कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत होणार विलीन..!

Share

संतोष राऊळ

कोकण रेल्वेला भारतीय रेल्वेत विलीन करावे अशी मागणी गेले कित्येक वर्ष माजी मुख्यमंत्री,माजी केंद्रीय मंत्री,खासदार नारायण राणे यांची आहे. कोकण रेल्वे अधिक गतिमान त्याचप्रमाणे कोकण रेल्वेचा डबल ट्रॅक निर्माण व्हावा.कोकण रेल्वेची स्थानके सुशोभित आणि अद्ययावत व्हावीत.कोकण रेल्वेच्या ट्रॅकवर कोसळणाऱ्या दरडी कायमस्वरूपी रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी प्रत्येकाची असताना,कोकण रेल्वे महामंडळ ती पूर्ण करू शकत नाही. कारण,त्यासाठी लागणारा निधी खर्च करण्याची क्षमता या महामंडळाकडे नाही. हे महामंडळ भारतीय रेल्वेत विलीन केल्यास त्यावर अधिकचा निधी खर्च करून केला जाऊ शकतो आणि तसा निधी खर्च करण्यासाठी आणि याचा विकास होण्यासाठी चारही राज्यांची संमती आवश्यक आहे. आणि ती संमती इतर तीन राज्यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य आज केंद्राला कोकण रेल्वे केंद्रीय रेल्वेत सामील करून घेण्याची परवानगी देत आहे,असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.

कोकण रेल्वे महामंडळ हे केरळ,कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र अशा चार राज्यांचे आहे.मात्र या महामंडळाची आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही. त्यामुळे मुळात तोट्यात असलेले हे महामंडळ फार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करू शकत नाही किंवा अधिकच्या सुधारणा करू शकत नाही. त्यामुळे या कोकण रेल्वे अधिक सेवा सुविधा देण्यासाठी कोकण रेल्वे महामंडळाच्या दुहेरी करण करण्यासाठी, प्रलंबित असलेल्या इतर मागण्यांसाठी किंवा रेल्वेच्या सुरक्षेसाठी, मार्ग सुरक्षित करण्याचे काम करायचे झाल्यास हे कोकण रेल्वे महामंडळ खर्च करू शकत नाही. त्यासाठी केरळ,कर्नाटक,गोवा या राज्यांची तयारी आहे.आपल्याही राज्याने ती केलेली आहे. त्यामुळे येत्या काळात हे महामंडळ केंद्र सरकारच्या रेल्वे विभागात विलीन करून विकास प्रक्रियेत या महामंडळाला आणले जाईल. आज जे प्रश्न निर्माण होत आहे ते होणार नाहीत.आणि अधिक गुंतवणूक केंद्र सरकार या महामंडळात करेल असा विश्वास विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

दरम्यान केंद्रात कोकण रेल्वे महामंडळ विलीन झाले तरी या मंडळाचे किंवा कोकण रेल्वेचे नाव बदलणार नाही ते कोकण रेल्वे असेच राहणार फक्त नियंत्रण केंद्रीय रेल्वे मंडळ करणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Recent Posts

मुंबई ३.० व्हिजनला मिळणार गती, मुंबईला जागतिक दर्जाचे स्मार्ट शहर घडविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल

एमएमआरडीए महानगर आयुक्त यांची कोरियन उच्चस्तरीय शिष्टमंडळाने घेतली भेट मुंबई : मुंबई हे जागतिक मानकांनुसार…

2 hours ago

RCB vs PBKS, IPL 2025: बंगलोरच्या मैदानावर पंजाब किंग्सचा ‘रॉयल’ विजय

बंगलोर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ३४व्या सामन्यात आज पंजाब किंग्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला हरवले…

9 hours ago

युनेस्कोच्या यादीत भगवद्गीतेचा समावेश

नवी दिल्ली : आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा ठरला आहे. भारताच्या सांस्कृतिक वारशाला…

11 hours ago

हिंदी भाषा सक्ती विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आक्रमक

घाटकोपर मध्ये हिंदी माध्यमातील पाठ्यपुस्तके जाळून मनसेने केला निषेध मुंबई : हिंदी भाषा सक्ती विरोधात…

11 hours ago

गुन्ह्याची माहिती असताना वैभव नाईक यांनी ती का लपवली? आमदार निलेश राणे यांचा सवाल

या प्रकरणात माजी आमदार वैभव नाईक यांचीही चौकशी करा कुडाळ : वैभव नाईक जेव्हा आमदार…

11 hours ago

नवी मुंबईत २८३.७०० किलो प्लास्टिक जप्त

नवी मुंबई : प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमांव्दारे एकल वापरातील प्लास्टिकचा वापर थांबविण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास…

11 hours ago