Satellite : आसाम राज्याला पहिल्यांदाच मिळणार स्वतःचा उपग्रह; इस्रोशी चर्चा सुरू

दिसपुर : देशात पहिल्यांदाच एखाद्या राज्याचा स्वतःचा उपग्रह (satellite) असेल. आसाम लवकरच असे करणारे देशातील पहिले राज्य बनणार आहे. आसाम सरकारने सोमवारी घोषणा केली की त्यांचा स्वतःचा उपग्रह असेल, जो महत्त्वाच्या सामाजिक-आर्थिक प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी डेटा गोळा करण्याबरोबरच सीमांवर देखरेख करण्यास मदत करेल.


आसामच्या अर्थमंत्री अजंता निओग यांनी २०२५-२६ चा राज्य अर्थसंकल्प सादर करताना ही घोषणा केली. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी नंतर दावा केला की आसाम हे स्वतःचे उपग्रह (satellite) असलेले देशातील पहिले राज्य असेल.



"भारत सरकारच्या अंतराळ विभागाच्या IN-SPACE (इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटर) च्या सहकार्याने, आम्ही महत्त्वाच्या सामाजिक-आर्थिक प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी डेटाचा सतत, विश्वासार्ह प्रवाह सुनिश्चित करण्यासाठी आमचा स्वतःचा उपग्रह 'असमसॅट' स्थापित करण्याचा मानस करत असल्याचे त्यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात स्पष्ट केले.


नंतर पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, "जर आपल्याकडे स्वतःचा उपग्रह असेल तर तो आपल्याला कोणत्याही परदेशी व्यक्तीविषयी माहिती मिळू शकते. अथवा बेकायदेशीरपणे प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे का याची माहीतीही मिळू शकते. पुराची आगाऊ माहिती देऊ शकेल, हवामान अहवालात मदत करू शकेल, ज्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना फायदा होईल, असेही त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला