MPSC पदभरती आणि पेपरफुटी, कॉपी, गुणांच्या पारदर्शकतेवर विधानपरिषदेत चर्चा

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी - MPSC) संदर्भातील विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. विधानपरिषदेचे सदस्य सतेज ऊर्फ बंटी पाटील, अभिजित वंजारी, अशोक ऊर्फ भाई जगताप, जयंत आसगावकर, राजेश राठोड, धीरज लिंगाडे, डॉ. प्रज्ञा सातव, मिलिंद नार्वेकर आणि सुनिल शिंदे यांनी एमपीएससी संदर्भात प्रश्न उपस्थित केला. यावेळी एमपीएससीमार्फत होणारी पदभरती आणि पारदर्शकता व पेपरफुटीवर प्रश्न विचारण्यात आला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.


राज्य शासनाच्या ४२ विभागांमध्ये सद्यःस्थितीत अडीच लाखाहून अधिक पदे रिक्त असून शासनाने दरवर्षी ५० हजार पदांची मेगा भरती करण्याकरीता काही जाहिराती प्रसिध्द केल्या असल्या तरी सदर भरती प्रक्रिया राबवण्यासाठी लोकसेवा आयोगाकडे मनुष्यबळ नसल्याने लोकसेवा आयोगाला उपरोक्त रिक्त पदे भरण्यासाठी व भरती प्रक्रिया सुलभ होण्यासाठी आहे. त्या अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये अतिरिक्त १५० ते २०० पदे वाढवून देण्याची मागणी लोकसेवा आयोग कर्मचारी संघटनेने राज्य शासनाकडे केली असल्याचे माहे जानेवारी, २०२५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.



यासोबतच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे मनुष्यबळ नसल्यामुळे खाजगी कंपनीकडून परीक्षांचे नियोजन केले जात असल्याने त्यामध्ये अपारदर्शकता, पेपरफुटी, कॉपी, मार्कामध्ये तफावत असे अनेक गैरप्रकार वारंवार निदर्शनास येत आहेत, हे ही खरे आहे काय अशीही विचारणा करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले आहे. लोकसेवा आयोग कर्मचारी संघटनेची पदभरतीची मागणी आली आहे. परंतु, अपारदर्शकता, पेपरफुटी, कॉपी, मार्कामध्ये तफावत हे प्रकार आणि खासगी कंपनीकडून परीक्षांचे नियोजन करणे हे खरे नाही असे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या उत्तरात सांगितले आहे.



रिक्त पदे आणि कर्मचारी वाढीचा मुद्दा


सध्या राज्य शासनाच्या ४२ विभागांमध्ये सुमारे अडीच लाख पदे रिक्त आहेत. शासनाने दरवर्षी ५० हजार पदे भरण्याची मेगा भरती योजना जाहीर केली असली तरी, भरती प्रक्रिया राबवण्यासाठी लोकसेवा आयोगाकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. त्यामुळे एमपीएससी कर्मचारी संघटनेने १५० ते २०० अतिरिक्त पदे निर्माण करण्याची मागणी केली आहे. ही मागणी जानेवारी २०२५ मध्ये समोर आली असल्याचे अधिवेशनात मांडण्यात आले.



पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह


भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखली जात नसल्याचे आरोपही झाले. परीक्षांचे नियोजन खासगी कंपनीकडून केल्यामुळे पेपर फुटी, कॉपी आणि गुणांमध्ये तफावत असे प्रकार वारंवार घडत असल्याचे सांगण्यात आले. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "लोकसेवा आयोग कर्मचारी संघटनेने पदभरतीसाठी अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी केली आहे, मात्र अपारदर्शकता, पेपरफुटी किंवा गुणांमध्ये तफावत होण्याचे आरोप निराधार आहेत."



तलाठी आणि जिल्हा परिषदेच्या भरतीवर स्पष्टीकरण


तलाठी आणि जिल्हा परिषदेच्या पदभरती प्रक्रियेवरही प्रश्न विचारण्यात आले. पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात येत नसल्याचेही विचारण्यात आले. यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "तलाठी आणि जिल्हा परिषदेची भरती प्रक्रिया ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होत नाही. तसेच नियुक्ती पत्र देण्याची जबाबदारीही आयोगाची नाही." त्यामुळे या प्रक्रियेचा एमपीएससीच्या मनुष्यबळाशी कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Kokan Railway: कोकणकरांसाठी आनंदाची बातमी! शिमग्यासाठी धावणार खास विनाआरक्षित 'ही' ट्रेन

मुंबई : कोकणकरांसाठी महत्वाचा सण म्हणजे शिमगा, राज्याच्या कानाकोपऱ्यातून चाकरमानी आपल्या गावी शिमग्यासाठी

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे,

घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' पूल

- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई :

अंगणवाडी बांधकामासाठी १५ लाखांचा निधी प्रस्तावित; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

मुंबई : राज्यातील अंगणवाड्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या 'स्मार्ट किट' खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्तेचा