Manmaad : मनमाडला कांदा साठवून ठेवलेल्या शेडला लागली आग

आगीत शेकडो क्विंटल कांदा जळून खाक


नाशिक : मनमाड शहरातील चांदवड रोड लगत असलेल्या व्यापाऱ्याच्या कांदा शेडला आग लागून त्यात शेकडो क्विंटल कांदा जळून खाक झाला आहे. व्यापाऱ्याने शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या नंतर कांदा शेड मध्ये साठवून ठेवला होता. आगीत कांद्यासोबत शेडपण जळून खाक झाल्यामुळे व्यापाऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. रात्री कोणीतरी आग लावल्याचा संशय या व्यापाऱ्याने व्यक्त केला असून याबाबत पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असुन अनेक ठिकाणी आग लागज्याच्या घटना समोर येत आहेत.



मनमाडला देखील चांदवड रोडवर व्यापाऱ्याने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला लाखो रुपयांचा साठवून ठेवलेल्या कांदा गोदामाला आग लागली असुन या आगीत लाखो रुपयांचा कांदा व कांदा शेड जळून खाक झाले आहे रात्रीच्या वेळी कोणी तरी आग लावल्याचा संशय व्यापाऱ्याने केला आहे. याबाबत मनमाड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पूढील तपास पोलिस करत आहेत.



लाखो रुपयांचे नुकसान


सध्या कांद्याला जास्त भाव नसला तरी बाहेर देशात पाठवण्यात येणाऱ्या कांद्याला चांगला भाव आहे. यामुळे अनेक व्यापारी हे कांदा विकत घेऊन साठवून ठेवतात व त्यानंतर तो बाहेर देशात पाठवतात यासाठी अनेक व्यापारी कांदा चाळीत किंवा मोठ्या गोडावून मध्ये आपला साठा करून ठेवतात असेच साठवुन ठेवलेले कांदे जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

Comments
Add Comment

म्हाडाला अर्जाच्या विक्रीतून मिळाले ८ कोटी

मुंबई (प्रतिनिधी) : म्हाडाच्या कोकण मंडळांच्या घरांसाठी येत्या शनिवारी दि. ११ ऑक्टोबरला ठाण्यामध्ये संगणकीय

टपाल घेण्यासाठीही पोस्टमन येणार घरी !

मुंबई (प्रतिनिधी) : आजपर्यंत पोस्टमन काका घराच्या दारापर्यंत टपाल व मनिऑर्डरसह अन्य पत्रं आणून देत होता. आता,

ब्रिटनची ९ मोठी विद्यापीठे भारतात कॅम्पस सुरू करणार; पंतप्रधान मोदी आणि कीर स्टार्मर यांची मोठी घोषणा

मुंबई: भारत-ब्रिटन संबंधांमध्ये शिक्षण आणि युवाशक्तीला बळ देणारा एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. ब्रिटनचे

फिलिपाइन्समध्ये भूकंपाचा जोरदार धक्का; ७.६ रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद, त्सुनामीचा इशारा

मिंडानाओ, फिलिपाइन्स: फिलिपाइन्सच्या मिंडानाओ बेटाजवळ शुक्रवारी ( पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.

भारताला वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका २-0 ने जिंकण्याची संधी

नवी दिल्ली : पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय संघाने डावाने विजय मिळवला होता. आता टीम इंडिया आता

मेट्रो ३ ने दाखवली ‘स्पीड’ची ताकद : पहिल्याच दिवशी ऐतिहासिक प्रतिसाद!

मुंबई : मुंबईकरांनी मेट्रो ३, म्हणजेच अ‍ॅक्वा लाईनला दिलेला प्रतिसाद पाहता हा प्रकल्प खऱ्या अर्थाने यशस्वी ठरत