Shirdi News : शिर्डीत भाविकांची लूट करणाऱ्या तीन दुकानदारांवर कारवाई

  73

ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेनंतर नगरपालिकेने दुकानांना ठोकले टाळे


शिर्डी : महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या शिर्डी साईबाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी देशभरातून भाविक शिर्डीच्या साईनगरीत येत असतात. तन-मन-धन या भावनेने साईचे आशीर्वाद घेण्यासाठी येणाऱ्या या भाविकांची स्थानिकांकडून लूट केली जाते. साईचरणी अर्पण करण्यासाठी विक्री होणाऱ्या वस्तू आणि सामानांचे भाव वाढवून भक्तांची लूट करण्यात येते. आता, याबाबत शिर्डीतील नगरपालिकेने कारवाईला सुरुवात केली असून तीन दुकानांना टाळे ठोकण्यात आले आहे. साईभक्तांना मूळ किमतीच्या अधिक किमतीत साहित्य विकणाऱ्या तीन दुकानांवर कारवाई करत नगर परिषदेने या दुकानांना टाळे ठोकल्याने येथील व्यापाऱ्यांना चांगलाच जरब बसला आहे.



साईभक्तांची होणारी फसवणूक आणि लूट लक्षात घेऊन शिर्डीतील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर नगरपालिकेने कारवाई केली आहे. विशेष म्हणजे या लुटीसंदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल केला जाणार आहे. शिर्डीत साई दर्शनासाठी लाखो साईभक्त येत असतात आणि साई मंदिरात दर्शनासाठी जातांना हार-प्रसादाच्या दुकानातून हार, फुले, प्रसाद खरेदी करतात. मात्र, भक्तांच्या श्रद्धेचा बाजार मांडून, भक्तांच्या भावनेचा गैरफायदा घेत साई मंदिर परिसरातील हार, फुले आणि प्रसाद व्यावसायिकांकडून भाविकांची लूट केली जात असल्याचे अनेकदा समोर आले आहे. विशेष म्हणजे भाविकांकडून अवाच्या सव्वा दराने विक्री करणाऱ्या तीन दुकानांना नगरपालिकेने सील ठोकले असून पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हाही दाखल केला जाणार असल्याची माहिती आहे.

Comments
Add Comment

एका मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर : पावसाची अपेक्षित दणकेबाज सुरुवात... शेतीची सर्व कामे आटोपलेली... मनात विठुरायाच्या दर्शनाची आस...

मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार !

७ जुलैच्या डब्याची सोय करून ठेवा! मुंबई (प्रतिनिधी) :मुंबईच्या गर्दीतून, पावसातून आणि खचाखच भरलेल्या ट्रेनमधून

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यास रेल्वेचे तिकीट मिळेना

रात्रभर रांगेत जागूनही झाल्या दोन मिनिटांत गाड्या फुल्ल मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी गावाकडे नाणान्य

प्रवास झाला स्मार्ट ! 'हायवे यात्रा' अ‍ॅप सांगणार कमी टोलचा रस्ता

नवी दिल्ली (प्रतिनिधी): जर तुम्ही अनेकदा राष्ट्रीय महामार्गावर रोड ट्रिप करत असाल तर तुमच्यासाठी एक दिलासादायक

ठाण्यात पहिल्या ‘स्पेस एज्युकेशन लॅब’ची निर्मिती होणार

अंबर इंटरनॅशनल स्कूल, व्योमिका स्पेस अ‍ॅकॅडमी यांच्यात सामंजस्य करार संपन्न ठाणे : ठाण्यातील ‘अंबर इंटरनॅशनल

काळू धरणातील विस्थापितांचे पुनर्वसन खापरी गावात नको

स्थानिक ग्रामस्थांचे मुरबाड तहसीलदारांना निवेदन मुरबाड : ठाणे जिल्ह्यातील वाढत्या लोकसंख्येला पाणीपुरवठा