Comedian Kunal Kamra : कॉमेडियन कुणाल कामराच्या कवितेवरून राजकारण तापलं

मुंबई : स्टँडअप कॉमेडियन समय रैना वादानंतर कॉमेडियन कुणाल कामरा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कुणाल कामरा याने आक्षेपार्ह कविता सादर केली. कवितेचा हा व्हिडीओ पाहून शिवसैनिकांच्या तळपायातील आग मस्तकात गेली. त्यांनी कुणाल कामराच्या सेटची तोडफोड केली.




मिळालेल्या माहितीनुसार, कुणाल कामराने महाराष्ट्राच्या राजकारणात तीन वर्षांपूर्वी ज्या घडामोडी घडल्या त्यावर भाष्य करत एकनाथ शिंदे यांच्यावर कवितेतून निशाणा साधला. उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी कुणाल कामराचा कविता सादर करतानाचा व्हिडीओ ट्विट केला आहे. "कुणाल की कमाल. जय महाराष्ट्र", असं संजय राऊत व्हिडीओसोबत म्हणाले आहेत. त्यांच्या ट्विटला प्रत्युत्तर देत मंत्री उदय सामंत यांनी कुणाल कामरा विरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. "पूर्ण गाणं ऐकून आमचे आमदार कुणाल कामरावर एफआयआर दाखल करण्याच्या मनस्थितीत आहेत. एकनाथ शिंदे यांची बदनामी करणारे ते गाणे असेल आणि अशा पद्धतीने कुणी गाणं गाणार असेल तर आम्ही आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते कुणीही ऐकून घेणार नाहीत. त्याच्यावर पोलिसांकडून कारवाई करण्याची मागणी करु", अशी भूमिका उदय सामंत यांनी मांडली आहे. कुणाल कामराच्या कवितेचा व्हिडीओ पाहून संतापलेल्या शिवसैनिकांनी कुणाल कामराच्या सेटची तोडफोड केली. दरम्यान या घटनेचे पडसाद विधानसभेत पडणार का हे पाहण महत्त्वाचं ठरेल.




काय म्हणाला कुणाल कामरा ?


"ह्यांचं हे राजकारण आहे. परिवारवाद संपवायचा होता, कुणाचा बाप चोरुन घेतला. काय रिप्लाय असेल? मी उद्या तेंडुलकरच्या मुलाला भेटू का की, चल भाई जेवण करुयात. तेंडुलकरचं कौतुक करतो आणि सांगतो, भाई आजपासून तो माझा बाप", असं कुणाल कामरा कविता सादर केल्यानंतर मिश्किलपणे म्हणाला.

Comments
Add Comment

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे,

घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' पूल

- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई :

अंगणवाडी बांधकामासाठी १५ लाखांचा निधी प्रस्तावित; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

मुंबई : राज्यातील अंगणवाड्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या 'स्मार्ट किट' खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्तेचा

मराठी भाषेचे संवर्धन ही केवळ सरकारचीच नाही, तर प्रत्येकाची जबाबदारी - मंत्री उदय सामंत

मुंबई : "मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासन स्तरावर मराठी भाषा विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र,