बेकायदेशीर वृक्षतोडीवर एक लाखांचा दंड - सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : मोठ्या प्रमाणातील वृक्षतोड मनुष्य हत्येहून अधिक घात आहे. त्यामुळे पर्यावरणाची हानी करणाऱ्यांवर दया दाखवू नये. बेकायदेशीरपणे कापलेल्या प्रत्येक झाडासाठी एक लाख रुपये दंड आकारण्यास सर्वोच्च न्यायलयाने मान्यता दिली. तसेच अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय बेकायदेशीरपणे झाडे तोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली पाहिजे असे सुप्रीम कोर्टाने सांगितले.


संरक्षित ताज ट्रॅपेझियम झोनमध्ये ४५४ झाडे तोडणाऱ्या व्यक्तीची दंडाविरुद्धची याचिका न्या. अभय ओक आणि न्या. उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने फेटाळून लावली. गेल्या वर्षी शिवशंकर अग्रवाल यांनी तोडलेल्या ४५४ झाडांसाठी प्रति झाड एक लाख रुपये याप्रमाणे एकूण ४ कोटी ५४ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला होता, यासंबंधीचा केंद्रीय सक्षम समितीचा (सीईसी) अहवाल न्यायालयाने स्वीकारला. अग्रवाल यांच्यातर्फे युक्तीवाद करणारे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी न्यायालयाला सांगितले की त्यांच्या अशिलाने आपली चूक मान्य केली आहे आणि माफी मागितली आहे.


वकिलांनी न्यायालयाला दंडाची रक्कम कमी करण्याची विनंती केली. ते म्हणाले की, अग्रवाल यांना केवळ त्या जमिनीवरच नव्हे तर जवळपासच्या ठिकाणीही झाडे लावण्याची परवानगी देण्यात यावी. न्यायालयाने दंडाची रक्कम कमी करण्यास नकार दिला. जवळपासच्या भागात झाडे लावण्याची परवानगी देण्यात आली.

Comments
Add Comment

Delhi Crime: पलंगाखाली सापडला खजिना, मोलकरीण ३० लाखांचे दागिने घेऊन फरार

नवी दिल्ली: द्वारका येथे एका मोलकरणीने केलेल्या मोठ्या चोरीचा उलगडा दिल्ली पोलिसांनी केला आहे. जलदगतीने कारवाई

Threat Mail : मोठी बातमी! राजधानी दिल्लीत खळबळ, संसद भवनासह ९ शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; एक मेल आला अन् थेट...

नवी दिल्ली :  देशाच्या संसदेसह राजधानीतील नऊ नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाने उडवून देण्याचा धमकीचा ईमेल आल्याने

जम्मू आणि हिमाचलमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता, हवामान खात्याने 'या' राज्यांना दिला इशारा

दिल्ली: हवामान खात्याने जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात हलका पाऊस आणि हिमवृष्टीचा इशारा दिला आहे. आयएमडीने

'देशातील नक्षलवादाचा ३१ मार्चपर्यंत समूळ नायनाट करणार'

रायपूर  : केंद्र सरकारच्या सुरक्षा-केंद्रित रणनीतीमुळे आणि पायाभूत सुविधांच्या विकासामुळे डाव्या

महाराष्ट्रात लवकरच मतदारयाद्यांची सखोल तपासणी

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने सध्या पाच राज्यांतील मतदारयाद्यांची सखोल तपासणीवर (एसआयआर) लक्ष केंद्रित

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारामुळे भारतीय कृषी उत्पादनांना तोटा नाही : शिवराज सिंह

भोपाळ : अमेरिकेसोबतच्या व्यापार करारामुळे भारतीय कृषी उत्पादनांना नुकसान होणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय कृषी