गुढीपाडव्यापासून व्यावसायिक गाड्यांवरील संदेश मराठीतूनच

  30

मंत्री प्रताप सरनाईकाचे परिवहन विभागाला निर्देश


मुंबई : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर आता राज्यात मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार सर्वत्र झाला पाहिजे यासाठी राज्य सरकार पावले उचलत आहे. प्रत्येक शाळेत मराठी भाषा सक्तीची केली आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळेतही मराठी भाषा शिकवणे बंधनकारक असणार आहे. दरम्यान, आता वाहनांबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील व्यावसायिक वाहनांवर लिहिण्यात येणारे संदेश हे मराठीत असावेत, असे निर्देश राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी परिवहन विभागाला दिले आहेत.


मराठी ही राज्याची अधिकृत राज्य भाषा आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. मराठी भाषेचे संवर्धन करणे ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे. त्यासाठीच राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात नोंदणी असलेल्या व्यावसायिक वाहनांवर सामाजिक संदेश, जाहिरात किंवा जनजागृती करणारी वाक्ये लिहिलेली असतात. बहुतांशवेळा ही वाक्ये इंग्लिश हिंदीमध्येही असतात. त्यामुळे मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारावर बंधने येतात. पण आता यापुढे अशी वाक्ये मराठी भाषेतच लिहावी. यामुळे राज्यातल्या जनतेला अधिक उपयुक्त माहिती मिळेल आणि भाषेचाही प्रचार-प्रसार होईल असं मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.


व्यावसायिक वाहनांमध्ये ट्रॅक्टर, ट्रक किंवा व्यवसायाच्या उद्देशाने खरेदी केलेल्या वाहनांचा समावेश आहे. परिवहन खात्याच्या कार्यालयांमध्ये असणाऱ्या वाहनांवरही मराठीत संदेश लिहिणे बंधनकारक असणार आहे. येत्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. राज्यात नोंदणी असलेल्या सर्व व्यावसायिक वाहनांवर असणारे सामाजिक संदेश हे मराठी भाषेत लिहावे. याबाबत मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन आयुक्तांना निर्देश दिले आहेत.

Comments
Add Comment

प्रहार आरबीआय रेपो दर विश्लेषण: रेपो दर घटला पण अर्थव्यवस्थेचे काय ? वाचा अर्थतज्ज्ञांची मते.....

प्रतिनिधी: आज रेपो दरात घट झाल्यानंतर बाजाराने उत्सव साजरा केला. विशेषतः रेपो दरात ०.५० टक्के अनपेक्षित कपात

Stock Market: रेपो दर कपातीचे बाजाराकडून 'बुल' स्वागत सेन्सेक्सची ८४५ तर निफ्टीची २७४ अंकाने उसळी !

प्रतिनिधी: आरबीआयच्या रेपो दरात कपात करण्याचा निर्णयाचे स्वागत शेअर बाजाराने जोरात सुरू केले आहे. आरबीआयच्या २५

मोठी बातमी RBI News: रेपो दरात ०.५० टक्क्यांनी कपात सर्वसामान्यांचे कर्जाचे होणार स्वस्त,११ महिने पुरेल इतके विदेशी चलनसाठा

प्रतिनिधी: आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. अखेर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने रेपो दरात ०.५० टक्क्यांनी कपात

प्रलंबित प्रश्नांसाठी माथाडींचे कामगार मंत्र्यांना साकडे

मुंबई : विविध माथाडी मंडळातील नोंदीत कामगारांच्या प्रलंबित असलेल्या प्रश्नांचे सविस्तर निवेदन महाराष्ट्र

मध्य रेल्वेच्या 'गो ग्रीन' उपक्रमाचा शुभारंभ

मुंबई :मध्य रेल्वेने जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहाने आणि पर्यावरणीय शाश्वततेला प्रोत्साहन देण्यासाठी दृढ

आर्थर रोड कारागृह पुनर्विकासाचा सुधारित प्रस्ताव सादर करावा

गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम यांचे निर्देश मुंबई:आर्थर रोड कारागृहाचा पुनर्विकास करण्याची गरज आहे. या