Thursday, April 17, 2025
Homeताज्या घडामोडीManmaad : मनमाडला कांदा साठवून ठेवलेल्या शेडला लागली आग

Manmaad : मनमाडला कांदा साठवून ठेवलेल्या शेडला लागली आग

आगीत शेकडो क्विंटल कांदा जळून खाक

नाशिक : मनमाड शहरातील चांदवड रोड लगत असलेल्या व्यापाऱ्याच्या कांदा शेडला आग लागून त्यात शेकडो क्विंटल कांदा जळून खाक झाला आहे. व्यापाऱ्याने शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या नंतर कांदा शेड मध्ये साठवून ठेवला होता. आगीत कांद्यासोबत शेडपण जळून खाक झाल्यामुळे व्यापाऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. रात्री कोणीतरी आग लावल्याचा संशय या व्यापाऱ्याने व्यक्त केला असून याबाबत पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असुन अनेक ठिकाणी आग लागज्याच्या घटना समोर येत आहेत.

Bangladeshi Citizens : तीन बांग्लादेशी आरोपींना प्रत्येकी २ वर्षे कारावासाची शिक्षा

मनमाडला देखील चांदवड रोडवर व्यापाऱ्याने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला लाखो रुपयांचा साठवून ठेवलेल्या कांदा गोदामाला आग लागली असुन या आगीत लाखो रुपयांचा कांदा व कांदा शेड जळून खाक झाले आहे रात्रीच्या वेळी कोणी तरी आग लावल्याचा संशय व्यापाऱ्याने केला आहे. याबाबत मनमाड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पूढील तपास पोलिस करत आहेत.

लाखो रुपयांचे नुकसान

सध्या कांद्याला जास्त भाव नसला तरी बाहेर देशात पाठवण्यात येणाऱ्या कांद्याला चांगला भाव आहे. यामुळे अनेक व्यापारी हे कांदा विकत घेऊन साठवून ठेवतात व त्यानंतर तो बाहेर देशात पाठवतात यासाठी अनेक व्यापारी कांदा चाळीत किंवा मोठ्या गोडावून मध्ये आपला साठा करून ठेवतात असेच साठवुन ठेवलेले कांदे जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -