Lasalgaon Market : 'या' काळात लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव राहणार बंद

  106

लासलगाव : आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार पेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवार २८ मार्च ते मंगळवार ०१ एप्रिल या पाच दिवसांच्या कालावधीत कांदा व भुसार मालाचे लिलाव बंद राहणार आहे. मात्र या काळात भाजीपाला व द्राक्षेमणी या नाशवंत शेतमालाचे लिलाव नियमित सुरु राहतील अशी माहिती बाजार समिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.



लासलगाव व्यापारी असोसिएशनने लासलगाव बाजार समिती प्रशासनास दिलेल्या पत्रानुसार शुक्रवार दिनांक 28.03.2025 रोजी व्यापारी वर्ग बाहेरगावी जाणार असल्याने तसेच शनिवार दिनांक 29.03.2025 रोजी शनि अमावस्या,रविवार दिनांक 30.03.2025 रोजी साप्ताहिक सुट्टी,सोमवार दिनांक ३१मार्च २०२५ रोजी रमजान ईद तसेच मंगळवार दिनांक १ एप्रिल २०२५ रोजी बँक व्यवहार बंद असल्यामुळे असे एकूण पाच दिवस लासलगाव बाजार समितीत कांदा व भुसार मालाचे लिलाव बंद राहणार असुन,यादरम्यान शेतकऱ्यांनी कांदा व भुसार माल बाजार समितीत विक्री साठी आणु नये असे आव्हान बाजार समिती कडुन करण्यात आले आहे.दिनांक २ एप्रिल २०२५ पासुन बाजार समितीतील कांदा व भुसार मालचे लिलाव पुर्ववत होतील याची सर्व शेतकरी व संबंधित मार्केट घटकांनी नोंद घ्यावी.


सध्या शेतकरी कांदा काढणी करत असून तो लगेच बाजारात विक्रीसाठी आणत आहेत.लासलगाव सह जिल्ह्यातील सर्वच बाजार समितीत उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे परंतु आता सलग पाच दिवस बाजार समितीत कांद्याचे लिलाव होणार नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचण निर्माण होणार आहे.

Comments
Add Comment

Hartalika 2025: अखंड सौभाग्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी केले जाते हरतालिकेचे व्रत

मुंबई : हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांपैकी एक असलेला हरतालिका व्रताचा सण यंदा २६ ऑगस्ट २०२५ रोजी साजरा होत

Mumbai Police: मुंबई पोलिसांची कौतुकास्पद मोहीम, चोरीला गेलेले ८,००० मोबाईल परत मिळवून दिले

मुंबई: मुंबई पोलिसांनी चोरीला गेलेले मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू केली

Ganeshotsav 2025: वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने साकारले ५२ फूटी काशी विश्वनाथ मंदिर

मुंबई: दरवर्षी प्रसिध्द मंदिरांची हुबेहुब आरास साकारणाऱ्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे

पंतप्रधान मोदींची पदवी सार्वजनिक करण्याचे आदेश दिल्ली हायकोर्टाने केले रद्द

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पदवीची माहिती सार्वजनिक करण्याचे केंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी)

२५० कोटींचा अलिशान बंगला तयार, रणबीर-आलिया लवकरच करणार गृहप्रवेश

मुंबई : बॉलिवूडचे लोकप्रिय कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे स्वप्नातील घर अखेर तयार झाले आहे. गेल्या अनेक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘अरण्य’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच मराठी चित्रपट ‘अरण्य’ च्या पोस्टरचे अनावरण करण्यात