IPL 2025 : IPLआधीच BCCIचा मोठा निर्णय! चेंडूला लाळ किंवा थुंकी लावण्यावरील बंदी उठणार

मुंबई : भारताच्या टी२० लीग स्पर्धेला २२ मार्चपासून सुरुवात होत आहे. २२ मार्चला कोलकाता आणि बंगळुरू या दोन संघांच्या सामन्याने स्पर्धेची सुरूवात होणार आहे. या स्पर्धेची सुरुवात होण्याआधी बीसीसीआयने एक महत्त्वाच्या नियमात बदल केला आहे. यंदाच्या हंगामापासून चेंडूची चकाकी कायम ठेवण्यासाठी चेंडूला लाळ किंवा थुंकी लावण्यावरील बंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला.



IPL मधील सर्व संघांच्या कर्णधारांची मुंबईत बीसीसीआय मुख्यालयात गुरुवार(दि. २०) बैठक झाली. आयपीएल संघांच्या कर्णधारांव्यतिरिक्त, फ्रँचायझींचे व्यवस्थापक देखील या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत बीसीसीआयने एका नियमाबाबत प्रस्ताव ठेवला आणि यावर अंतिम निर्णय घेण्यात आला. यंदाच्या हंगामापासून चेंडूची चकाकी कायम ठेवण्यासाठी थुंकी किंवा लाळ लावण्यावरील बंदी उठण्याचा प्रस्ताव सर्व कर्णधारांपुढे ठेवण्यात आला. बोर्डाच्या या प्रस्तावावर बहुतांश कर्णधारांनी होकार दिला. काहींनी आपला निर्णय राखून ठेवला, पण बहुमताने चेंडूला लाळ किंवा थुंकी लावण्यावरील बंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला.


आयसीसीने कोरोना काळात खबरदारीचा उपाय म्हणून चेंडूला चकाकी आणण्यासाठी वापरात येणाऱ्या लाळेवर बंदी घातली होती. संक्रमणातून पसरण्यात येणाऱ्या कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी हा नियम लागू करण्यात आला होता. मात्र आता कोरोनाची भीती जवळपास संपली आहे. त्यामुळे बीसीसीआयने ते 'जुने दिवस' परत आणण्याचा निर्णय घेतला आहे.

Comments
Add Comment

IPL 2026 : हैदराबादची चेन्नईवर १० धावांनी मात

हैदराबाद : अभिषेक शर्मा आणि हेनरिक क्लासेन यांच्या स्फोटक फलंदाजी आणि इशान मलिंगाच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर

Smruti Mandhana : स्मृती मानधना टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी भारतीय क्रिकेटपटू

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिकी महिला संघ यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला

IPL 2026 : गुजरातचा कोलकातावर पाच गडी राखून विजय

अहमदाबाद : गुजरात टायटन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा पाच गडी राखून पराभव केला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी

Mumbai Cricket Team : मुंबई क्रिकेट संघाचा ऐतिहासिक निर्णय; मुंबईचे खेळाडू होणार मालामाल, मिळणार लाखोंचा पगार

मुंबई :  मुंबईतून अधिकाधिक हिरे भारतीय क्रिकेट संघाला मिळावेत यासाठी मुंबई क्रिकेट संघटनेने हे महत्वपूर्ण पाऊल

IPL 2026 MI vs PBKS : "काही कठीण निर्णय घेण्याची गरज आली आहे - हार्दिक पांड्या" ; मुंबईच्या अंतर्गत वादाचा खेळावर परिणाम?

मुंबई : आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सची खराब कामगिरी सुरूच आहे. पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सला सात गडी राखून

IPL : मुंबई इंडियन्सचा सलग चौथा पराभव, पंजाबचा विजय, किंग्स झाले IPL टॉपर

मुंबई : पंजाब किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील अपराजित मालिका कायम राखली. गुरुवारी मुंबईच्या वानखेडे