Mumbai Water : मुंबईतील ७ तलावांत ४२ टक्के पाणीसाठा

मुंबई : मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये ४२ टक्केपेक्षा जास्त पाणीसाठा असल्यामुळे मुंबईकरांना यंदा जुलै अखेरपर्यंत पाण्याची चिंता नाही. या तलावांमधून ठाणे, भिवंडी शहरासह अन्य गावांना पाणीपुरवठा करूनही तलावाच्या पाणलोट क्षेत्रात मुंबईकरांना १३० ते १३५ दिवस पुरेल इतके पाणी उपलब्ध होणार आहे.



तलावाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा सुमारे ५७ हजार दशलक्ष लिटरपेक्षा जास्त पाणीसाठा आहे. २०२४ मध्ये २४ मार्चपर्यंत पाणीसाठा ३७ टक्के होता. यंदा ४२ टक्केपेक्षा जास्त आहे. शहराला दररोज १८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा तलावाच्या पाणलोट क्षेत्रात ४२.१३ टक्के म्हणजे ३ लाख २ हजार दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा शिल्लक आहे. मोडक सागर व तानसा तला वगळता अन्य तलावातील पाणीसाठाही ४६ ते ५५ टक्के इतका आहे.


सातही तलावाचा आढावा घेतला असता या तलावामध्ये सुमारे ६ लाख १६ हजार ५४६ दशलक्ष लीटर इतका पाणीसाठा आहे. मुंबईला रोज ३९५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा पाहता, हा साठा १५६ दिवस पुरेल इतका आहे. पण या तलावातील काही पाणी ठाणे व भिवंडीसह काही गावांना दिले जाते. त्यामुळे मुंबईकरांच्या वाट्याला १२० ते १२५ दिवस पाणी येणार आहे. तरीही पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

Comments
Add Comment

Chief Minister Devendra Fadnavis : इचलकरंजीला शाश्वत पाणीपुरवठ्यासंदर्भात लवकरच निर्णय जाहीर करण्यात येणार

मुंबई : इचलकरंजी शहर आणि परिसराच्या दीर्घकालीन; तसेच शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत राज्य शासन

Minister Aditi Tatkare : बालकांना पोषणासह चविष्ट आहार

घरपोच आहारात नव्या पाककृतींचा होणार समावेश मुंबई : अंगणवाडीतील बालकांसह गरोदर महिला, स्तनदा माता तसेच

Mumbai Central Railway : "मी मराठीत बोलणारच नाही!" मुंबई सेंट्रलवर रेल्वे कर्मचाऱ्याची अरेरावी; संतापजनक व्हिडिओ व्हायरल!

मुंबई : महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत (Mumbai Central Railway Counter) भाषेच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा नवा वाद निर्माण

Asish Shelar : अतिरिक्त शिक्षकांचे मुंबईतच समायोजन करा

मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांचे मुंबई महापालिकेला निर्देश मुंबई: अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना

Health Minister Prakash Abitkar : महात्मा फुले आणि आयुष्मान भारत योजनेच्या रुग्णांना मिळणार ‘वेलकम किट’

आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर; मंजुरीसाठी लागणारा कालावधी कमी करण्याबाबत सकारात्मक मुंबई : राज्य सरकारच्या

Mumbai Crime : मुंबईत ऑटोरिक्षा चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 12 रिक्षांसह दोन आरोपी अटकेत

मुंबई : खेरवाडी पोलीस ठाण्याच्या (Kherwadi Police ) गुन्हे प्रकटीकरण पथकाने ऑटोरिक्षा चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत