Jaykumar Gore : मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक

सातारा : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. महिलेने प्रकरण मिटवण्यासाठी ३ कोटी रुपयांची मागणी केली होती. यामधील १ कोटी खंडणीची रक्कम स्वीकारताना तिला अटक केली आहे.


या महिलेने माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत जयकुमार गोरेंवर गंभीर आरोप केले होते. जयकुमार गोरेंनी स्वत:चे ३६० नग्न फोटो पाठवल्याचे आरोप या महिलेने केला होता. यामुळे एकच खळबळ उडाली होती. दरम्यान जयकुमार गोरे यांनी या प्रकरणात त्यांना निर्दोष असल्याचा निकाल कोर्टाने दिल्याचे सांगितले होते. मात्र आता जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या या महिलेला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या महिलेने हे प्रकरण मिटवण्यासाठी ३ कोटी रुपयांची मागणी केली होती. यातील १ कोटी खंडणीची रक्कम स्वीकारताना त्या महिलेला सातारा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.



जयकुमार गोरे यांची निर्दोष मुक्तता केली होती


जयकुमार गोरे यांना महिलेला शरीराच्या काही अवयवांचे आक्षेपार्ह फोटो पाठवण्यात आल्याचा आरोप आहे. हे प्रकरण २०१७ साली न्यायालयात गेले होते. २०१९ साली न्यायालयाने आपल्याला याप्रकरणात निर्दोष मुक्त केल्याचे जयकुमार गोरे यांनी म्हटले होते. याबाबत बोलताना महिलेने म्हटले की, जयकुमार गोरे यांनी माझ्यासमोर साक्षात दंडवत घालत माफी मागितली होती. त्यामुळे मी केस मागे घेतली होती. माझ्या मागे कोणताही बोलावता धनी नाही, मी एकटी खंबीर आहे असे महिलेने म्हटले होते.

Comments
Add Comment

आधी निवडणुकीचा गुलाल, मग मुलाला खांदा; नवनिर्वाचित नगरसेवकावर कोसळला दु:खाचा डोंगर

 बीड: निवडणुकीच्या विजयी गुलालात बापाला खांद्यावर घेऊन नाचला आणि मग बापानेच मुलाला खांदा दिल्याची धक्कादायक

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली

Navneet Rana : "हिंदूंनी किमान ३-४ मुलांना जन्म द्यावा"; लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा 'हुंकार', मौलाना कादरीला सडेतोड उत्तर

अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक