद्र सरकारकडून ई-केवायसी प्रक्रियेसाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, नागरिकांच्या सोयीसाठी ती वाढवून ३१ मार्चपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा त्यांना रेशनचे धान्य मिळण्यमध्ये अडचण येऊ शकते. (Ration Card e-KYC)

Comments
Add Comment

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपी ताब्यात

नागपूर:  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निर्मानाधीन निवासस्थान बॉम्बने उडवण्याची

मनोज जरांगे असलेल्या लिफ्टचा अपघात, लिफ्ट जमिनीवर कोसळली

बीड : मराठा नेते मनोज जरांगे पाटील ज्या लिफ्टमध्य होते त्या लिफ्टचा अपघात झाला. लिफ्ट जमिनीवर धाडकन कोसळली. मनोज

‘सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय?’

अकोला : काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य आणि हाती सिगारेट घेतलेला व्हिडीओ व्हायरल झाल्याने चर्चेत असलेल्या

MSBTE च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! निकाल रोखून ठेवलेल्या, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी - लोढा

मुंबई: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या जुलै २०२५ या सत्रातील एक वर्ष कालावधी अभ्यासक्रमाच्या निकाल

श्री तुळजाभवानी मंदिरातील तलवार चोरीच्या बातम्या खोट्या, अफवांवर विश्वास ठेवू नका!

धाराशिव : श्री तुळजाभवानी मंदिरात सध्या जतन,संवर्धन व विविध विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून,या अनुषंगाने