Shirdi News : शिर्डीत भाविकांची लूट करणाऱ्या तीन दुकानदारांवर कारवाई

  104

ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेनंतर नगरपालिकेने दुकानांना ठोकले टाळे


शिर्डी : महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या शिर्डी साईबाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी देशभरातून भाविक शिर्डीच्या साईनगरीत येत असतात. तन-मन-धन या भावनेने साईचे आशीर्वाद घेण्यासाठी येणाऱ्या या भाविकांची स्थानिकांकडून लूट केली जाते. साईचरणी अर्पण करण्यासाठी विक्री होणाऱ्या वस्तू आणि सामानांचे भाव वाढवून भक्तांची लूट करण्यात येते. आता, याबाबत शिर्डीतील नगरपालिकेने कारवाईला सुरुवात केली असून तीन दुकानांना टाळे ठोकण्यात आले आहे. साईभक्तांना मूळ किमतीच्या अधिक किमतीत साहित्य विकणाऱ्या तीन दुकानांवर कारवाई करत नगर परिषदेने या दुकानांना टाळे ठोकल्याने येथील व्यापाऱ्यांना चांगलाच जरब बसला आहे.



साईभक्तांची होणारी फसवणूक आणि लूट लक्षात घेऊन शिर्डीतील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर नगरपालिकेने कारवाई केली आहे. विशेष म्हणजे या लुटीसंदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल केला जाणार आहे. शिर्डीत साई दर्शनासाठी लाखो साईभक्त येत असतात आणि साई मंदिरात दर्शनासाठी जातांना हार-प्रसादाच्या दुकानातून हार, फुले, प्रसाद खरेदी करतात. मात्र, भक्तांच्या श्रद्धेचा बाजार मांडून, भक्तांच्या भावनेचा गैरफायदा घेत साई मंदिर परिसरातील हार, फुले आणि प्रसाद व्यावसायिकांकडून भाविकांची लूट केली जात असल्याचे अनेकदा समोर आले आहे. विशेष म्हणजे भाविकांकडून अवाच्या सव्वा दराने विक्री करणाऱ्या तीन दुकानांना नगरपालिकेने सील ठोकले असून पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हाही दाखल केला जाणार असल्याची माहिती आहे.

Comments
Add Comment

Health: भोपळ्याच्या बिया आणि खजूर, झोपेसाठी उत्तम आहार

मुंबई : रात्री शांत आणि गाढ झोप लागणे हे आजच्या धावपळीच्या जीवनात एक मोठे आव्हान बनले आहे. अनेक जण निद्रानाश आणि

अंडाकरी बनवण्यास पत्नीने दिला नकार, पतीने केली आत्महत्या

धमतरी (छत्तीसगढ): छत्तीसगढमधील धमतरी जिल्ह्यात एक धक्कादायक आणि दु:खद घटना समोर आली आहे. एका पतीने केवळ त्याच्या

रत्नागिरी : पोटच्या मुलाकडून आईचा सुरीने गळा कापून खून

रत्नागिरी : पोटच्या मुलानेच आपल्या आईचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना आज (दि. २६ ऑगस्ट) पहाटे उघडकीस आली. या

Ganeshostav 2025: गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांची गर्दी

रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील चाकरमानी मोठ्या प्रमाणावर गावात दाखल झाले आहेत. त्यामुळे

रणबीर-आलियाच्या नवीन घराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर आलिया संतापली

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर मुंबईत एक नवं घर बांधत आहेत, ज्याची किंमत

'अंबाजोगाई येथे १ हजार १५० खाटांचे रुग्णालय उभारावे'

मुंबई : मराठवाड्यातील ग्रामीण भागासाठी वैद्यकीय शिक्षण व आरोग्यसेवा अधिक सक्षम व्हावी, यासाठी बीड जिल्ह्यातील