Nagpur Violence Update : नागपूरच्या अनेक भागात संचारबंदी!

  105

दंगलीनंतर आता शहरात तणावपूर्ण शांतता


नागपूर : नागपुरात सोमवारी झालेल्या दंगलीनंतर शहराच्या काही भागात संचारबंदी लावण्यात आली आहे. रात्रभर पोलिस परिस्थिती सामान्य करण्यासाठी प्रयत्नरत होते. त्यासाठी कलम १६३ अनंतर्गत संवेदनशील वस्त्यांमध्ये संचारबंदी लावण्यात आली असून सध्या तणावपूर्ण शांतता पसरली आहे.


यासंदर्भातील माहितीनुसार, सोमवारी छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती होती. यानिमित्ताने विश्व हिंदू परिषदेने छत्रपती शिवाजी चौकात आंदोलन केले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील औरंगजेबची कबर हटवण्यात यावी अशी या आंदोलकांची मागणी होती. यावेळी आंदोलकांनी औरंगजेबचे फोटो आणि प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध नोंदवला. अतिशय शांततेत हे आंदोलन पार पडले. त्यानंतर सोशल मिडीयावर काही अफवांचे व्हिडीओ आणि पोस्ट व्हायरल झाल्यात. त्यानंतर संध्याकाळी ७.३० वाजेच्या सुमाराला चिटणीस पार्कच्या समोर असलेल्या कांग्रेसच्या देवडिया भवन कार्यालयाच्या शेजारी असलेल्या धार्मिक स्थळाच्या समोर लोक एकत्र झाले. त्यानंतर हा जमाव चाल करून छत्रपती चौकाच्या दिशेने निघाला. यावेळी या जमावातून आक्षेपार्ह घोषणाबाजी आणि दगडफेक करण्यात आली.



दंगलखोरांच्या दगडफेकीत अनेक पोलिस देखील जखमी झाले. तसेच जमावाच्या हल्ल्यात ४ पोलिस अधिकारी जखमी झालेत. पोलिस उपायुक्त, निकेतन कदम यांच्या हातावर कुऱ्हाडीचा वार झाल्यामुळे ते रक्तबंबाळ झाले. तर दगडफेकीत डीसीपी शशिकांत सातव यांचा पाय फ्रॅक्चर झाला असून डीसीपी अर्चित चांडक यांना गंभीर लिगामेंटल इंज्यूरी झाली आहे. त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर डीसीपी राहुल मदने देखील दगडफेकीत किरकोळ जखमी झाले आहेत.


वातावरण पूर्ववत करण्यासाठी पोलिसांनी रात्री नागपूर शहरातील कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरा नगर आणि कपिल नगर या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत कर्फ्यू लावला असून पुढील आदेश येईपर्यंत हा कर्फ्यू लागू राहील, असे पोलिस आयुक्त डॉ. रविंदर कुमार सिंगल यांनी सांगितले. दरम्यान आज, मंगळवारी नागपुरात तणावपूर्ण शांतता आहे.

Comments
Add Comment

सिंधुदुर्ग : कार ऑन रेल सेवेने पाचपैकी चार वाहने नांदगावला उतरली

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन कोलाड (जि. रायगड) स्थानकावरून निघाली आणि रात्री नांदगाव (जि.

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

गणपतीआधी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची तातडीची बैठक, भाजपचं मिशन बीएमसी सुरू

येणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी भाजपने आतापासून कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही राज्याच्या

साई बाबांचा प्रसाद महागला! दरवाढीमुळे जनसामान्यांमध्ये नाराजी

अहिल्यानगर: शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला दररोज लाखों भाविक शिर्डीत येतात. साईबाबांचे दर्शन घेऊन घरी

अजित पवारांच्या जिल्ह्यातच लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक बोगस लाभार्थी

राज्य सरकारची 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा घेतलेल्या बोगस लाभार्त्यांच्या संख्येत वाढ