माथेरान बेमुदत बंद

माथेराम (वार्ताहर) : दस्तुरी नाक्यावरील येणाऱ्या पर्यटकांची दिशाभूल करून आर्थिक फसवणूक केली जाते. याचा येथील सर्वसामान्य कष्टकरी पासून ते हॉटेल इंडस्ट्री या सर्वांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झालेला आहे. ही फसवणुकीची पद्धत लवकरच बंद करण्यात आली नाही तर १८ मार्चपासून बेमुदत माथेरान बंद करण्यात येणार असा इशारा समितीने सर्वच अधिकारी वर्गाला दिला होता. त्यासाठी अधीक्षक कार्यालयात समितीच्या सदस्यांच्या बैठकीचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. या बैठकीत स्थानिक प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही.

माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने मागणी केलेल्या मागण्यांची पूर्तता स्थानिक प्रशासन स्थानिक पातळीवर करू शकत नसल्याने या पर्यटन बचाव संघर्ष समितीने मंगळवार पासून बेमुदत बंद जाहीर केला असून त्यास येथील हॉटेल इंडस्ट्री, ई रिक्षा संघटना, व्यापारी वर्ग, विविध सामाजिक संस्था यांनी समर्थन दिले असून जोपर्यंत स्थानिक प्रशासन लेखी स्वरूपात मागणी केलेल्या शुल्लक मागण्या कायमस्वरूपी पूर्ण करत नाही तोपर्यंत हे पर्यटनस्थळ बेमुदत बंद करण्यात येणार असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या बंदमध्ये शालेय विद्यार्थ्यांना ई रिक्षाची सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. परंतु कोणाही प्रवाशांना ही सेवा उपलब्ध होणार नाही असे संघटनेचे अध्यक्ष शकील पटेल यांनी सांगितले आहे.

माथेरानचे मुख्य प्रवेशद्वार असणाऱ्या दस्तुरी नाक्यावर पर्यटकांना ज्याप्रकारे फसवून त्यांची दिशाभूल केली जाते, त्यांना बळजबरीने गावात येण्याऐवजी पॉईंट्स दाखवून उशिरा हॉटेलमध्ये सोडण्यात येते. मिनिट्रेन बंद असून ई रिक्षाची सेवा फक्त स्थानिकांना दिली जाते अशी खोटी माहिती देऊन स्वतःच्या घोड्यावर बसवून नवख्या पर्यटकांची दिशाभूल करून अव्वाच्या सव्वा रक्कम उकाळली जाते. त्यासाठी दस्तुरी नाक्यावरील अंतर्गत भागात घोडेवाले असोत किंवा कुली, रूम्सचे एजंट, रिक्षावाले यांना प्रवेश देऊ नये. जागोजागी माहिती फलक लावण्यात यावेत, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, अशी माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने फेब्रुवारीच्या २७ तारखेला मागणी केली होती.

ही मागणी पूर्ण झाली नाही तर माथेरान बेमुदत बंद करण्याचा इशारा सुध्दा या समितीने अधीक्षक सुरेंद्र ठाकूर, मुख्याधिकारी राहुल इंगळे, वनखात्याच्या अधिकारी वर्गाला तसेच पोलीस ठाण्यात सुध्दा लेखी निवेदना द्वारे दिला होता. परंतु दहा दिवस उलटूनही या स्थानिक प्रशासनाने काहीही उपाययोजना केली नाही त्यामुळे नाईलाजाने माथेरान बेमुदत बंद करून शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी समितीने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी समितीचे प्रमुख कुलदीप जाधव, मनोज खेडकर, शिवाजी शिंदे, प्रवीण सकपाळ, राजेश चौधरी, प्रदीप घावरे, चंद्रकांत जाधव, हॉटेल इंडस्ट्रीचे उमेश दुबल,ई रिक्षा संघटनेचे अध्यक्ष शकील पटेल, चर्मकार समाज अध्यक्ष नितेश कदम, महिला आघाडीच्या संगीता जांभळे, सुहासिनी शिंदे, प्रतिभा घावरे, स्वाती कुमार, सुहासिनी दाभेकर, अंकिता तोरणे, श्रुतिका दाभेकर यांसह अन्य उपस्थित होते.
Comments
Add Comment

रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन नव्या जेटींना मंजुरी

राजापुरातील देवाचेगोठणे, दापोलीतील उटंबर आणि मालवणातील पेंडूर येथे उभ्या राहणार नव्या जेटी मत्स्य व्यवसाय व

कोकणाच्या विकासासाठी भाजपचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; जयगड बंदर बनणार अर्थव्यवस्थेचं केंद्र

रत्नागिरी: मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते नितेश राणे

रत्नागिरी नाचणेत मुलाकडून आईचा खून, खून करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

गणेशोत्सवाच्या उत्साहात रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. शहरातील नाचणे येथे पोटच्या मुलाने आपल्या आईचा निर्घृण

खेडमधील खवटी गावाजवळ खासगी बस आणि कारचा भीषण अपघात, तिघेजण गंभीर जखमी

खेडमधील खवटी गावाजवळ मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास खासगी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे.