Thane Station : ठाण्यात उभे राहणार ११ मजली रेल्वे स्टेशन

ठाणे : मुंबई जवळील ठाणे येथे एक खास रेल्वे स्टेशन उभे राहत आहे. हे रेल्वेस्टेशन एक दोन नाही तर तब्बल अकरा मजली असणार आहे. या रेल्वेस्टेशनमधून प्रवाशांच्या प्रवासाचीच आरामदायक व्यवस्था नाही तर लोकांच्या मनोरंजनाचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. या रेल्वे स्टेशनच्या वर मॉल, ऑफिस आणि रिटेल शॉपचीही व्यवस्था असेल. या प्रकल्पामुळे रेल्वेच्या प्रवासाची सुविधा निर्माण होण्याबरोबरच या माध्यमातून सरकारला चांगला महसूलही प्राप्त होणार आहे.मुंबई जवळील ठाणे येथे एक खास रेल्वे स्टेशन उभं राहत आहे. हे रेल्वेस्टेशन एक दोन नाही तर तब्बल अकरा मजली असणार आहे. या रेल्वेस्टेशनमधून प्रवाशांच्या प्रवासाचीच आरामदायक व्यवस्था नाही तर लोकांच्या मनोरंजनाचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.



या रेल्वे स्टेशनच्या वर मॉल, ऑफिस आणि रिटेल शॉपचीही व्यवस्था असेल. या प्रकल्पामुळे रेल्वेच्या प्रवासाची सुविधा निर्माण होण्याबरोबरच या माध्यमातून सरकारला चांगला महसूलही प्राप्त होणार आहे. ठाणे रेल्वे स्टेशनजवळील प्लॅटफॉर्म क्रमांक १०ए जवळील १० हजार मीटर परिसरामध्ये हा प्रकल्प विकसित केला जाणार आहे. त्याबरोबरच २४ हजार २८० वर्गमीटर भागामध्ये लीज स्पेससुद्धा आहे. ही जागा ६० वर्षांच्या लीजवकर दिला जाऊ शकते. तसेच हा प्रकल्प ३० जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष्य समोर ठेवण्यात आलं आहे. या रेल्वे स्टेशनजवळ कनेक्टिव्हिटीवर पूर्ण लक्ष देण्यात आलं असून, त्याला बस आणि मेट्रोद्वारेही जोडलं जाणार आहे.

Comments
Add Comment

उल्हासनगरमध्ये गुंडांनी केला पत्रकारावर हल्ला! पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

उल्हासनगर: उल्हासनगरमध्ये गुंडांनी पत्रकारावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उल्हासनगरच्या कॅम्प

श्रीवर्धन येथे किनाऱ्यालगत आढळली बोया, मेरिटाईम बोर्डच्या अधिकाऱ्यांनी केला तात्काळ तपास

रायगड: श्रीवर्धन येथील खालचा जीवनाबंदर कोळीवाडा परिसरात पाण्याच्या लाटांसोबत सकाळी आठ वाजताच्या दरम्यान एक

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

तुळशी विवाह २०२५: जाणून घ्या या परंपरेचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व!

मुंबई : हिंदू धर्मात तुळशी विवाह हा केवळ धार्मिक सोहळा नाही तर तो घरगुती जीवनातील समृद्धी, आरोग्य आणि कुटुंबातील

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कोटींचे ड्रग्स तयार करणाऱ्या कारखान्यावर टाकली धाड, मुंबई पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी!

मुंबई: मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील रशीद कंपाऊंडमध्ये ड्रग्स कारखान्यावर छाप टाकत लाखोंचा माल जप्त करण्यात

सतीश शाह यांच्या निधनापूर्वी नक्की काय घडलं ? मॅनेजरने सांगितलं सत्य

मुंबई : हिंदी मालिका आणि सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते सतीश शाह यांचे काल शनिवारी २५ ऑक्टोबर रोजी मुंबईच्या