Lasalgaon Market : 'या' काळात लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव राहणार बंद

लासलगाव : आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार पेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवार २८ मार्च ते मंगळवार ०१ एप्रिल या पाच दिवसांच्या कालावधीत कांदा व भुसार मालाचे लिलाव बंद राहणार आहे. मात्र या काळात भाजीपाला व द्राक्षेमणी या नाशवंत शेतमालाचे लिलाव नियमित सुरु राहतील अशी माहिती बाजार समिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.



लासलगाव व्यापारी असोसिएशनने लासलगाव बाजार समिती प्रशासनास दिलेल्या पत्रानुसार शुक्रवार दिनांक 28.03.2025 रोजी व्यापारी वर्ग बाहेरगावी जाणार असल्याने तसेच शनिवार दिनांक 29.03.2025 रोजी शनि अमावस्या,रविवार दिनांक 30.03.2025 रोजी साप्ताहिक सुट्टी,सोमवार दिनांक ३१मार्च २०२५ रोजी रमजान ईद तसेच मंगळवार दिनांक १ एप्रिल २०२५ रोजी बँक व्यवहार बंद असल्यामुळे असे एकूण पाच दिवस लासलगाव बाजार समितीत कांदा व भुसार मालाचे लिलाव बंद राहणार असुन,यादरम्यान शेतकऱ्यांनी कांदा व भुसार माल बाजार समितीत विक्री साठी आणु नये असे आव्हान बाजार समिती कडुन करण्यात आले आहे.दिनांक २ एप्रिल २०२५ पासुन बाजार समितीतील कांदा व भुसार मालचे लिलाव पुर्ववत होतील याची सर्व शेतकरी व संबंधित मार्केट घटकांनी नोंद घ्यावी.


सध्या शेतकरी कांदा काढणी करत असून तो लगेच बाजारात विक्रीसाठी आणत आहेत.लासलगाव सह जिल्ह्यातील सर्वच बाजार समितीत उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे परंतु आता सलग पाच दिवस बाजार समितीत कांद्याचे लिलाव होणार नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचण निर्माण होणार आहे.

Comments
Add Comment

Bigg Boss Marathi Season 6: पहिल्याच 'भाऊच्या धक्क्या"वर रितेश देशमुख घेणार तन्वी आणि रुचितासोबत इतर सदस्यांची शाळा!

"तन्वी तुम्ही आहात या घराच्या तंटा क्वीन!" - रितेश देशमुख "रुचिता जामदार महाराष्ट्राने पहिल्यांदाच स्वतःला पंजा

विप्रो कंपनीचा तिमाही निकाल कमकुवत? ७% नफ्यात घसरण तरीही 'इतका' लाभांश जाहीर

मोहित सोमण: प्रसिद्ध आयटी कंपनी विप्रो (Wipro Limited) कंपनीने आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. कंपनीला तिसऱ्या तिमाहीत

जालना महापालिकेत भाजपचाच बोलबाला

जालना : जालना महानगरपालिकेवर स्वतःची सत्ता स्थापन करण्याचे भाजपचे स्वप्न अखेर पूर्ण झाले. ६५ पैकी ४१ जागा जिंकून

राज्यातील २२ मनपात राज ठाकरेंच्या मनसेला भोपळा

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुकांचे निकाल लागले. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार,

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई (प्रतिनिधी) : ज्या काँग्रेसपायी उबाठा गटाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत

भाजपच्या विजयानंतर ‘रसमलाई’चा ट्रेंड

मुंबई : महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुक निकालात भाजपने सर्वाधिक जागा जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे.