WPLमध्ये मुंबई इंडियन्सचीच हवा, मिळवले दुसरे जेतेपद, दिल्लीचे स्वप्न भंग

मुंबई: मुंबई इंडियन्सने शानदार कामगिरी करताना महिला प्रीमियर लीग २०२५ जिंकली आहे. १५ मार्च शनिवारी ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या फायनलमध्ये मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा ८ धावांनी पराभव केला. फायनलमध्ये मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी १५० धावांचे आव्हान दिले होते. मात्र त्यांना ९ बाद १४१ धावाच करता आल्या.


हरमनप्रीतच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने दुसऱ्यांदा विमेन प्रीमियर लीगचा खिताब जिंकला आहे. याआधी त्यांनी WPLचा पहिला खिताबही जिंकला होता. हा २०२३मध्ये आयोजित करण्यात आला होता. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्स संघाला सलग तिसऱ्यांदा फायनलमध्ये पराभवास सामोरे जावे लागले. WPLचा दुसरा हंगाम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सला हरवत आपल्या नावे केला होता.


फायनल सामन्यात आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सचे ठराविक अंतराने विकेट पडत होते. एकवेळेस दिल्लीची धावसंख्या ६ बाद ८३ झाली होती. ते मोठ्या पराभवाच्या दिशेने जात होते. मात्र दक्षिण आफ्रिकेची ऑलराऊंडर मारिजाने कॅपने तुफानी खेळी करत सामना रोमहर्षक वळणावर ठेवला. दरम्यान, १८व्या शतकांत नेट सायवर ब्राँट नेक कॅपला बाद केले आण दिल्लीच्या आशा मावळल्या.


मुंबईकडून नेट सायबवर ब्रँटने सर्वाधिक तीन विकेट मिळवल्या. तर एमोलिया केरला दोन बळी मिळवता आले.

Comments
Add Comment

Ind vs SL Test Match : पावसाचा खेळ सुरूच; गॉल कसोटीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गॉल इंटरनॅशनल क्रिकेट

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला

INDvsSL : भारत विरुद्ध श्रीलंका, पहिल्या कसोटी सामन्यात कोण खेळणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. श्रीलंकेत होणार असलेल्या या मालिकेतील

IND vs SL Test : गॉलमध्ये टीम इंडियाची ‘फिरकी परीक्षा’; जयसूर्या-मेंडिस ठरणार मोठे आव्हान

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १५ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला