Kareena Kapoor : सेक्स आणि इंटीमेट सीन्सबद्दल करीना कपूर म्हणाली, " मी असे सीन करायला.... "

  154

मुंबई : बॉलिवूडची बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिचा दमदार अभिनय आणि सौंदर्यांमुळे ती नेहमी चर्चेत असते. तिच्यातील स्पष्ट वक्तशीरपणा तिच्या चाहत्यांना नेहमी आवडतो. नुकतेच एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान करीनाला चित्रपटांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या सेक्स आणि इंटीमेट सीन्सबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तिने आपली प्रतिक्रिया देताना चित्रपटाच्या कथेनुसार हे किती महत्त्वाचे आहे किंवा नाही हे अवलंबून असल्याचे सांगितले. भारतीय सिनेसृष्टीत सेक्स किंवा लैंगिकता हा मानवी अनुभव म्हणून पाहिला जात नाही, असंही ती म्हणाली.



मिळालेल्या माहितीनुसार, करीना कपूर (Kareena Kapoor) सेक्स एज्युकेशन वेब सीरिजसाठी द डर्टी मॅगझिनच्या मंचावर प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री गिलियन एंडरसनसोबतच्या इंटिमेट सीन्सबद्दल मोकळेपणाने बोलली. या मुलाखतीत गिलियनने करीनाला विचारले की, अशा सीनसाठी तू कोणती मर्यादा ठेवली आहेस. यावर करीनाने प्रतिउत्तर देत म्हणाली, “एखाद्या चित्रपटाची कथा पुढे नेण्यासाठी सेक्स सीन्स तितके महत्त्वाचे नसतात. त्याचप्रमाणे ही काही अशी गोष्ट नाही की कथा पुढे नेण्यासाठी ती दाखवलीच पाहिजे. मला माहितीये की ऑनस्क्रीन असे सीन्स करताना मी कम्फर्टेबल नसेन. मी याआधी कधीच तसे सीन्स केले नाहीत. असे सीन स्क्रीनवर दाखवण्यापूर्वी, तुम्ही स्वतःचा विचार केला पाहिजे आणि आदरपूर्वक पाहिले पाहिजे.हे माझं मत आहे. याबाबतीत आम्ही पाश्चिमात्य देशांइतके मोकळे नाही आहोत”, असं करीना पुढे म्हणाली.





करीना कपूर मागील वर्षी अजय देवगणच्या सिंघम अगेनमध्ये दिसली होती. मात्र, यावर्षी तिचा 'दायरा' हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे, ज्याचे दिग्दर्शन 'राझी'च्या दिग्दर्शिका मेघना गुलजार करत आहेत. या सिनेमात करीना पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.