Satellite : आसाम राज्याला पहिल्यांदाच मिळणार स्वतःचा उपग्रह; इस्रोशी चर्चा सुरू

दिसपुर : देशात पहिल्यांदाच एखाद्या राज्याचा स्वतःचा उपग्रह (satellite) असेल. आसाम लवकरच असे करणारे देशातील पहिले राज्य बनणार आहे. आसाम सरकारने सोमवारी घोषणा केली की त्यांचा स्वतःचा उपग्रह असेल, जो महत्त्वाच्या सामाजिक-आर्थिक प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी डेटा गोळा करण्याबरोबरच सीमांवर देखरेख करण्यास मदत करेल.


आसामच्या अर्थमंत्री अजंता निओग यांनी २०२५-२६ चा राज्य अर्थसंकल्प सादर करताना ही घोषणा केली. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी नंतर दावा केला की आसाम हे स्वतःचे उपग्रह (satellite) असलेले देशातील पहिले राज्य असेल.



"भारत सरकारच्या अंतराळ विभागाच्या IN-SPACE (इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटर) च्या सहकार्याने, आम्ही महत्त्वाच्या सामाजिक-आर्थिक प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी डेटाचा सतत, विश्वासार्ह प्रवाह सुनिश्चित करण्यासाठी आमचा स्वतःचा उपग्रह 'असमसॅट' स्थापित करण्याचा मानस करत असल्याचे त्यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात स्पष्ट केले.


नंतर पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, "जर आपल्याकडे स्वतःचा उपग्रह असेल तर तो आपल्याला कोणत्याही परदेशी व्यक्तीविषयी माहिती मिळू शकते. अथवा बेकायदेशीरपणे प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे का याची माहीतीही मिळू शकते. पुराची आगाऊ माहिती देऊ शकेल, हवामान अहवालात मदत करू शकेल, ज्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना फायदा होईल, असेही त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; १३ एप्रिलला बैठक, वेतन आणि निवृत्तीवेतनावर अंतिम निर्णय होणार

नवी दिल्ली: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेसंदर्भात लवकरच एक महत्त्वाची बैठक होणार आहे. राष्ट्रीय

TRP of News Channels : वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीवर केंद्राकडून पुन्हा लगाम! वृत्तवाहिन्यांवरील बंदी आणखी काही आठवड्यांसाठी वाढवली

केंद्र सरकारने टीव्ही वृत्तवाहिन्यांचे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स (टीआरपी) आणखी चार आठवड्यांसाठी निलंबित

Anant Ambani: अनंत अंबानींनी दिली मोठी देणगी; केरळमधील दोन मंदिरांना ६ कोटी रुपये

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी केरळमधील दोन प्रमुख धार्मिक

Manipur on edge : मणिपूरमध्ये रॉकेट हल्ल्यात दोन चिमुरड्यांचा मृत्यू; संतप्त जमावाचा सुरक्षा दलांवर हल्ला, बिष्णुपूरमध्ये तणाव

इंफाळ : मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराने पुन्हा एकदा भीषण रूप धारण केले आहे. बिष्णुपूर जिल्ह्यात मंगळवारी पहाटे

Amaravati Capital : 'अमरावती' आता आंध्र प्रदेशची 'कायमस्वरूपी' राजधानी; केंद्राचे गॅझेट नोटिफिकेशन जारी!

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) राजधानीबाबत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर केंद्र सरकारने

Rajnath Singh : "पाकिस्तानने बंगालकडे वाईट नजरेने पाहिलं तर..."; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांच्या भडकाऊ वक्तव्याला जोरदार