Jaykumar Gore : मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक

  83

सातारा : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. महिलेने प्रकरण मिटवण्यासाठी ३ कोटी रुपयांची मागणी केली होती. यामधील १ कोटी खंडणीची रक्कम स्वीकारताना तिला अटक केली आहे.


या महिलेने माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत जयकुमार गोरेंवर गंभीर आरोप केले होते. जयकुमार गोरेंनी स्वत:चे ३६० नग्न फोटो पाठवल्याचे आरोप या महिलेने केला होता. यामुळे एकच खळबळ उडाली होती. दरम्यान जयकुमार गोरे यांनी या प्रकरणात त्यांना निर्दोष असल्याचा निकाल कोर्टाने दिल्याचे सांगितले होते. मात्र आता जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या या महिलेला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या महिलेने हे प्रकरण मिटवण्यासाठी ३ कोटी रुपयांची मागणी केली होती. यातील १ कोटी खंडणीची रक्कम स्वीकारताना त्या महिलेला सातारा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.



जयकुमार गोरे यांची निर्दोष मुक्तता केली होती


जयकुमार गोरे यांना महिलेला शरीराच्या काही अवयवांचे आक्षेपार्ह फोटो पाठवण्यात आल्याचा आरोप आहे. हे प्रकरण २०१७ साली न्यायालयात गेले होते. २०१९ साली न्यायालयाने आपल्याला याप्रकरणात निर्दोष मुक्त केल्याचे जयकुमार गोरे यांनी म्हटले होते. याबाबत बोलताना महिलेने म्हटले की, जयकुमार गोरे यांनी माझ्यासमोर साक्षात दंडवत घालत माफी मागितली होती. त्यामुळे मी केस मागे घेतली होती. माझ्या मागे कोणताही बोलावता धनी नाही, मी एकटी खंबीर आहे असे महिलेने म्हटले होते.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या