चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याचा आनंद साजरा करणाऱ्यांवर अल्लाह-हू-अकबर म्हणणाऱ्यांचा हल्ला, महूतील धक्कादायक घटना

महू : चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याचा आनंद साजरा करणाऱ्यांवर अल्लाह-हू-अकबर म्हणणाऱ्यांनी हल्ला केला, ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशमधील महू येथे घडली. भारताने न्यूझीलंड विरुद्धचा अंतिम सामना चार गडी आणि सहा चेंडू राखून जिंकला आणि चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ वर नाव कोरले. भारताचा कर्णधार रोहित शर्मा सामनावीर आणि न्यूझीलंडचा रचिन रविंद्र मालिकावीर झाला. यानंतर महूमध्ये क्रिकेटप्रेमींनी फटाके फोडले आणि आनंदाने नृत्य करत विजय साजरा करण्यास सुरुवात केली. आनंदोत्सव सुरू असताना अल्लाह-हू-अकबर म्हणणाऱ्यांनी हल्ला केला. आनंदोत्सव साजरा करणाऱ्यांवर दगडफेक करण्यात आली. काही वाहने जाळण्यात आली.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आनंदोत्सव साजरा करत असलेले तसेच बाईकवरुन जल्लोष करत फिरत असलेले तरुण महूच्या जामा मशि‍दीच्या मार्गावरुन जात होते. या तरुणांवर मशि‍दीतून बाहेर आलेल्यांनी हल्ला केला. दगडफेक आणि जाळपोळ सुरू झाली. मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाल्यामुळे तणाव निर्माण झाला. अखेर पोलिसांनी महूतील जामा मशि‍दीचा परिसर तसेच पट्टी बाजार, सब्जी मार्केट, गफ्फार हॉटेलसह अनेक भागांमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवला आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. या घटनाक्रमाचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.



दगडफेक, जाळपोळ, तोडफोड या स्वरुपात झालेल्या हिंसक घटनेत काही जण जखमी झाले. जखमींवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. पोलिसांनी काही भागांमध्ये लाठीमार करुन आणि चोख बंदोबस्त ठेवून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे; अशी माहिती इंदूरच्या पोलीस अधीक्षक हितिका वत्सल यांनी दिली.

Comments
Add Comment

बिहारमध्य राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व

भारत सर्वाधिक लठ्ठ मुलांचा देश : युनिसेफ

खाद्यपदार्थांच्या लेबलमुळे ओळखता येणार पदार्थ नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक

आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या