Mumbai Water : मुंबईतील ७ तलावांत ४२ टक्के पाणीसाठा

मुंबई : मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये ४२ टक्केपेक्षा जास्त पाणीसाठा असल्यामुळे मुंबईकरांना यंदा जुलै अखेरपर्यंत पाण्याची चिंता नाही. या तलावांमधून ठाणे, भिवंडी शहरासह अन्य गावांना पाणीपुरवठा करूनही तलावाच्या पाणलोट क्षेत्रात मुंबईकरांना १३० ते १३५ दिवस पुरेल इतके पाणी उपलब्ध होणार आहे.



तलावाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा सुमारे ५७ हजार दशलक्ष लिटरपेक्षा जास्त पाणीसाठा आहे. २०२४ मध्ये २४ मार्चपर्यंत पाणीसाठा ३७ टक्के होता. यंदा ४२ टक्केपेक्षा जास्त आहे. शहराला दररोज १८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा तलावाच्या पाणलोट क्षेत्रात ४२.१३ टक्के म्हणजे ३ लाख २ हजार दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा शिल्लक आहे. मोडक सागर व तानसा तला वगळता अन्य तलावातील पाणीसाठाही ४६ ते ५५ टक्के इतका आहे.


सातही तलावाचा आढावा घेतला असता या तलावामध्ये सुमारे ६ लाख १६ हजार ५४६ दशलक्ष लीटर इतका पाणीसाठा आहे. मुंबईला रोज ३९५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा पाहता, हा साठा १५६ दिवस पुरेल इतका आहे. पण या तलावातील काही पाणी ठाणे व भिवंडीसह काही गावांना दिले जाते. त्यामुळे मुंबईकरांच्या वाट्याला १२० ते १२५ दिवस पाणी येणार आहे. तरीही पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Alert : राज्यात पुन्हा बदलणार हवामान; मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने (Rain) काहीशी उघडीप घेतली असली तरी आता पुन्हा पावसासाठी पोषक

Mumbai Garbage Collection : भायखळा ते शीव पर्यंतचा कचरा उचलण्याची जबाबदारी अखेर मेट्रो वेस्टवर

कचरा खासगीकरणाचा प्रस्ताव दोनदा फेटाळल्यानंतर प्रशासनाने घेतली भूमिका Byculla : एफ उत्तर, एफ दक्षिण आणि ई विभागातील

Tree Pruning : वृक्ष छाटणीचे काम करताना वृक्षतज्ज्ञांची नियुक्ती करावी

चेंबूर घटनेनंतर चौकशी समितीने सूचवल्या शिफारशी Mumbai: मुंबईत झाडांची दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आता चौकशी

Tree Protection Rules : यापुढे रस्ते कामांसह इतर प्रकल्पांच्या खोदकाता झाडांभोवती जेसीबी,पोकलेन वापरण्यास बंदी

 Mumbai: मुंबईतील कुठल्याही उपयुक्तता संस्थासाठी मग रस्ते असेल वा पर्जन्य जलवाहिनी, मलवाहिनींसह इतर कामांसाठी

BMC News : प्रत्येक प्रकल्पासाठी पावसाळापूर्व तयारीच्या अनुषंगाने स्वतंत्र एसओपी

मोर्शी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेचे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आणि डम्पिंग ग्राऊंडवरील

Organ Donation Awareness : अवयवदानाचा संकल्प करत आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी साजरा केला वाढदिवस

अवयव दान चळवळीचे नेतृत्व करणार भांदिर्गे मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई: वाढदिवस म्हटला की शुभेच्छा, केक आणि