Share

माथेराम (वार्ताहर) : दस्तुरी नाक्यावरील येणाऱ्या पर्यटकांची दिशाभूल करून आर्थिक फसवणूक केली जाते. याचा येथील सर्वसामान्य कष्टकरी पासून ते हॉटेल इंडस्ट्री या सर्वांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झालेला आहे. ही फसवणुकीची पद्धत लवकरच बंद करण्यात आली नाही तर १८ मार्चपासून बेमुदत माथेरान बंद करण्यात येणार असा इशारा समितीने सर्वच अधिकारी वर्गाला दिला होता. त्यासाठी अधीक्षक कार्यालयात समितीच्या सदस्यांच्या बैठकीचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. या बैठकीत स्थानिक प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही.

माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने मागणी केलेल्या मागण्यांची पूर्तता स्थानिक प्रशासन स्थानिक पातळीवर करू शकत नसल्याने या पर्यटन बचाव संघर्ष समितीने मंगळवार पासून बेमुदत बंद जाहीर केला असून त्यास येथील हॉटेल इंडस्ट्री, ई रिक्षा संघटना, व्यापारी वर्ग, विविध सामाजिक संस्था यांनी समर्थन दिले असून जोपर्यंत स्थानिक प्रशासन लेखी स्वरूपात मागणी केलेल्या शुल्लक मागण्या कायमस्वरूपी पूर्ण करत नाही तोपर्यंत हे पर्यटनस्थळ बेमुदत बंद करण्यात येणार असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या बंदमध्ये शालेय विद्यार्थ्यांना ई रिक्षाची सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. परंतु कोणाही प्रवाशांना ही सेवा उपलब्ध होणार नाही असे संघटनेचे अध्यक्ष शकील पटेल यांनी सांगितले आहे.

माथेरानचे मुख्य प्रवेशद्वार असणाऱ्या दस्तुरी नाक्यावर पर्यटकांना ज्याप्रकारे फसवून त्यांची दिशाभूल केली जाते, त्यांना बळजबरीने गावात येण्याऐवजी पॉईंट्स दाखवून उशिरा हॉटेलमध्ये सोडण्यात येते. मिनिट्रेन बंद असून ई रिक्षाची सेवा फक्त स्थानिकांना दिली जाते अशी खोटी माहिती देऊन स्वतःच्या घोड्यावर बसवून नवख्या पर्यटकांची दिशाभूल करून अव्वाच्या सव्वा रक्कम उकाळली जाते. त्यासाठी दस्तुरी नाक्यावरील अंतर्गत भागात घोडेवाले असोत किंवा कुली, रूम्सचे एजंट, रिक्षावाले यांना प्रवेश देऊ नये. जागोजागी माहिती फलक लावण्यात यावेत, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, अशी माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने फेब्रुवारीच्या २७ तारखेला मागणी केली होती.

ही मागणी पूर्ण झाली नाही तर माथेरान बेमुदत बंद करण्याचा इशारा सुध्दा या समितीने अधीक्षक सुरेंद्र ठाकूर, मुख्याधिकारी राहुल इंगळे, वनखात्याच्या अधिकारी वर्गाला तसेच पोलीस ठाण्यात सुध्दा लेखी निवेदना द्वारे दिला होता. परंतु दहा दिवस उलटूनही या स्थानिक प्रशासनाने काहीही उपाययोजना केली नाही त्यामुळे नाईलाजाने माथेरान बेमुदत बंद करून शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी समितीने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी समितीचे प्रमुख कुलदीप जाधव, मनोज खेडकर, शिवाजी शिंदे, प्रवीण सकपाळ, राजेश चौधरी, प्रदीप घावरे, चंद्रकांत जाधव, हॉटेल इंडस्ट्रीचे उमेश दुबल,ई रिक्षा संघटनेचे अध्यक्ष शकील पटेल, चर्मकार समाज अध्यक्ष नितेश कदम, महिला आघाडीच्या संगीता जांभळे, सुहासिनी शिंदे, प्रतिभा घावरे, स्वाती कुमार, सुहासिनी दाभेकर, अंकिता तोरणे, श्रुतिका दाभेकर यांसह अन्य उपस्थित होते.

Recent Posts

SRH vs MI, IPL 2025: मुंबई इंडियन्स विजयाचा चौकार मारेल का?

मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…

11 minutes ago

दक्षिण मुंबईतील १४ हजार इमारतींचे होणार ‘स्ट्रक्चरल ऑडिट’

अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…

36 minutes ago

चिपी विमानतळ विद्युतीकरणाचा प्रश्न सुटणार

पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…

1 hour ago

१६ एप्रिलला लग्न आणि २२ एप्रिलला पहलगाम हल्ल्यात नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू…हदय पिळवटून टाकणारी घटना

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…

2 hours ago

PahalgamTerrorist Attack : सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान मोदी भारतात दाखल

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…

2 hours ago

PahalgamTerrorist Attack : डोंबिवलीच्या तीन जणांसह महाराष्ट्राचे चार पर्यटक ठार

पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…

3 hours ago