Jaykumar Gore : मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक

सातारा : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. महिलेने प्रकरण मिटवण्यासाठी ३ कोटी रुपयांची मागणी केली होती. यामधील १ कोटी खंडणीची रक्कम स्वीकारताना तिला अटक केली आहे.


या महिलेने माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत जयकुमार गोरेंवर गंभीर आरोप केले होते. जयकुमार गोरेंनी स्वत:चे ३६० नग्न फोटो पाठवल्याचे आरोप या महिलेने केला होता. यामुळे एकच खळबळ उडाली होती. दरम्यान जयकुमार गोरे यांनी या प्रकरणात त्यांना निर्दोष असल्याचा निकाल कोर्टाने दिल्याचे सांगितले होते. मात्र आता जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या या महिलेला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या महिलेने हे प्रकरण मिटवण्यासाठी ३ कोटी रुपयांची मागणी केली होती. यातील १ कोटी खंडणीची रक्कम स्वीकारताना त्या महिलेला सातारा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.



जयकुमार गोरे यांची निर्दोष मुक्तता केली होती


जयकुमार गोरे यांना महिलेला शरीराच्या काही अवयवांचे आक्षेपार्ह फोटो पाठवण्यात आल्याचा आरोप आहे. हे प्रकरण २०१७ साली न्यायालयात गेले होते. २०१९ साली न्यायालयाने आपल्याला याप्रकरणात निर्दोष मुक्त केल्याचे जयकुमार गोरे यांनी म्हटले होते. याबाबत बोलताना महिलेने म्हटले की, जयकुमार गोरे यांनी माझ्यासमोर साक्षात दंडवत घालत माफी मागितली होती. त्यामुळे मी केस मागे घेतली होती. माझ्या मागे कोणताही बोलावता धनी नाही, मी एकटी खंबीर आहे असे महिलेने म्हटले होते.

Comments
Add Comment

‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार'मुळे भागली ११ हजार गावांची तहान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; ७७ लाख टँकर क्षमतेचा पाणीसाठा पुनर्संचयित, ७.७३ कोटी घनमीटर गाळ

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे

Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील

भविष्य सांगता सांगता जमवली अवाढव्य संपत्ती, अशोक खरातचं साम्राज्य कुठे आणि किती?

अहिल्यानगर: महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी