National Park Fire : बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात भीषण आग; तळीरामांचा प्रताप

मुंबई : मुंबईमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईमधील बोरिवली भागात असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला भीषण आग लागली आहे. राष्ट्रीय उद्यानाच्या लगतच असणाऱ्या दहिसर परिसरात धुलीवंदनाच्या सणाचा आनंद लुटण्यासाठी काही तळीराम एकत्र जमले होते. यातील एका तळीरामाने ही आग लावल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दारूच्या नशेत त्यांनी जंगलाचा काही भाग पेटवून टाकला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. होळीच्या दिवशी तळीरामांना कसलंच भान नसतं. ते दारुच्या नशेत काय करतील, याचा नेम नसतो. होळीमुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळच्या दहिसर परिसरात गेले होते. होळीनिमित्त काही जणांनी या भागात दारुची पार्टी केली. या आगीत राष्ट्रीय उद्यानाचे अर्धा हेक्टर जंगल जळून खाक झाल्याचे समजते.




 

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय उद्यानात आगीचे मोठे लोट दिसू लागले. त्यानंतर अनेक जणांनी तिथून पळ काढला. तळीरामांनी लावलेल्या या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या तिथे आल्या. अग्नीशमन दलाच्या जवानांनी आता ही आग आटोक्यात आणली आहे. साधारणपणे दीड तास अग्निशमन दलाचे कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. याबाबतची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच ते सहा गाड्या आणि राष्ट्रीय उद्यानाच्या सुरक्षारक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नानंतर दीड तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

Comments
Add Comment

Mantralaya Water : 'मंत्रालयातील पाणी पूर्णपणे सुरक्षित'; टाक्यांची स्वच्छता, वॉटर प्युरिफायर सर्व्हिसिंग पूर्ण, BMCचा अहवाल दिलासा देणारा

मुंबई : मंत्रालयातील पाणीपुरवठ्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनंतर सार्वजनिक बांधकाम

Monsoon Update : राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा; कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात अलर्ट

मुंबई(Mumbai) : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाचे स्वरूप विस्कळीत राहिले होते. मात्र आता राज्यातील अनेक

Chandrashekar Bawankule : नायब तहसीलदार ते अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा

 महसूल विभागाच्या सेवा नियमांत ५० वर्षांनी बदल; मुख्यमंत्र्यांकडून प्रस्तावाला मान्यता मुंबई : महसूल

MIDC Maharashtra : वैभववाडी 'MIDC'ला मूर्त रूप, पायाभूत सुविधांची कामे तातडीने सुरू करण्याचे मंत्री उदय सामंतांचे निर्देश

पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत मंत्रालयात बैठक मुंबई :

Mumbai Police : CJPच्या आंदोलनानंतर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; ८ पोलीस ठाण्यांत ९०० हून अधिक आंदोलकांवर गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील CJP आंदोलनानंतर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत शहरातील आठ वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

NITI Aayog Investment Index : नीती आयोगाच्या गुंतवणूक अनुकूलता निर्देशांकात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी

५६.६ गुणांसह गुजरात पहिले; तामिळनाडूचा तिसरा क्रमांक मुंबई(Mumbai) : देशातील राज्यांमध्ये गुंतवणुकीला पोषक वातावरण,