Yashwant Verma : दिल्लीत न्यायाधीशांच्या घरी आग विझवताना सापडली रोकड

एससी कॉलेजियमने केली बदलीची शिफारस


नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाच्या एका न्यायमूर्तींच्या घरात मोठ्या प्रमाणावर रोख पैसे मिळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजिअमने या न्यायमूर्तींना अलाहाबादच्या हायकोर्टात बदली करण्याची शिफारस केली आहे. यशवंत वर्मा असे या न्यायमूर्तींचे नाव असून त्यांच्या सरकारी निवासस्थानाला आग लागली होती, ही आग विझवायला गेलेल्या अग्निशमन दलाला त्यांच्या घरात मोठ्या प्रमाणावर पैशांचा साठा सापडला होता.


मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरी आग लागली तेव्हा वर्मा हे दिल्लीत नव्हते. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांना आणि अग्निशमन दलाला बोलविले. ही आग विझवत असताना एका खोलीत अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर कॅश सापडली. पोलिसांनी याची माहिती ताबडतोब त्यांच्या वरिष्ठांना दिली. तिथून सर्वोच्च न्यायालयाला याची सूचना देण्यात आली. हायकोर्टाच्या जजच्या घरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम सापडल्याने न्यायपालिकेत खळबळ उडाली आहे. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नेतृत्वात वर्मा यांची बदली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर काही न्यायमूर्तींनी त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे.



उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्धचा अहवाल आल्यानंतर वर्मा यांची बदलीची शिफारस करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने गुरुवारी (दि. २०) तातडीची बैठक घेतली आणि त्यामध्ये बदलीची शिफारस करण्यात आली. अद्याप यावर कोणताही निर्णय झालेला नाही. काही जज न्यायपालिकेची छवी चांगली ठेवण्यासाठी वर्मा यांच्या राजीनाम्याचीही मागणी करत आहे. जर वर्मा यांनी राजीनामा देण्यास नकार दिला तर सर्वोच्च न्यायालयाने १९९९ च्या प्रक्रियेनुसार तपास सुरु करावा, अशी मागणीही केली आहे. तसेच नुसती बदली केली तर न्यायपालिकेवरील लोकांचा विश्वास उडेल असेही त्यांचे म्हणणे आहे.

Comments
Add Comment

‘मी तुमच्या मुलीच्या वयाची आहे’; स्टेजवरूनच प्रांजल दहियाने गैरवर्तन करण्याऱ्या प्रेक्षकांना सुनावले खडेबोल

हरियाणा : हरियाणाची प्रसिद्ध गायिका आणि नृत्यांगना प्रांजल दहिया सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. एका लाइव्ह

टाटा–एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेसला भीषण आग, २० हून अधिक प्रवासी जखमी, १ मृत्यू

आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशातील अनाकापल्ली जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्री भीषण रेल्वे अपघात घडला.

चिनाब नदीवर जलविद्युत प्रकल्पासाठी निविदा िनघणार

पाकिस्तानचे पाणी थांबणार नवी दिल्ली : भारताने जम्मू-कश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील चिनाब नदीवर २६० मेगावॅट

राहुल बाबा, इतक्यात थकू नका; अजून बरेच पराभव पाहायचे आहेत

गृहमंत्री अमित शहा यांचा टोला अहमदाबाद : "काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वारंवार होणाऱ्या पराभवामुळे आताच थकून

पॅराग्लायडिंग करताना अपघात, पर्यटकासह दोघे आकाशातून कोसळले, एकाचा मृत्यू

बीर बिलिंग : पॅराग्लायडिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या हिमाचल प्रदेशातील 'बीर बिलिंग'मध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे.

'मन की बात'मधून पंतप्रधान मोदींनी घेतला वर्षभरातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच रविवार २८ डिसेंबर २०२५ रोजी १२९ व्या 'मन की बात'