Mumbai Holi Festival : मुंबईत धूलिवंदन सणाला गालबोट! भाईंदरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याला चाकूने भोसकले

मुंबई : जगभरात सगळीकडे रंगांची उधळण सुरु असताना मुंबईत रंगपंचमीला गालबोट लागल्याचे समोर आले आहे. सणसमारंभाला नागरिकांच्या रक्षणासाठी दिवसरात्र मेहनत करणाऱ्या रक्षकावरच हल्ला झाला. या हल्ल्यात ड्युटीवर असलेला कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.




मिळालेल्या माहितीनुसार, भाईंदरच्या मुंबई मार्केट गल्लीमधील बाबूभाई मिस्त्री चाळ येथे दोन गटात भांडण झाले असल्याची माहिती मिळाल्यावरून भाईंदर पोलीस ठाण्याचे पोलिस हवालदार काशिनाथ भानुसे घटनास्थळी पोहोचले असता तेथे त्यांच्यावर दोन जणांनी धारदार चाकूने प्राणघातक हल्ला केला. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. वरिष्ठ पोलिस निरिक्षक जितेंद्र कांबळे यांनी त्वरित तपास करून बाबू नेपाळी आणि दिलीप भीमबहाद्दूर खडका या दोघांना अटक केली आहे. या घटनेने भाईंदर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments
Add Comment

अवयव प्रत्यारोपणासाठी देशव्यापी एकसमान धोरणाचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

दानकर्त्यांची प्रत्यारोपणानंतर वैद्यकीय काळजी बंधनकारक… मुंबई : देशभर अवयव प्रत्यारोपणासाठी एकसमान व

मालाड, कांदिवली, माटुंगा, परळमधील उद्याने, क्रीडांगणाचा होणार विकास

महापालिकेने मागवली २६ कोटींची निविदा मुंबई (खास प्रतिनिधी) : मालाड (पूर्व), येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे

मुंबईत २०० पेक्षा वायू गुणवत्ता निर्देशांक असल्यास उद्योग आणि बांधकामे बंद करा

महापालिका आयुक्त अश्विनी जोशी यांचे अधिकाऱ्यांना निर्देश मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्यांचा गय

मुंबईत निवडणुकीची चाहूल; राज्य सरकारचा पुनर्विकासाला चालना देणारा मोठा निर्णय

मुंबई : मुंबईतील बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीच राज्य सरकारने नागरिकांना थेट लाभ

मुंबईकर गारठले; थंडीमुळे पारा १६.२ अंशावर !

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांत हिवाळ्याची चाहूल

मुंबईत बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार ; कारमध्ये झाडल्या गोळ्या

मुंबई : मुंबईत भर दुपारी एक धक्कादायक घटना घडली आहे. कांदिवली चारकोप परिसरातील एका व्यावसायिकांवर हल्ला झाला.