Budget session 2025 : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप वाजले

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Budget Session २०२५) समारोप बुधवार, २६ मार्च रोजी झाला. या अधिवेशनात विरोधकांनी आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न केला, मात्र लोकहिताच्या आणि राज्याच्या प्रगतीच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयांवर अपेक्षित चर्चा झालेली नाही. तरीही, अधिवेशनादरम्यान सरासरी दररोज ९ तास ५ मिनिटे कामकाज झाले, ही जमेची बाजू ठरली.



संविधानाच्या अमृतमहोत्सवावर चर्चा


भारतीय गणराज्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त संविधानाच्या गौरवशाली वाटचालीवर चर्चा घेण्यात आली. या चर्चेत सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही सहभाग घेतला. मात्र, चर्चेच्या वेळी एकमेकांवर संविधानाच्या पायमल्लीचे आरोप करण्याची स्पर्धा दिसून आली. चर्चेच्या उत्तरादाखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत भाषण केले, ज्याचे शिवसेना (उबाठा) ने कौतुक केले.



लाडक्या बहिणींच्या अनुदानवाढीची अपेक्षा फोल


अधिवेशनात लाडक्या बहिणींच्या अनुदानाची रक्कम १५०० रुपयांवरून २१०० रुपये करण्यात येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, हे आश्वासन पूर्ण न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.


पुढील अधिवेशन सोमवार, ३० जून २०२५ पासून सुरू होणार आहे.







अधिवेशन कालावधीतील कामकाजाचा आढावा


🔹 एकूण बैठका: १६
🔹 एकूण कामकाजाचे तास: १४६
🔹 अन्य कारणांमुळे वाया गेलेला वेळ: १ तास २५ मिनिटे
🔹 मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे वाया गेलेला वेळ: २० मिनिटे
🔹 रोजचे सरासरी कामकाज: ९ तास ७ मिनिटे


प्रश्नोत्तर आणि चर्चांचा संक्षिप्त आढावा


तारांकित प्रश्न:




  • प्राप्त प्रश्न: ६९३७




  • स्वीकृत प्रश्न: ४९१




  • उत्तरित प्रश्न: ७६




अल्पसूचना प्रश्न:




  • प्राप्त: १४




  • अस्वीकृत: १३




  • संमिलित:




लक्षवेधी सूचना:




  • प्राप्त: २५५७




  • स्वीकृत: ४४२




  • चर्चा झालेल्या: १२९




नियम ९७ अन्वये सूचना:




  • प्राप्त: ६०




  • मान्य: निरंक




  • चर्चा: निरंक




✔ शासकीय विधेयके:




  • प्रस्तापित:




  • संमत:




  • विधान परिषद संमत:




अशासकीय विधेयके:




  • प्राप्त सूचना: ४२




  • मान्य: २२




  • प्रस्तापित: २२




  • विचारात घेतलेली: निरंक




  • संमत: निरंक




शासकीय ठराव:




  • प्राप्त सूचना:




  • मान्य:




  • चर्चा झाल्या:




नियम २९३ अन्वये प्रस्ताव:




  • प्राप्त:




  • मान्य:




  • चर्चा:




अर्धा तास चर्चा:




  • प्राप्त सूचना: ५४




  • स्वीकृत: ४२




  • चर्चा झाल्या:




✔ सार्वजनिक महत्त्वाच्या बाबींवरील चर्चा:




  • प्राप्त सूचना: २०९




  • मान्य: ४८




  • चर्चा झाल्या:




अशासकीय ठराव:




  • प्राप्त: १५१




  • मान्य: ९४




  • चर्चा झाल्या:




अभिनंदन प्रस्ताव:






राजकीय संघर्ष आणि चर्चेची मर्यादा


या अधिवेशनात राजकीय संघर्ष आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रमाण अधिक होते. संविधानाच्या अमृतमहोत्सवाच्या चर्चेतही विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप करताना दिसले.


अधिवेशनात काही महत्त्वाची विधेयके संमत झाली असली, तरी लाडक्या बहिणींच्या अनुदानवाढीसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सरकार ठोस निर्णय घेऊ शकले नाही.


आता ३० जून २०२५ पासून सुरू होणाऱ्या पुढील अधिवेशनात कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले जातात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

Comments
Add Comment

Mehli Mistry Exit : टाटा समूहात मोठा भूंकप! नोएल टाटांनी करून दाखवलं; रतन टाटांच्या 'या' जवळच्या व्यक्तीची ट्रस्टमधून हकालपट्टी

मुंबई : उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांच्या निधनानंतर टाटा समूहाच्या महत्त्वाच्या धर्मादाय संस्थांमध्ये (Charitable Trusts)

बोरिवलीत २१ वर्षीय तरुणी ‘अ‍ॅग्रीमेंट रिलेशनशिप’ मध्ये; कुटुंबाची विश्व हिंदू परिषदेकडे धाव

मुंबई : मुंबईतील बोरिवली परिसरात एका २१ वर्षीय तरुणीने लग्न न करता एका मुस्लिम तरुणासोबत ‘लिव्ह-इन रिलेशनशिप

राज्यामध्ये दरदिवशी ६१ बालकांवर अत्याचार

मुंबई : राज्यात बालकांवर होत असलेल्या अत्याचाराच्या गुन्ह्यांचा आलेख चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. राष्ट्रीय

दहावी परीक्षेच्या अर्ज भरण्याची मुदतवाढ; जाणून घ्या, आता किती दिवस मिळणार अतिरिक्त संधी

10th SSC Board Exam 2026 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या

विरार ते थेट मरीन ड्राइव्हपर्यंतचा प्रवास होणार सिग्नल-फ्री

प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार मुंबई : उत्तन-वसई-विरार सी लिंक प्रकल्पाला अखेर पर्यावरण विभागाने अंतिम मान्यता

महापालिकेच्या चार रुग्णालयांची ऑक्सिजन लेव्हल वाढणार, कोविड काळातील त्या...

मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेच्यावतीने कोविड काळात निर्माण केलेल्या कोविड सेंटरमधील ऑक्सिजन टाक्यांचा