Purandar Airport : पुरंदर विमानतळाच्या जमिनीसाठी लवकरच मोजणी आणि सर्वेक्षण

पुणे : पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळासाठी तालुक्यातील वनपुरी, कुंभारवळण, उदाचीवाडी, एखतपूर, मुंजवडी, खानवडी आणि पारगाव मेमाणे या सात गावांतील जमिनींच्या संपादनासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करा, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. यासाठी जमिनीचे सर्वेक्षण, मोजणी करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.


पुरंदर विमानतळासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने १० मार्चला अधिसूचना जारी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर, पुण्यात सोमवारी महसूल तसेच उद्योग विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्या बैठकीत पुरंदर विमानतळाच्या भूसंपादन प्रक्रियेबाबत सविस्तर चर्चा झाली. पुरंदर तालुक्यातील सात गावांमधील २ हजार ८३२ हेक्टर क्षेत्र संपादित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.



महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ च्या कायद्यान्वये भूसंपादन प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवण्यात येणार आहे. विमानतळासाठी निश्चित केलेल्या सात गावांमधील ३ हजार ३०० सर्व्हे क्रमांकामधील जमिनींचे सर्वेक्षण करा, अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.

Comments
Add Comment

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला