Mother Ended life : गतिमंद मुलांना विहिरीत ढकलून आईने संपवले जीवन

  74

सोलापूर : मुलीच्या जन्मानंतर झालेली दोन्ही मुले गतिमंदच असल्याच्या चिंतेतून आईने त्या दोन्ही मुलांना गावाजवळील ८० फूट खोल विहिरीत टाकले. नंतर स्वतः उडी घेऊन आत्महत्या केली. वांगी (ता. उत्तर सोलापूर) येथे ही दुर्घटना घडली. चित्रा कविराज हाके, स्वराज हाके यांचे मृतदेह सापडले असून पृथ्वीराज गाळात अडकल्याने शोधकार्य रात्री उशिरापर्यंत सुरू होते.


मूळचे नान्नज येथील असलेले कविराज ऊर्फ दत्तात्रेय हाके काही वर्षांपूर्वीच कुटुंबासह सासरवाडीला वांगी येथे राहायला गेले होते. त्यांना एक आठ वर्षांची मुलगी असून तिच्यानंतर चित्रा यांना पृथ्वीराज व स्वराज अशी दोन मुले झाली. पृथ्वीराज गतिमंद, पण दीड वर्षाचा स्वराज देखील गतिमंदच जन्मला. त्यातून चित्रा यांना त्यांच्या भविष्याची चिंता सतावत होती. या चिंतेतून त्यांनी मुलांसोबत जगाचा निरोप घेण्याचा निर्णय घेतला.



गावाजवळील विहिरीत त्यांनी मुलांना टाकून स्वतःही उडी घेतली, त्यावेळी विहिरीपासून काही अंतरावर शेळ्या चारणाऱ्या मुलीला विहिरीत काहीतरी पडल्याचा आवाज आला. त्यांनी विहिरीकडे धाव घेतली, मात्र विहिरीलगत दाट झाडी असल्याने विहिरीपर्यंत जायला त्यांना वेळ लागला. विहिरीत डोकावून पाहिल्यावर दीड वर्षाचा स्वराज पाण्यावर तरंगताना दिसला. घटनेची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली आणि सर्वांनीच विहिरीकडे धाव घेतली.


सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ कदम त्यांच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शोधण्यासाठी सोलापूर शहरातून अग्निशामक दलाचे पथक बोलावण्यात आले. या पथकाच्या सहाय्याने सायंकाळी सहाच्या सुमारास चित्रा यांचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात यश आले. तत्पूर्वी, चिमुकल्या स्वराजचा मृतदेह बाहेर काढण्यात आला होता. मात्र, पृथ्वीराज उशिरापर्यंत शोध सुरू होता. सहायक पोलिस निरीक्षक श्री. कदम यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक महेश घोडके, शहाजी कांबळे व पोलिस हवालदार महिंद्रकर, मिस्त्री हे रात्रभर घटनास्थळी होते.

Comments
Add Comment

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत

Pune Airport: प्रवाशांना घेऊन विमान पुण्यात तर आलं, पण सामान मागेच राहीलं!

स्पाइसजेटच्या दुबई-पुणे विमानाने इंधन भारामुळे प्रवाशांचे सामान न घेताच पुण्यात लँडिंग केले.  पुणे:  दुबईहून