मुंबई : जगभरात सगळीकडे रंगांची उधळण सुरु असताना मुंबईत रंगपंचमीला गालबोट लागल्याचे समोर आले आहे. सणसमारंभाला नागरिकांच्या रक्षणासाठी दिवसरात्र मेहनत करणाऱ्या रक्षकावरच हल्ला झाला. या हल्ल्यात ड्युटीवर असलेला कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, भाईंदरच्या मुंबई मार्केट गल्लीमधील बाबूभाई मिस्त्री चाळ येथे दोन गटात भांडण झाले असल्याची माहिती मिळाल्यावरून भाईंदर पोलीस ठाण्याचे पोलिस हवालदार काशिनाथ भानुसे घटनास्थळी पोहोचले असता तेथे त्यांच्यावर दोन जणांनी धारदार चाकूने प्राणघातक हल्ला केला. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. वरिष्ठ पोलिस निरिक्षक जितेंद्र कांबळे यांनी त्वरित तपास करून बाबू नेपाळी आणि दिलीप भीमबहाद्दूर खडका या दोघांना अटक केली आहे. या घटनेने भाईंदर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…
अर्चना सोंडे जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी…