Bangladeshi Citizens : तीन बांग्लादेशी आरोपींना प्रत्येकी २ वर्षे कारावासाची शिक्षा

सोलापूर : मोहोळ तालुक्यातील चिंचोलीकाटी एमआयडीसीतील दोन कंपन्यांमध्ये नोकरी व वास्तव्य करणार्‍या तीन बांग्लादेशी नागरिकांवर मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत मोहोळ प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी स. वा.ठोंबरे यांनी आरोपींना प्रत्येकी २ वर्षे कारावास व प्रत्येकी १० हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.



कोणत्याही वैद्य कागदपत्रांशिवाय तसेच भारत-बांग्लादेश सीमेवरील मुलकी अधिकारी यांच्या लेखी परवानगीशिवाय घुसखोरीच्या अवैद्य मार्गाने भारतात प्रवेश करून येथील दोन कंपन्यांमध्ये बांग्लादेशी राहत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनानुसार मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ कदम यांच्या टीमने संयुक्त कारवाई करत दि. २६ डिसेंबर रोजी कंपनीमधील कामगारांसाठी राहण्याकरता बांधलेल्या खोल्यांमध्ये चंचल विश्वनाथ पहान, अजहर अली हुजूर अली हटवली, मीनल शनिचर कुलमनी हेलराम सर्व (रा. बांग्लादेश) तिघांना अटक केले. तिघांच्या विरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.


गुन्ह्याचा तपास करून सहाय्यक पोलीस निरीक्षक अंजना फाळके यांनी आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र तयार करून ते प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मोहोळ कोर्टात दाखल केले होते.

Comments
Add Comment

Water storage : खरीप हंगामावर वरुणराजाची कृपादृष्टी, नाशिकसह इतर विभागांतील पाणीसाठा किती ? 

Nashik : जून महिना कोरडा गेल्यानंतरही झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणे भरली आहेत. त्यामुळे

Panic in Wardha : वर्ध्यात दहशत! १० गावांत हाय अलर्ट जारी; वनविभाग ॲक्शन मोडमध्ये

वर्धा: महाराष्ट्र आणि देशपातळीवर वन्यजीवांच्या वाढत्या वावरामुळे मानवी वस्त्यांवर आणि शेती परिसरांवर संकट

Nashik-Mumbai Highway : घोटी–सिन्नर फाटा उड्डाणपुलावर ट्रक दुभाजकाला धडकून उलटला अन्...महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

घोटी : नाशिक–मुंबई महामार्गावर (Nashik-Mumbai Highway) घोटी–सिन्नर (Ghoti Sinner) फाटा उड्डाणपुलावर आज एक भीषण अपघात घडला. विटांनी

Mumbai Pune Railway : घाटात दरड कोसळली तरी वाहतूक थांबणार नाही; मुंबई-पुणे रेल्वेप्रवास आता अधिक सुरक्षित, 'हा' मोठा बदल होणार!

मुंबई-पुणे रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. पावसाळ्यात दरडी कोसळल्यामुळे होणारा

Ahilyanagar : नीट परीक्षेत कमी गुण मिळाले अन् विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलले ; सुसाईड नोटमध्ये लिहिलं आत्महत्येचं कारण

Ahilyanagar : नीट परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याच्या नैराश्यातून १९ वर्षीय विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलल्याची

BENDUR FESTIVAL : सर्जा-राजाप्रती कृतज्ञतेचा उत्सव; महाराष्ट्रातील पारंपरिक 'बेंदूर' सणाची परंपरा आणि महत्त्व

भारतीय संस्कृती ही कृषीसंस्कृतीवर आधारलेली असून, या मातीतील प्रत्येक सण-उत्सव हा थेट प्रकृती आणि