Rahul Gandhi : राहुल गांधी वारंवार व्हिएतनामला का जातात ?

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते असलेले काँग्रेस खासदार राहुल गांधी वारंवार व्हिएतनामला का जातात ? असा प्रश्न भाजपाकडून उपस्थित करण्यात आला आहे. राहुल गांधी २०२५ या वर्षात आतापर्यंत दोन वेळा व्हिएतनामला जाऊन आले आहेत.





माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचा मृत्यू (२६ डिसेंबर २०२४) झाला त्यावेळी राहुल गांधी व्हिएतनाममध्येच होते. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याचा मृत्यू झाला तरी त्यांना तातडीने मायदेशी परतावे असे वाटले नाही. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाही राहुल गांधी व्हिएतनामला गेल्याचे कानावर आले. आता पुन्हा राहुल गांधी व्हिएतनामला गेले आहेत. खासदार असूनही राहुल गांधी स्वतःच्या मतदारसंघात जाण्याऐवजी वारंवार व्हिएतनामला जात आहेत. राहुल गांधींना व्हिएतनामविषयी एवढे प्रेम का ? असा प्रश्न भाजपा नेते रवीशंकर प्रसाद यांनी उपस्थित केला आहे.



भाजपाने प्रश्न विचारताच काँग्रेसने सावध पवित्रा घेतला. जास्त माहिती देणे टाळत राहुल गांधी व्हिएतनामच्या आर्थिक प्रगतीचा अभ्यास करत आहेत, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरिश रावत म्हणाले. व्हिएतनामने केलेल्या प्रयोगांपैकी काही प्रयोग भारतात शक्य आहेत का याचाही अंदाज राहुल गांधी घेत असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले.
Comments
Add Comment

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी

आकाशात 'या' दिवशी दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही आठवड्यांपूर्वी भारतासह जगभरात 'ब्लड मून' दिसल्यानंतर, आता पुन्हा एकदा आकाशात एका

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर