Comedian Kunal Kamra : कॉमेडियन कुणाल कामराच्या कवितेवरून राजकारण तापलं

  72

मुंबई : स्टँडअप कॉमेडियन समय रैना वादानंतर कॉमेडियन कुणाल कामरा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कुणाल कामरा याने आक्षेपार्ह कविता सादर केली. कवितेचा हा व्हिडीओ पाहून शिवसैनिकांच्या तळपायातील आग मस्तकात गेली. त्यांनी कुणाल कामराच्या सेटची तोडफोड केली.




मिळालेल्या माहितीनुसार, कुणाल कामराने महाराष्ट्राच्या राजकारणात तीन वर्षांपूर्वी ज्या घडामोडी घडल्या त्यावर भाष्य करत एकनाथ शिंदे यांच्यावर कवितेतून निशाणा साधला. उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी कुणाल कामराचा कविता सादर करतानाचा व्हिडीओ ट्विट केला आहे. "कुणाल की कमाल. जय महाराष्ट्र", असं संजय राऊत व्हिडीओसोबत म्हणाले आहेत. त्यांच्या ट्विटला प्रत्युत्तर देत मंत्री उदय सामंत यांनी कुणाल कामरा विरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. "पूर्ण गाणं ऐकून आमचे आमदार कुणाल कामरावर एफआयआर दाखल करण्याच्या मनस्थितीत आहेत. एकनाथ शिंदे यांची बदनामी करणारे ते गाणे असेल आणि अशा पद्धतीने कुणी गाणं गाणार असेल तर आम्ही आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते कुणीही ऐकून घेणार नाहीत. त्याच्यावर पोलिसांकडून कारवाई करण्याची मागणी करु", अशी भूमिका उदय सामंत यांनी मांडली आहे. कुणाल कामराच्या कवितेचा व्हिडीओ पाहून संतापलेल्या शिवसैनिकांनी कुणाल कामराच्या सेटची तोडफोड केली. दरम्यान या घटनेचे पडसाद विधानसभेत पडणार का हे पाहण महत्त्वाचं ठरेल.




काय म्हणाला कुणाल कामरा ?


"ह्यांचं हे राजकारण आहे. परिवारवाद संपवायचा होता, कुणाचा बाप चोरुन घेतला. काय रिप्लाय असेल? मी उद्या तेंडुलकरच्या मुलाला भेटू का की, चल भाई जेवण करुयात. तेंडुलकरचं कौतुक करतो आणि सांगतो, भाई आजपासून तो माझा बाप", असं कुणाल कामरा कविता सादर केल्यानंतर मिश्किलपणे म्हणाला.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.