Jay Pawar Wedding : पवारांच्या घरात वाजणार सनई चौघडे, लवकरच होणार नव्या सुनेचे आगमन

मुंबई : एकीकडे जगभरात होळीचे रंग विखुरलेले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरी सनई चौघड्यांचा सूर दुमदुमणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar ) यांचे धाकटे चिरंजीव लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याची बातमी समोर आली आहे. जय पवारांच्या आत्याबाई आणि शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (supriya sule ) यांनी भाच्याचे आणि होणाऱ्या सुनेचे फोटो सोशल माध्यमांवर पोस्ट केले आहेत.



जय पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव आहेत. जय पवार सक्रिय राजकारणात नसले, तरीही राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर स्थानिक पातळीवर राजकारणात त्यांनी लक्ष घालण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर आता जय पवार लग्नामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. जय पवार यांच्या होणाऱ्या पत्नीचे नाव ऋतुजा पाटील आहे. लवकरच या दोघांची लग्नगाठ बांधण्यात येणार असून पवार कुटुंबात सनई चौघडे वाजू लागले आहेत. दरम्यान या लग्नाचे पडसाद राजकीय कारकिर्दीवर पडतील का ? हे पाहणे महत्त्वाचं ठरेल



कोण आहे जय पवार यांची पत्नी ?


सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे प्रवीण पाटील यांची कन्या ऋतुजा पाटील (rutuja patil) यांच्यासोबत अजित पवारांचे पुत्र जय यांचा विवाह होणार आहे. जय पवार आणि ऋतुजा पाटील हे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांच्या संपर्कात होते. आता त्यांनी लग्नाच्या बेडीत अडकण्याचा निर्णय घेतला आहे. ऋतुजा पाटील यांची बहीण ही केसरी टूर्सच्या पाटील कुटुंबाची सून आहेत.

Comments
Add Comment

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत

'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन'

मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री