Mumbai Goa : मुंबई-गोवा महामार्गाचे काम जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण होणार - शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू असून, संपूर्ण प्रकल्प जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. याबाबत सदस्य भास्कर जाधव यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य प्रशांत बंब यांनीही सहभाग घेतला.


सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले म्हणाले, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पनवेल ते कासू या टप्प्याचे काम मार्च २०२५ पर्यंत तर कासू ते इंदापूर टप्प्याचे काम डिसेंबर २०२५ अखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत ३१९ कि.मी. लांबीचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित ३५.३५ कि.मी. लांबीचे काम प्रगतीपथावर आहे. मोठे पूल व उड्डाणपूल वगळता उर्वरित काम मे २०२५ पर्यंत आणि संपूर्ण प्रकल्प जानेवारी २०२६ अखेर पूर्ण होणार आहे.



पनवेल-इंदापूर-झाराप-पात्रादेवी या मार्गावरील काम वेगाने सुरू असून निकृष्ट दर्जाच्या कामांची चौकशी केली जाईल. चिपळूण येथील बहादूर शेख चौकातील उड्डाणपुलाच्या गर्डर लॉचिंगदरम्यान १६ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रीकास्ट काँक्रीटचा भाग कोसळला. या घटनेनंतर संबंधित कंत्राटदाराला ५० लाख व अभियंत्याला २० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे असे श्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Loud DJ music kills 140 chickens : उत्तर प्रदेशमध्ये डीजेच्या भयानक आवाजाने १४० कोंबड्यांचा मृत्यू; DJ चालकावर FIR दाखल

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) सुलतानपूर (Sultanpur) जिल्ह्यातून एक अतिशय विचित्र आणि तितकीच धक्कादायक घटना

अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ दुर्मिळ वस्तू, वस्तूची किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल

America returns 657 rare items to India : भारतातून अनेक प्राचीन वस्तू, मूर्ती यांची त्यांच्या दुर्मिळतेमुळे परदेशांमध्ये तस्करी (smuggling)

1 may labour day : १ मे रोजी बँका सुरू राहणार की बंद ? नवीन माहिती पहा

मुंबई : उद्या, १ मे रोजी बँकांना सुट्टी असणार का? १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात सुरू झालेल्या कामगार चळवळीची आठवण

Crime Jharkhand : आधी प्रियकरावर पैसा उडवला नंतर प्रियकराच्या प्रेमात भयानक करून बसली, थेट आईलाच...

Jharkhand Crime : झारखंडची राजधानी रांचीमध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका ५० वर्षाच्या महिलेची हत्या

Raja Raghuvanshi Case: 11 महिन्यांनतर सोनम जेलमधून बाहेर, पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित

शिलॉन्ग  Shillong : राजा रघुवंशी हत्या प्रकरणाने संपूर्ण देशभरात खळबळ उडवून दिली होती. याच राजा रघुवंशी हत्या प्रकरणात

भीषण ! एक्स्प्रेसवेवर धावत्या कारला आग , अल्पवयीन मुलीसह 5 जणांचा करून अंत

दिल्ली : दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गावर भीषण दुर्घटना झाली आहे. मुलाची नोकरी मिळवण्याची इच्छा पूर्ण