Mumbai Holi Festival : मुंबईत धूलिवंदन सणाला गालबोट! भाईंदरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याला चाकूने भोसकले

मुंबई : जगभरात सगळीकडे रंगांची उधळण सुरु असताना मुंबईत रंगपंचमीला गालबोट लागल्याचे समोर आले आहे. सणसमारंभाला नागरिकांच्या रक्षणासाठी दिवसरात्र मेहनत करणाऱ्या रक्षकावरच हल्ला झाला. या हल्ल्यात ड्युटीवर असलेला कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.




मिळालेल्या माहितीनुसार, भाईंदरच्या मुंबई मार्केट गल्लीमधील बाबूभाई मिस्त्री चाळ येथे दोन गटात भांडण झाले असल्याची माहिती मिळाल्यावरून भाईंदर पोलीस ठाण्याचे पोलिस हवालदार काशिनाथ भानुसे घटनास्थळी पोहोचले असता तेथे त्यांच्यावर दोन जणांनी धारदार चाकूने प्राणघातक हल्ला केला. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. वरिष्ठ पोलिस निरिक्षक जितेंद्र कांबळे यांनी त्वरित तपास करून बाबू नेपाळी आणि दिलीप भीमबहाद्दूर खडका या दोघांना अटक केली आहे. या घटनेने भाईंदर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.