Shivneri Fort Mohal Bees Attack : शिवनेरी किल्ल्यावर आग्या मोहळ मधमाशांचा पर्यटकांवर हल्लाबोल; ५० ते ६० पर्यटक जखमी

पुणे : पुण्यातील जुन्नरमधील शिवनेरी किल्ल्यावर (Shivneri Fort) आज रविवार असल्याने पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले. मात्र, सकाळच्या सुमारास शिवनेरी किल्ल्यावर असणाऱ्या शिवाई मंदिर परिसरात आग्या मोहळाने पर्यटकांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात ५० ते ६० जण जखमी झाल्याची माहिती आहे. त्यामुळे शिवनेरी किल्ल्यावर दुर्गप्रेमींची धावपळ पहायला मिळत आहे.यावेळी अनेक लहान मुले देखील किल्ल्यावर असल्याची माहिती मिळत आहे.



मिळालेल्या माहितीनुसार आज रविवार(दि. १६) किल्ले शिवनेरीवरील (Shivneri Fort) शिवाई देवी मंदिर परिसरात आग्या मोहळाच्या (Mohal Bees Attack) माशांनी हल्ला केला असून त्यात ५० ते ६० पर्यटक जखमी झाले आहेत.शिवाई मंदिर हे पूर्णपणे माशांनी भरले असून मंदिरात दुर्गपेमी अडकलले आहेत.तर काही विद्यार्थी गडावर अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हल्ला झाल्यानंतर एकच धावपळ सुरू झाली आणि किल्ल्यावरून खाली येण्यासाठी पर्यटक सैरावैरा पळत सुटले.


या घटनेची माहित मिळताच आरोग्य विभागाच्या ॲम्बुलन्स शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी दाखल झाल्या आहेत.पोलिसांनी तातडीने पर्यटकांना गडावरून खाली येण्यास सांगितलं. वनविभागाकडून आग्या मोहळ शांत करण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. आगी मोहोळाचा हा हल्ला असून दगड मारल्यानेच आग्या मोहळ उठळे असल्याचे काही पर्यंटकांकडून सांगण्यात येत आहे. अनेक पर्यटक या हल्ल्यात जखमी झाल्यानंतर त्यांना ॲम्बुलन्समधून रूग्णालयात दाखल करण्यात आलंय आणि त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये