काँग्रेसचे उदयसिंह पाटील उंडाळकर राष्ट्रवादीच्या वाटेवर ?

कराड : नाना पटोले यांच्याकडे असलेली जबाबदारी काढून घेऊन हर्षवर्धन सपकाळ यांना काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष केले. एवढे झाले तरी काँग्रेसमधली नाराजी कमी झाल्याचे दिसत नाही. आता कराडमध्ये काँग्रेसला धक्का बसण्याची चिन्ह आहेत. काँग्रेसचे उदयसिंह पाटील उंडाळकर हे अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.



यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी नतमस्तक होण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित कराड दौऱ्यावर आहेत. उपमुख्यमंत्री समाधीस्थळी असताना काँग्रेसचे सरचिटणीस उदयसिंह पाटील उंडाळकर कोयना बँकेत पोहचले आहेत. ते अजित पवारांना भेटणार आहेत. अधिकृत कार्यक्रमानुसार समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर चहापानासाठी अजित पवार कोयना बँकेत येणार आहेत. या निमित्ताने अजित पवार आणि उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्यात चर्चा होणार आहे. यामुळे उदयसिंह पाटील उंडाळकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

राज्याचे माजी सहकार मंत्री दिवंगत विलासराव पाटील उंडाळकर यांचे पुत्र उदयसिंह पाटील उंडाळकर सध्या काँग्रेसचे सरचिटणीस आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी सह्याद्री अतिथी गृह येथे अजित पवार यांची भेट घेतली. ही भेट झाल्यापासूनच उदयसिंह पाटील उंडाळकर काँग्रेसचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा जर धरू लागली आहे.

 
Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद