Rahul Gandhi : राहुल गांधी वारंवार व्हिएतनामला का जातात ?

  68

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते असलेले काँग्रेस खासदार राहुल गांधी वारंवार व्हिएतनामला का जातात ? असा प्रश्न भाजपाकडून उपस्थित करण्यात आला आहे. राहुल गांधी २०२५ या वर्षात आतापर्यंत दोन वेळा व्हिएतनामला जाऊन आले आहेत.





माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचा मृत्यू (२६ डिसेंबर २०२४) झाला त्यावेळी राहुल गांधी व्हिएतनाममध्येच होते. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याचा मृत्यू झाला तरी त्यांना तातडीने मायदेशी परतावे असे वाटले नाही. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाही राहुल गांधी व्हिएतनामला गेल्याचे कानावर आले. आता पुन्हा राहुल गांधी व्हिएतनामला गेले आहेत. खासदार असूनही राहुल गांधी स्वतःच्या मतदारसंघात जाण्याऐवजी वारंवार व्हिएतनामला जात आहेत. राहुल गांधींना व्हिएतनामविषयी एवढे प्रेम का ? असा प्रश्न भाजपा नेते रवीशंकर प्रसाद यांनी उपस्थित केला आहे.



भाजपाने प्रश्न विचारताच काँग्रेसने सावध पवित्रा घेतला. जास्त माहिती देणे टाळत राहुल गांधी व्हिएतनामच्या आर्थिक प्रगतीचा अभ्यास करत आहेत, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरिश रावत म्हणाले. व्हिएतनामने केलेल्या प्रयोगांपैकी काही प्रयोग भारतात शक्य आहेत का याचाही अंदाज राहुल गांधी घेत असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले.
Comments
Add Comment

चिनाब रेल्वे पूल आयफेल टॉवरपेक्षा उंच!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते चिनाब रेल्वे पुलाचे उद्घाटन काश्मिर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

नीट पीजी परीक्षा ३ ऑगस्टला

नवी दिल्ली : पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या प्रवेशपूर्व परीक्षा अर्थात नीट पीजी परीक्षेची

Elon Musk च्या स्टारलिंकला भारत सरकारची मंजुरी

नवी दिल्ली : Elon Musk च्या स्टारलिंक कंपनीला सॅटेलाइटच्या मदतीने इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी भारत सरकारने मंजुरी दिली

ICICI Bank : अविश्वसनीय! ICICI बँकेत ४.५८ कोटींची फसवणूक, महिला मॅनेजरला अटक

जयपूर : बँकेत आपले पैसे सुरक्षित आहेत असं प्रत्येक ग्राहकाला वाटत असतं. पण, एका धक्कादायक प्रकरणात, राजस्थानच्या

जगातील सर्वात उंच रेल्वे पुलावर तिरंगा

श्रीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन केले. चिनाब रेल्वे पूल हा जगातील

पर्वत आणि बोगद्यांमधील अभियांत्रिकीचा चमत्कार, चिनाब पुलामध्ये काय आहे खास पाहा

श्रीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात उंच चिनाब पूल देशाला समर्पित केला. यासोबतच दोन वंदे भारत