Satellite : आसाम राज्याला पहिल्यांदाच मिळणार स्वतःचा उपग्रह; इस्रोशी चर्चा सुरू

दिसपुर : देशात पहिल्यांदाच एखाद्या राज्याचा स्वतःचा उपग्रह (satellite) असेल. आसाम लवकरच असे करणारे देशातील पहिले राज्य बनणार आहे. आसाम सरकारने सोमवारी घोषणा केली की त्यांचा स्वतःचा उपग्रह असेल, जो महत्त्वाच्या सामाजिक-आर्थिक प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी डेटा गोळा करण्याबरोबरच सीमांवर देखरेख करण्यास मदत करेल.


आसामच्या अर्थमंत्री अजंता निओग यांनी २०२५-२६ चा राज्य अर्थसंकल्प सादर करताना ही घोषणा केली. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी नंतर दावा केला की आसाम हे स्वतःचे उपग्रह (satellite) असलेले देशातील पहिले राज्य असेल.



"भारत सरकारच्या अंतराळ विभागाच्या IN-SPACE (इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटर) च्या सहकार्याने, आम्ही महत्त्वाच्या सामाजिक-आर्थिक प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी डेटाचा सतत, विश्वासार्ह प्रवाह सुनिश्चित करण्यासाठी आमचा स्वतःचा उपग्रह 'असमसॅट' स्थापित करण्याचा मानस करत असल्याचे त्यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात स्पष्ट केले.


नंतर पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, "जर आपल्याकडे स्वतःचा उपग्रह असेल तर तो आपल्याला कोणत्याही परदेशी व्यक्तीविषयी माहिती मिळू शकते. अथवा बेकायदेशीरपणे प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे का याची माहीतीही मिळू शकते. पुराची आगाऊ माहिती देऊ शकेल, हवामान अहवालात मदत करू शकेल, ज्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना फायदा होईल, असेही त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे

Madhya Pradesh : कफ सिरप नाही, विष! औषधामुळे ११ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मध्य प्रदेश-राजस्थान हादरले, दोन्ही सिरपवर तात्काळ बंदी

मध्य प्रदेश : मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सरकारी आरोग्य केंद्रांमधून वाटण्यात येत असलेल्या एका कफ सिरपमुळे (Cough

आता देशभरात 'ई-सिम'

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने (भारत संचार निगम लिमिटेड) टाटा कम्युनिकेशन्ससोबत हातमिळवणी केली आहे. या