Dr. Babasaheb Ambedkar : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर सुरक्षा छत्री बसवावी

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या तसेच ठाणे महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून ठाणे रेल्वे स्थानकाच्या समोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उड्डाणपूल परिसरात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यात आला आहे. पुतळ्यावर विविध पक्षी बसून विष्टा करित असल्याने पुतळ्याची एक प्रकारे विटंबनाच होत आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर लवकरात लवकर संरक्षक छत्री बसवावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश वराडे यांनी केली आहे.



वराडे यांच्या लक्षात येताच ठाण्यातील प्रशासनाच्या माध्यमातून बसविण्यात आलेल्या पूर्णाकृती पुतळ्यावर सुरक्षा छत्री बसविण्याची लेखी मागणी राज्य शासनाच्या मंत्रालयातील नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे तसेच ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे केली आहे. त्यामुळे आतातरी शासनाकडे आणि प्रशासनाकडे करण्यात आलेल्या मागणीची दखल घेऊन भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर सुरक्षा छत्री बसविणार का? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Comments
Add Comment

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत

'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन'

मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री