Devmanus : तो 'देवमाणूस' परत येतोय

मुंबई : मनोरंजनाच्या माध्यमातून जनजागृती करणे हा कलाकारांचा हेतू असतो. सत्य घटनेवर आधारित असलेल्या हातावर मोजण्याइतक्या मालिका असल्या तरी अशा मालिका प्रेक्षकांना भुरळ घालतात. अशाच एका मालिकेने काही वर्षांपुर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र त्या मालिकेतील पात्रांनी आणि मालिकेच्या संवादाने प्रेक्षकांची मने जिंकली. प्रेक्षकांच्या याच प्रेमामुळे या मालिकेचा नवीन अध्याय प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका दुसरी तिसरी कोणती नसून सर्वांची आवडती 'देवमाणूस' (Devmanus) आहे.


'देवमाणूस' मालिकेच्या आधी दोन भागात खेड्यातील डॉक्टरची कथा दाखवण्यात आली होती. खेड्यातील लोक डॉक्टरला देवमाणूस मानतात आणि त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि तो देवमाणूस कसा त्यांचा फायदा घेतो हे चित्रण त्यात पाहायला मिळते. 'देवमाणूस' मालिकेच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांकडून भरपूर प्रतिसाद मिळाला होता. 'देवमाणूस' मालिकेची क्रेझ आजही प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळते. झी युवा या चॅनलवर या मालिकेचा रिपीट टेलिकास्ट होत असतो. आता मात्र या मालिकेच्या चाहत्यांना या मालिकेचा नवा अध्याय पाहायला मिळणार आहे.



या मालिकेचा नवीन अध्याय अधिकच भन्नाट असणार आहे. नुकतेच झी मराठीने देवमाणूस (Devmanus) मालिकेच्या तिसऱ्या भागाची घोषणा केली आहे. याचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. चाहते मालिकेसाठी खूप उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.





मालिकेतील 'देवमाणूस' म्हणजे किरण गायकवाडने (Kiran Gaikwad) आपल्या भूमिकेने आणि अभिनयाने चाहत्यांना भुरळ घातली आहे. या मालिकेत त्याने खलनायकाची भूमिका साकारली आहे. 'देवमाणूस' मालिकेमुळे किरणला खूप लोकप्रियता मिळाली. दरम्यान आता नवीन सुरू होणाऱ्या 'देवमाणूस' मालिकेच्या नव्या अध्यायात कोण कलाकार पाहायला मिळणार याची अद्याप घोषणा झाली नाही. तसेच मालिकेची रिलीज डेटही समोर आली नाही.

Comments
Add Comment

घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' पूल

- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई :

अंगणवाडी बांधकामासाठी १५ लाखांचा निधी प्रस्तावित; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

मुंबई : राज्यातील अंगणवाड्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या 'स्मार्ट किट' खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्तेचा

मराठी भाषेचे संवर्धन ही केवळ सरकारचीच नाही, तर प्रत्येकाची जबाबदारी - मंत्री उदय सामंत

मुंबई : "मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासन स्तरावर मराठी भाषा विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र,

Panvel Karjat Local Train: पनवेल-कर्जत लोकल ट्रेन सुरु होणार; प्रवाशांचा वेळ वाचणार

मुंबई: पनवेल आणि कर्जत या दोन्ही स्थानकांना जोडणारा प्रकल्प लवकरच पूर्ण होणार आहे. तसे पाहिले तर पनवेल आणि कर्जत