Manmaad : मनमाडला कांदा साठवून ठेवलेल्या शेडला लागली आग

  85

आगीत शेकडो क्विंटल कांदा जळून खाक


नाशिक : मनमाड शहरातील चांदवड रोड लगत असलेल्या व्यापाऱ्याच्या कांदा शेडला आग लागून त्यात शेकडो क्विंटल कांदा जळून खाक झाला आहे. व्यापाऱ्याने शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या नंतर कांदा शेड मध्ये साठवून ठेवला होता. आगीत कांद्यासोबत शेडपण जळून खाक झाल्यामुळे व्यापाऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. रात्री कोणीतरी आग लावल्याचा संशय या व्यापाऱ्याने व्यक्त केला असून याबाबत पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असुन अनेक ठिकाणी आग लागज्याच्या घटना समोर येत आहेत.



मनमाडला देखील चांदवड रोडवर व्यापाऱ्याने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला लाखो रुपयांचा साठवून ठेवलेल्या कांदा गोदामाला आग लागली असुन या आगीत लाखो रुपयांचा कांदा व कांदा शेड जळून खाक झाले आहे रात्रीच्या वेळी कोणी तरी आग लावल्याचा संशय व्यापाऱ्याने केला आहे. याबाबत मनमाड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पूढील तपास पोलिस करत आहेत.



लाखो रुपयांचे नुकसान


सध्या कांद्याला जास्त भाव नसला तरी बाहेर देशात पाठवण्यात येणाऱ्या कांद्याला चांगला भाव आहे. यामुळे अनेक व्यापारी हे कांदा विकत घेऊन साठवून ठेवतात व त्यानंतर तो बाहेर देशात पाठवतात यासाठी अनेक व्यापारी कांदा चाळीत किंवा मोठ्या गोडावून मध्ये आपला साठा करून ठेवतात असेच साठवुन ठेवलेले कांदे जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

Comments
Add Comment

Hartalika 2025: अखंड सौभाग्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी केले जाते हरतालिकेचे व्रत

मुंबई : हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांपैकी एक असलेला हरतालिका व्रताचा सण यंदा २६ ऑगस्ट २०२५ रोजी साजरा होत

Mumbai Police: मुंबई पोलिसांची कौतुकास्पद मोहीम, चोरीला गेलेले ८,००० मोबाईल परत मिळवून दिले

मुंबई: मुंबई पोलिसांनी चोरीला गेलेले मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू केली

Ganeshotsav 2025: वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने साकारले ५२ फूटी काशी विश्वनाथ मंदिर

मुंबई: दरवर्षी प्रसिध्द मंदिरांची हुबेहुब आरास साकारणाऱ्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे

पंतप्रधान मोदींची पदवी सार्वजनिक करण्याचे आदेश दिल्ली हायकोर्टाने केले रद्द

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पदवीची माहिती सार्वजनिक करण्याचे केंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी)

२५० कोटींचा अलिशान बंगला तयार, रणबीर-आलिया लवकरच करणार गृहप्रवेश

मुंबई : बॉलिवूडचे लोकप्रिय कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे स्वप्नातील घर अखेर तयार झाले आहे. गेल्या अनेक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘अरण्य’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच मराठी चित्रपट ‘अरण्य’ च्या पोस्टरचे अनावरण करण्यात