IPL 2025 : आयपीएलपूर्वीच ३ संघांसाठी आनंदाचा जॅकपॉट

५ तगड्या खेळाडूंचे होणार पुनरागमन


नवी दिल्ली : नुकताच चॅम्पियन ट्रॉफीचा थरार संपला आहे. आता क्रिकेटप्रेमींना आयपीएल २०२५ (IPL 2025) चे वेध लागले आहेत. आयपीएल २०२५ (IPL 2025) चा १८वा हंगाम २२ मार्चपासून सुरू होत आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वीच ३ संघांसाठी मोठी आनंदनाची बातमी समोर आली आहे. वास्तविक, मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्सचे ५ स्टार खेळाडू दुखापतीने त्रासले होते. परंतु आता ते पुनरागमन करणार असल्याचे समोर आले आहे. हे खेळाडू आता केवळ बीसीसीआयच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडून मंजुरीची मिळण्याची वाट पाहत आहे.


संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सचा कर्णधार स्टार खेळाडू संजू सॅमसन आहे. इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेदरम्यान त्याच्या बोटाला दुखापत झाली होती. यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मिळालेल्या अहवालानुसार, त्याने फलंदाजीसाठी फिटनेस चाचणी पास केली असून लवकरच त्याला सोडण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, एनसीए अजूनही त्याच्या विकेटकीपिंगवर लक्ष ठेवून आहे. २३ मार्च रोजी राजस्थान रॉयल्सच्या सलामीचा सामाना आहे.


या सामन्याच्या दोन दिवस आधी आणखी काही चाचण्या घेतल्या जाण्याची शक्यता आहे. त्यांनंतर त्याला फलंदाजीसाठी मंजुरी देण्यात येण्याची शक्यता हे. मात्र त्याला जर मंजूरी मिळाली नाही तर त्याच्या जागी ध्रुव जुरेल विकेटकीपिंग करेल. जसप्रीत बुमराह बॉर्डर गावस्कर ट्रॉफीवेळी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जसप्रीत बुमराहला दुखापत झाली होती. सिडनी कसोटीपासून तो संघाच्या बाहेरच आहे. मात्र आता संपूर्ण लक्ष आयपीएल २०२५ वर असणार आहे. सध्या बेंगळुरूमध्ये पुनर्वसन सुरू आहे. बुमराह महिन्याच्या अखेरीस ठीक होणार आहे.



लखनऊ सुपर जायंट्सचे ३ खेळाडू करणार कमबॅक


लखनऊ सुपर जायंट्सचे ३ स्टार वेगवान गोलंदाज दुखापतीचा सामना करत आहेत. यामध्ये वेगवान गोलंदाज मयंक यादव, मोहसीन खान आणि आवेश खान यांची नावे आहेत. मयंकही पाठीच्या दुखापतीने त्रस्त आहे. तो ऑक्टोबर २०२४ पासून मैदानापासून लांब आहे. आवेश गुडघ्याच्या कार्टिलेजचे पुनर्वसन करत आहे. रणजी ट्रॉफीदरम्यान त्याला दुखापत झाली होती. यानंतर त्याला एनसीएमध्ये पाठवण्यात आले होते. तसेच मोहसीन खान देखील दुखापतीतून सावरत आहे. त्याच्या दुखापतीबाबत जास्त माहिती मिळू शकलेली नाही. त्याने ३१ डिसेंबर रोजी विजय हजारे ट्रॉफीमध्ये शेवटचा सामना खेळला होता. तेव्हापासून तो बाहेरच आहे. अहवालानुसार, या ३ पैकी किमान २ गोलंदाजांना क्लिअरन्स मिळणे अपेक्षित आहे.

Comments
Add Comment

Ind vs SL Test Match : पावसाचा खेळ सुरूच; गॉल कसोटीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गॉल इंटरनॅशनल क्रिकेट

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला

INDvsSL : भारत विरुद्ध श्रीलंका, पहिल्या कसोटी सामन्यात कोण खेळणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. श्रीलंकेत होणार असलेल्या या मालिकेतील

IND vs SL Test : गॉलमध्ये टीम इंडियाची ‘फिरकी परीक्षा’; जयसूर्या-मेंडिस ठरणार मोठे आव्हान

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १५ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला